शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
2
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाख मोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
3
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
4
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
5
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
6
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
7
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ
8
क्या बात! रितेश देशमुखच्या आईसाहेबांनी बल्बच्या प्रकाशात घेतलं ड्रॅगन फ्रूटचं पीक; सूनबाईंना कौतुक, शेअर केला व्हिडीओ
9
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
10
Viral Video : नवी नवरी सोबत बॉयफ्रेंडलाही घेऊन आली; सासरच्या घरात कुठे लपवला व्हिडीओ बघाच
11
...तर १ जानेवारी २०२६ पासून तुमचं पॅन बंद होईल; बँक व्यवहारांसह सर्व महत्त्वाची कामं अडकतील
12
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
13
Claudia Sheinbaum: सुरक्षा भेदून क्लाउडिया शीनबामपर्यंत पोहोचला; भररस्त्यात स्पर्श आणि चुंबनाचा प्रयत्न!
14
भाजीवाल्याने मित्राकडून पैसे उधार घेतले अन् जिंकले ११ कोटी; आता देणार मोठं 'थँक यू' गिफ्ट
15
Numerology: अंकशास्त्रानुसार आपल्यासाठी कोणत्या जन्मतारखेची व्यक्ती परफेक्ट जोडीदार असते?
16
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
17
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
18
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
19
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
20
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?

सोलापूर अन् उस्मानाबाद जिल्ह्यातील २६ कारखान्यांवर आरसीसी अंतर्गत कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2022 16:40 IST

साखर कारखानदार हाजीर हो : शेतकऱ्यांचे पैसे थकविणाऱ्या कारखान्यांची सुनावणी

सोलापूर : शेतकऱ्यांनी तक्रारी करूनही उसाचे पैसे दिले जात नसल्याने उस्मानाबादसोलापूर जिल्ह्यातील २६ साखर कारखान्यांवर आरआरसीअंतर्गत कारवाईचा प्रस्ताव सोलापूर प्रादेशिक उपसंचालक कार्यालयाने पाठविला आहे. त्यावर बुधवार दिनांक ६ जुलै रोजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्याकडे सुनावणी घेण्यात येणार आहे.

सोलापूर जिल्ह्यातील यावर्षी गाळप हंगाम घेतलेल्या ३३ साखर कारखान्यांपैकी १८ कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या उसाचे पैसे थकविले आहेत. उसाचे पैसे मिळत नसल्याच्या तक्रारी शेतकरी वारंवार करीत आहेत. या तक्रारीच्या अनुषंगाने संबंधित साखर कारखान्याच्या प्रशासनाला वारंवार फोनवरून शिवाय पत्रही दिले असल्याचे सांगण्यात आले. याशिवाय थकबाकी चुकती करण्याबाबत नोटिसाही बजावल्या मात्र, शेतकऱ्यांचे एफआरपी (रास्त व किफायतशीर दर) नुसार पैसे अडकवणाऱ्या साखर कारखान्यांवर आर. आर. सी. नुसार कारवाई करण्याचा प्रस्ताव सोलापूर प्रादेशिक संचालकांनी साखर आयुक्त कार्यालयाकडे पाठविला होता. त्यानुसार साखर आयुक्त शेखर गायकवाड हे बुधवार दिनांक ६ जुलै रोजी सुनावणी घेऊन पुढील कारवाई करणार असल्याचे सांगण्यात आले.

श्री. संत दामाजी (३० कोटी ३८ लाख), श्री. मकाई ( १२ कोटी २८ लाख), लोकनेते बाबुराव पाटील अनगर ( ३२ कोटी २६ लाख), सिद्धनाथ शुगर तिर्हे ( २४ कोटी २६ लाख), जकराया ( १० कोटी), इंद्रेश्वर शुगर ( ३१ कोटी ३८ लाख), गोकुळ धोत्री ( ५ कोटी २६ लाख), बबनराव शिंदे तुर्कपिंपरी ( २४ कोटी), ओंकार चांदापुरी ( ४ कोटी १४ लाख), जयहिंद ( ७२ कोटी), विठ्ठल रिफायनरी पांडे ( ५२ कोटी २५ लाख), आष्टी शुगर ( १६ कोटी ११ लाख), भीमा टाकळी सिकंदर ( २८ कोटी), सीताराम महाराज खर्डी ( ६ कोटी), धाराशीव शुगर सांगोला (६ कोटी), शंकर सहकारी( ७ कोटी १७ लाख), सिद्धेश्वर कुमठे ( २८ कोटी ५१ लाख), विठ्ठल कार्पोरेशन ( ९ कोटी)

लोकमंगल अन् भैरवनाथ...

लोकमंगल उद्योग समूहाच्या लोकमंगल बीबीदारफळ, लोकमंगल भंडारकवठे व लोकमंगल माऊली उस्मानाबाद या तीनही साखर कारखान्यांना ऊस पुरवठा केलेल्या ऊस उत्पादकांचे एफआरपीनुसार संपूर्ण पैसे दिल्याचे लोकमंगल उद्योग समूहाने प्रादेशिक उपसंचालक ( साखर) यांना कळविले आहे. त्याप्रमाणेच भैरवनाथच्या लवंगी, विहाळ व आलेगाव येथील कारखान्यांनी मागील वर्षीची रक्कम चुकती केली असल्याचे सांगण्यात आले.

राज्यात यावर्षी गाळप घेतलेल्या २०० साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांचे ९६ टक्के पैसे दिले आहेत. सोलापूर व उस्मानाबाद जिल्ह्यातच साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांचे पैसे थकविले आहेत. त्यासाठी सुनावणी घेण्यात येत आहे. त्यात दिलेल्या मुदतीत एफआरपीनुसार पैसे दिले नाहीत तर, आर.आर.सी.ची कारवाई केली जाईल.

- शेखर गायकवाड, साखर आयुक्त, पुणे

टॅग्स :SolapurसोलापूरSugar factoryसाखर कारखानेOsmanabadउस्मानाबाद