शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

एफआरपी न देणाºयांवर सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांवर लवकरच होणार कारवाई !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 12:53 IST

सोलापूर : जिल्ह्यातील एकाही साखर कारखान्याने अद्यापि एकरकमी एफआरपीची रक्कम शेतकºयांना दिली नसल्याने आरआरसीनुसार कारवाई करण्याचा प्रस्ताव साखर आयुक्तांना ...

ठळक मुद्देकारखान्याला ऊस आल्यानंतर १४ दिवसात पैसे देण्याचा कायदा जिल्ह्यातील तीन कारखान्यांनी एफआरपीच्या ८२ टक्के रक्कम शेतकºयांना दिलीआरआरसीनुसार कारवाई करण्याचा प्रस्ताव साखर आयुक्तांना देणार असल्याचे पुणे प्रादेशिक सहसंचालक (साखर) डॉ. संजय भोसले यांनी सांगितले

सोलापूर : जिल्ह्यातील एकाही साखर कारखान्याने अद्यापि एकरकमी एफआरपीची रक्कम शेतकºयांना दिली नसल्याने आरआरसीनुसार कारवाई करण्याचा प्रस्ताव साखर आयुक्तांना देणार असल्याचे पुणे प्रादेशिक सहसंचालक (साखर) डॉ. संजय भोसले यांनी सांगितले. दरम्यान, जिल्ह्यातील तीन कारखान्यांनी एफआरपीच्या ८२ टक्के रक्कम शेतकºयांना दिली आहे. 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मागणीनुसार एकरकमी एफआरपी देण्याबाबत जिल्हाधिकाºयांनी २२ नोव्हेंबर रोजी बैठक घेतली होती. या बैठकीत पुणे प्रादेशिक सहसंचालक डॉ. संजय भोसले यांच्यासमोरच एकरकमी एफआरपी देण्यात येईल, असे पत्र देण्याच्या सूचना साखर कारखान्यांना दिल्या होत्या. 

लोकमंगल कारखाना वगळता कोणीही असे पत्र दिले नाही. अशाप्रकारचे पत्र जिल्हाधिकाºयांकडे देण्याबाबत कसलाही कायदा नसल्याचे साखर कारखानदारांचे मत आहे. जे कायद्यात नाही ते आम्ही लेखी देण्याचा प्रश्नच येत नसल्याची भूमिका घेणाºया कारखान्यांनी एफआरपी धोरणानुसार शेतकºयांना उसाचे पैसेही दिले  नाहीत.

जिल्ह्यात सध्या ३१ साखर कारखाने सुरू असून, जयहिंद साखर कारखान्याने प्रति टन २२०० रुपयांनी शेतकºयांना पैसे दिले असले तरी त्याची माहिती प्रादेशिक कार्यालयाकडे नाही. 

पांडुरंग श्रीपूर, सासवड माळी शुगर व विठ्ठलराव शिंदे पिंपळनेर या साखर कारखान्यांनी २१०० रुपयांनी शेतकºयांना पैसे दिले आहेत. दोन दिवसांखाली झालेल्या कारखान्यांच्या बैठकीत ही माहिती कारखान्यांनी दिली. या तिन्ही साखर कारखान्यांची एफआरपी २४०० ते २५०० रुपये आहे. कारखान्यांनी आजपर्यंत केलेल्या गाळपाची माहिती घेऊन एफआरपी न देणाºया कारखान्यांवर आरआरसीनुसार कारवाई करण्याचा प्रस्ताव साखर आयुक्तांना मंगळवारी देणार असल्याचे प्रादेशिक सहसंचालक डॉ. भोसले यांनी सांगितले. 

२७ कारखान्यांचे ४६ मेट्रिक टन लाख गाळप- जिल्ह्यात सुरू असलेल्या सिद्धेश्वर कुमठे, लोकमंगल बीबीदारफळ, लोकमंगल भंडारकवठे या कारखान्यांच्या गाळपाच्या आकडेवारीची नोंद नाही. अन्य २७ साखर कारखान्यांचे ४५ लाख ७७ हजार १०१ मे. टन गाळप झाले तर ४३ लाख ५० हजार ८१५ क्विंटल साखर तयार झाली आहे. चार डिसेंबरच्या साखर आयुक्त कार्यालयाच्या नोंदीनुसार राज्यातील अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत सोलापूरच्या साखर कारखान्यांचे गाळप सर्वाधिक आहे. अहमदनगर व पुणे हे दोन जिल्हे अनुक्रमे ३२ लाख गाळप करुन दुसºया क्रमांकावर आहेत. 

कारखान्याला ऊस आल्यानंतर १४ दिवसात पैसे देण्याचा कायदा असला तरी साखरेला दर नसल्याने पैशाची अडचण आहे. बँकांकडून कर्ज घेऊन पैशाची तरतूद करण्यात येत आहे. एकरकमी एफआरपी द्यावी लागेल.- महेश देशमुख,अध्यक्ष, लोकमंगल शुगर बीबीदारफळ

आम्ही कोल्हापूरप्रमाणेच पैसे दिले- साखरेचा उतारा कमी आहे, उत्पादित साखर विक्री होत नाही, दरही कमी असल्याने आम्ही एफआरपीच्या ८०-८२ टक्के रक्कम शेतकºयांना दिल्याचे स्पष्टीकरण विठ्ठलराव शिंदे, पांडुरंग व सासवड माळी शुगर या कारखान्यांनी दिले आहे. कोल्हापूरच्या कारखान्यांनीही अशाच पद्धतीने शेतकºयांना पैसे दिल्याचेही या तीन कारखान्यांनी सांगितले आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरSugar factoryसाखर कारखानेSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय