शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
3
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
4
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
5
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
8
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
9
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
10
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
11
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
12
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
13
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
14
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
15
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
16
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
17
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
18
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
19
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
20
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

एफआरपी न देणाºयांवर सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांवर लवकरच होणार कारवाई !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 12:53 IST

सोलापूर : जिल्ह्यातील एकाही साखर कारखान्याने अद्यापि एकरकमी एफआरपीची रक्कम शेतकºयांना दिली नसल्याने आरआरसीनुसार कारवाई करण्याचा प्रस्ताव साखर आयुक्तांना ...

ठळक मुद्देकारखान्याला ऊस आल्यानंतर १४ दिवसात पैसे देण्याचा कायदा जिल्ह्यातील तीन कारखान्यांनी एफआरपीच्या ८२ टक्के रक्कम शेतकºयांना दिलीआरआरसीनुसार कारवाई करण्याचा प्रस्ताव साखर आयुक्तांना देणार असल्याचे पुणे प्रादेशिक सहसंचालक (साखर) डॉ. संजय भोसले यांनी सांगितले

सोलापूर : जिल्ह्यातील एकाही साखर कारखान्याने अद्यापि एकरकमी एफआरपीची रक्कम शेतकºयांना दिली नसल्याने आरआरसीनुसार कारवाई करण्याचा प्रस्ताव साखर आयुक्तांना देणार असल्याचे पुणे प्रादेशिक सहसंचालक (साखर) डॉ. संजय भोसले यांनी सांगितले. दरम्यान, जिल्ह्यातील तीन कारखान्यांनी एफआरपीच्या ८२ टक्के रक्कम शेतकºयांना दिली आहे. 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मागणीनुसार एकरकमी एफआरपी देण्याबाबत जिल्हाधिकाºयांनी २२ नोव्हेंबर रोजी बैठक घेतली होती. या बैठकीत पुणे प्रादेशिक सहसंचालक डॉ. संजय भोसले यांच्यासमोरच एकरकमी एफआरपी देण्यात येईल, असे पत्र देण्याच्या सूचना साखर कारखान्यांना दिल्या होत्या. 

लोकमंगल कारखाना वगळता कोणीही असे पत्र दिले नाही. अशाप्रकारचे पत्र जिल्हाधिकाºयांकडे देण्याबाबत कसलाही कायदा नसल्याचे साखर कारखानदारांचे मत आहे. जे कायद्यात नाही ते आम्ही लेखी देण्याचा प्रश्नच येत नसल्याची भूमिका घेणाºया कारखान्यांनी एफआरपी धोरणानुसार शेतकºयांना उसाचे पैसेही दिले  नाहीत.

जिल्ह्यात सध्या ३१ साखर कारखाने सुरू असून, जयहिंद साखर कारखान्याने प्रति टन २२०० रुपयांनी शेतकºयांना पैसे दिले असले तरी त्याची माहिती प्रादेशिक कार्यालयाकडे नाही. 

पांडुरंग श्रीपूर, सासवड माळी शुगर व विठ्ठलराव शिंदे पिंपळनेर या साखर कारखान्यांनी २१०० रुपयांनी शेतकºयांना पैसे दिले आहेत. दोन दिवसांखाली झालेल्या कारखान्यांच्या बैठकीत ही माहिती कारखान्यांनी दिली. या तिन्ही साखर कारखान्यांची एफआरपी २४०० ते २५०० रुपये आहे. कारखान्यांनी आजपर्यंत केलेल्या गाळपाची माहिती घेऊन एफआरपी न देणाºया कारखान्यांवर आरआरसीनुसार कारवाई करण्याचा प्रस्ताव साखर आयुक्तांना मंगळवारी देणार असल्याचे प्रादेशिक सहसंचालक डॉ. भोसले यांनी सांगितले. 

२७ कारखान्यांचे ४६ मेट्रिक टन लाख गाळप- जिल्ह्यात सुरू असलेल्या सिद्धेश्वर कुमठे, लोकमंगल बीबीदारफळ, लोकमंगल भंडारकवठे या कारखान्यांच्या गाळपाच्या आकडेवारीची नोंद नाही. अन्य २७ साखर कारखान्यांचे ४५ लाख ७७ हजार १०१ मे. टन गाळप झाले तर ४३ लाख ५० हजार ८१५ क्विंटल साखर तयार झाली आहे. चार डिसेंबरच्या साखर आयुक्त कार्यालयाच्या नोंदीनुसार राज्यातील अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत सोलापूरच्या साखर कारखान्यांचे गाळप सर्वाधिक आहे. अहमदनगर व पुणे हे दोन जिल्हे अनुक्रमे ३२ लाख गाळप करुन दुसºया क्रमांकावर आहेत. 

कारखान्याला ऊस आल्यानंतर १४ दिवसात पैसे देण्याचा कायदा असला तरी साखरेला दर नसल्याने पैशाची अडचण आहे. बँकांकडून कर्ज घेऊन पैशाची तरतूद करण्यात येत आहे. एकरकमी एफआरपी द्यावी लागेल.- महेश देशमुख,अध्यक्ष, लोकमंगल शुगर बीबीदारफळ

आम्ही कोल्हापूरप्रमाणेच पैसे दिले- साखरेचा उतारा कमी आहे, उत्पादित साखर विक्री होत नाही, दरही कमी असल्याने आम्ही एफआरपीच्या ८०-८२ टक्के रक्कम शेतकºयांना दिल्याचे स्पष्टीकरण विठ्ठलराव शिंदे, पांडुरंग व सासवड माळी शुगर या कारखान्यांनी दिले आहे. कोल्हापूरच्या कारखान्यांनीही अशाच पद्धतीने शेतकºयांना पैसे दिल्याचेही या तीन कारखान्यांनी सांगितले आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरSugar factoryसाखर कारखानेSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय