शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

एफआरपी न देणाºयांवर सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांवर लवकरच होणार कारवाई !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 12:53 IST

सोलापूर : जिल्ह्यातील एकाही साखर कारखान्याने अद्यापि एकरकमी एफआरपीची रक्कम शेतकºयांना दिली नसल्याने आरआरसीनुसार कारवाई करण्याचा प्रस्ताव साखर आयुक्तांना ...

ठळक मुद्देकारखान्याला ऊस आल्यानंतर १४ दिवसात पैसे देण्याचा कायदा जिल्ह्यातील तीन कारखान्यांनी एफआरपीच्या ८२ टक्के रक्कम शेतकºयांना दिलीआरआरसीनुसार कारवाई करण्याचा प्रस्ताव साखर आयुक्तांना देणार असल्याचे पुणे प्रादेशिक सहसंचालक (साखर) डॉ. संजय भोसले यांनी सांगितले

सोलापूर : जिल्ह्यातील एकाही साखर कारखान्याने अद्यापि एकरकमी एफआरपीची रक्कम शेतकºयांना दिली नसल्याने आरआरसीनुसार कारवाई करण्याचा प्रस्ताव साखर आयुक्तांना देणार असल्याचे पुणे प्रादेशिक सहसंचालक (साखर) डॉ. संजय भोसले यांनी सांगितले. दरम्यान, जिल्ह्यातील तीन कारखान्यांनी एफआरपीच्या ८२ टक्के रक्कम शेतकºयांना दिली आहे. 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मागणीनुसार एकरकमी एफआरपी देण्याबाबत जिल्हाधिकाºयांनी २२ नोव्हेंबर रोजी बैठक घेतली होती. या बैठकीत पुणे प्रादेशिक सहसंचालक डॉ. संजय भोसले यांच्यासमोरच एकरकमी एफआरपी देण्यात येईल, असे पत्र देण्याच्या सूचना साखर कारखान्यांना दिल्या होत्या. 

लोकमंगल कारखाना वगळता कोणीही असे पत्र दिले नाही. अशाप्रकारचे पत्र जिल्हाधिकाºयांकडे देण्याबाबत कसलाही कायदा नसल्याचे साखर कारखानदारांचे मत आहे. जे कायद्यात नाही ते आम्ही लेखी देण्याचा प्रश्नच येत नसल्याची भूमिका घेणाºया कारखान्यांनी एफआरपी धोरणानुसार शेतकºयांना उसाचे पैसेही दिले  नाहीत.

जिल्ह्यात सध्या ३१ साखर कारखाने सुरू असून, जयहिंद साखर कारखान्याने प्रति टन २२०० रुपयांनी शेतकºयांना पैसे दिले असले तरी त्याची माहिती प्रादेशिक कार्यालयाकडे नाही. 

पांडुरंग श्रीपूर, सासवड माळी शुगर व विठ्ठलराव शिंदे पिंपळनेर या साखर कारखान्यांनी २१०० रुपयांनी शेतकºयांना पैसे दिले आहेत. दोन दिवसांखाली झालेल्या कारखान्यांच्या बैठकीत ही माहिती कारखान्यांनी दिली. या तिन्ही साखर कारखान्यांची एफआरपी २४०० ते २५०० रुपये आहे. कारखान्यांनी आजपर्यंत केलेल्या गाळपाची माहिती घेऊन एफआरपी न देणाºया कारखान्यांवर आरआरसीनुसार कारवाई करण्याचा प्रस्ताव साखर आयुक्तांना मंगळवारी देणार असल्याचे प्रादेशिक सहसंचालक डॉ. भोसले यांनी सांगितले. 

२७ कारखान्यांचे ४६ मेट्रिक टन लाख गाळप- जिल्ह्यात सुरू असलेल्या सिद्धेश्वर कुमठे, लोकमंगल बीबीदारफळ, लोकमंगल भंडारकवठे या कारखान्यांच्या गाळपाच्या आकडेवारीची नोंद नाही. अन्य २७ साखर कारखान्यांचे ४५ लाख ७७ हजार १०१ मे. टन गाळप झाले तर ४३ लाख ५० हजार ८१५ क्विंटल साखर तयार झाली आहे. चार डिसेंबरच्या साखर आयुक्त कार्यालयाच्या नोंदीनुसार राज्यातील अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत सोलापूरच्या साखर कारखान्यांचे गाळप सर्वाधिक आहे. अहमदनगर व पुणे हे दोन जिल्हे अनुक्रमे ३२ लाख गाळप करुन दुसºया क्रमांकावर आहेत. 

कारखान्याला ऊस आल्यानंतर १४ दिवसात पैसे देण्याचा कायदा असला तरी साखरेला दर नसल्याने पैशाची अडचण आहे. बँकांकडून कर्ज घेऊन पैशाची तरतूद करण्यात येत आहे. एकरकमी एफआरपी द्यावी लागेल.- महेश देशमुख,अध्यक्ष, लोकमंगल शुगर बीबीदारफळ

आम्ही कोल्हापूरप्रमाणेच पैसे दिले- साखरेचा उतारा कमी आहे, उत्पादित साखर विक्री होत नाही, दरही कमी असल्याने आम्ही एफआरपीच्या ८०-८२ टक्के रक्कम शेतकºयांना दिल्याचे स्पष्टीकरण विठ्ठलराव शिंदे, पांडुरंग व सासवड माळी शुगर या कारखान्यांनी दिले आहे. कोल्हापूरच्या कारखान्यांनीही अशाच पद्धतीने शेतकºयांना पैसे दिल्याचेही या तीन कारखान्यांनी सांगितले आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरSugar factoryसाखर कारखानेSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय