शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

एफआरपी थकविणाºया साखर कारखानदारांवर कारवाई होणार, सहकारमंत्र्यांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 13:26 IST

५ सप्टेंबरपर्यंत शेतकºयांची थकबाकी अदा करा

ठळक मुद्देशेतकºयांच्या ऊस खरेदीपोटी थकीत असलेली रक्कम येत्या पाच सप्टेंबरपर्यंत अदा करावीऊस उत्पादकांची कारखानदारांकडे थकबाकी असल्याच्या अनेक तक्रारीसाखरेचे दर आणि कारखानदारांकडे विक्रीअभावी पैसा थकलेला

 

सोलापूर : साखर कारखानदारांनी शेतकºयांच्या ऊस खरेदीपोटी थकीत असलेली रक्कम येत्या पाच सप्टेंबरपर्यंत अदा करावी. सूचना देऊनही एफआरपी थकविणाºया साखर कारखानदारांवर कारवाई केली जाईल, असा इशारा सहकारमंत्री तथा वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख यांनी सोलापुरात झालेल्या पत्रकार परिषदेतून दिला.

सहकारमंत्री म्हणाले, ऊस उत्पादकांची कारखानदारांकडे थकबाकी असल्याच्या अनेक तक्रारी आहेत. या संदर्भात कारखानदारांना वारंवार सूचनाही देण्यात आल्या आहेत. ही रक्कम अदा करण्यासाठी कारखानदारांना अडचण असेल तर त्यांनी बफर स्टॉकवर कर्ज घेतल्यास त्याच्या पुनर्गठनाचाही पर्याय ठेवला आहे. हे लक्षात घेता पाच सप्टेंबरच्या आत माझ्यासह सर्वांनी शेतकºयांची बिले द्यावीत, असा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला. साखरेचे दर आणि कारखानदारांकडे विक्रीअभावी पैसा थकलेला आहे, याची जाण सरकारला आहे. हा व्यवसाय ठप्प पडू देणार नाही, यासाठी सरकारचे प्रयत्न असल्याचे ते म्हणाले.

ऊस गाळप हंगाम येत्या एक आॅक्टोबरपासून सुरू होणार आहे. विक्रीसाठी कारखान्यावर येणाºया उसाच्या वजनामध्ये होणारी फसवणूक रोखण्यासाठी भरारी पथक नियुक्त केले जाईल. यात वजनमापे कार्यालयातील अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रतिनिधी, शेतकरी संघटनेचा प्रतिनिधी आदींचा समावेश असेल. वजनकाट्यात अनियमितता आढळल्यास या पथकाच्या अहवालानुसार कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले. उसाच्या शेतीसाठी जलयुक्त शिवार योजना फायदेशीर आहे. मुख्यमंत्र्यांचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून यातून शेतकºयांच्या जीवनात क्रांती होत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. 

सोलापूरचे ब्रँडिंग महाराष्टÑभर करणार- सोलापूरचे ब्रँडिंग महाराष्टÑभर करणार असल्याचा मनोदय सुभाष देशमुख यांनी यावेळी व्यक्त केला. ते म्हणाले, सोलापूर सोशल फाउंडेशनच्या वतीने १६ ते १८ सप्टेंबर या काळात पुण्यामध्ये तीन दिवसीय सोलापूर महोत्सव घेतला जाणार आहे. त्यानंतर नागपूर आणि इचलकरंजीतही असा महोत्सव घेण्याचे नियोजन आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरSubhash Deshmukhसुभाष देशमुखSugar factoryसाखर कारखानेFarmerशेतकरी