शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर जिल्ह्यातील खासगी दवाखाने बंद ठेवल्यास होणार कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2020 11:18 IST

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे आदेश; जिल्ह्यात अन्नधान्य साठा मुबलक, गर्दी न करण्याचे केले आवाहन

ठळक मुद्देशासकीय रुग्णालयात आत्तापर्यंत २५ संशयित उपचारासाठी दाखल झाले२२ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आता फक्त तीन जणांवर उपचार सुरू घरी निगराणीखाली ठेवण्यात आलेल्यांची संख्या २१५ इतकी

सोलापूर : जिल्ह्यात अन्नधान्य व भाजीपाल्याचा साठा मुबलक आहे. त्यामुळे एकाचवेळी खरेदीसाठी गर्दी करू नका, असे आवाहन करण्यात आले़ याशिवाय खासगी डॉक्टरांनी दवाखाने सुरूच ठेवणे बंधनकारक असल्याचे आदेश बुधवारी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी बुधवारी काढले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनचा कालावधी वाढविल्यानंतर लोकांची पुन्हा खरेदीसाठी गर्दी होत असल्याचे चित्र दिसत आहे. अन्नधान्य व भाजीपाल्याच्या विक्रीला कोणतीही बंदी नाही. संचारबंदी असली तरी किराणा व भाजीपाला आणण्यासाठी सवलत दिली आहे. त्यामुळे नागरिकांनी गर्दी न करता दुकानासमोर ठराविक अंतर ठेवून या वस्तू खरेदी करता येणार आहेत. नागरिकांनी अगोदर आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. रस्त्यावर आल्यावरच कोरोनाची बाधा होण्याची शक्यता बळावत असते. त्यामुळे गरजेच्यावेळीच लोकांनी खरेदीसाठी यावे. १५ एप्रिलपर्यंत अन्नधान्य किंवा भाजीपाल्याचा तुटवडा होणार नाही याची काळजी प्रशासनाने घेतली आहे. 

अन्नधान्य व भाजीपाला वाहतूक करणाºया वाहनांना पोलीस अधीक्षक व आरटीओतर्फे पास देण्यात येणार आहेत. पोलिसांकडूनही अशा वाहनांची अडवणूक होणार नाही अशा सूचना दिलेल्या आहेत. खासगी डॉक्टर दवाखाने बंद करीत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. जिल्ह्यात अन्नधान्याचा साठा पुढीलप्रमाणे आहे. सरकारी वितरण प्रणालीत रेशनचा साठा. गहू : १७ हजार ४६१ मे. टन, तांदूळ : १0 हजार ५३४ मे. टन, डाळ : २५ मे. टन, साखर : १५0 मे. टन. खुल्या बाजारातील साठा. गहू: १३ हजार ६00 मे. टन, तांदूळ: १७ हजार ५00, ज्वारी: २१ हजार ५00, साखर: २८५0, डाळी: ९ हजार ८७७, खाद्यतेल: ९८ हजार ५५0 लिटर, गॅस सिलिंडर: २५ हजार २0५, पेट्रोल: ८ हजार ८२५ लिटर, डिझेल: २३ हजार ८७५ लिटर. हा दररोजचा साठा आहे. त्याचबरोबर सर्व बाजार समित्या सुरू आहेत. येथील भाजीपाल्याचे लिलाव सुरूच ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे सोलापूर शहर किंवा जिल्ह्यात कोठेच अन्नधान्य व भाजीपाल्याची टंचाई होणार नाही, याची नागरिकांनी नोंद घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी शंभरकर यांनी केले आहे. 

तीन रुग्ण निगराणीखाली- शासकीय रुग्णालयात आत्तापर्यंत २५ संशयित उपचारासाठी दाखल झाले, त्यापैकी २२ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आता फक्त तीन जणांवर उपचार सुरू असून, त्यांचे अहवाल यायचे आहेत. त्यांची तब्येत ठिक आहे. घरी निगराणीखाली ठेवण्यात आलेल्यांची संख्या २१५ इतकी आहे. यातील ७३ जणांचा कालावधी संपला आहे. १३७ जण अद्याप निगराणीखाली आहेत. शहरात निगराणीखाली ठेवण्यात येणाºया कक्षात ५३ जणांना ठेवण्यात आले होते. त्यापैकी २७ जणांचा कालावधी संपला आहे. अद्याप २६ जणांना निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. जिल्ह्यात येणाºया प्रवाशांची तपासणी करण्यासाठी ४ ठिकाणी नाकेबंदी करण्यात आली आहे. या ठिकाणी ११६५ वाहन तपासून त्यातून प्रवास करणाºया ४ हजार १११ तर आंतर-जिल्ह्यात केलेल्या तीन ठिकाणच्या नाकेबंदीत २ हजार ९९0 वाहने अडवून १० हजार ९९७ प्रवाशांची तपासणी करण्यात आली आहे. 

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटलHealthआरोग्यSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय