शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर अन् उस्मानाबाद जिल्ह्यातील २६ कारखान्यांवर आरसीसी अंतर्गत कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2022 16:40 IST

साखर कारखानदार हाजीर हो : शेतकऱ्यांचे पैसे थकविणाऱ्या कारखान्यांची सुनावणी

सोलापूर : शेतकऱ्यांनी तक्रारी करूनही उसाचे पैसे दिले जात नसल्याने उस्मानाबादसोलापूर जिल्ह्यातील २६ साखर कारखान्यांवर आरआरसीअंतर्गत कारवाईचा प्रस्ताव सोलापूर प्रादेशिक उपसंचालक कार्यालयाने पाठविला आहे. त्यावर बुधवार दिनांक ६ जुलै रोजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्याकडे सुनावणी घेण्यात येणार आहे.

सोलापूर जिल्ह्यातील यावर्षी गाळप हंगाम घेतलेल्या ३३ साखर कारखान्यांपैकी १८ कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या उसाचे पैसे थकविले आहेत. उसाचे पैसे मिळत नसल्याच्या तक्रारी शेतकरी वारंवार करीत आहेत. या तक्रारीच्या अनुषंगाने संबंधित साखर कारखान्याच्या प्रशासनाला वारंवार फोनवरून शिवाय पत्रही दिले असल्याचे सांगण्यात आले. याशिवाय थकबाकी चुकती करण्याबाबत नोटिसाही बजावल्या मात्र, शेतकऱ्यांचे एफआरपी (रास्त व किफायतशीर दर) नुसार पैसे अडकवणाऱ्या साखर कारखान्यांवर आर. आर. सी. नुसार कारवाई करण्याचा प्रस्ताव सोलापूर प्रादेशिक संचालकांनी साखर आयुक्त कार्यालयाकडे पाठविला होता. त्यानुसार साखर आयुक्त शेखर गायकवाड हे बुधवार दिनांक ६ जुलै रोजी सुनावणी घेऊन पुढील कारवाई करणार असल्याचे सांगण्यात आले.

श्री. संत दामाजी (३० कोटी ३८ लाख), श्री. मकाई ( १२ कोटी २८ लाख), लोकनेते बाबुराव पाटील अनगर ( ३२ कोटी २६ लाख), सिद्धनाथ शुगर तिर्हे ( २४ कोटी २६ लाख), जकराया ( १० कोटी), इंद्रेश्वर शुगर ( ३१ कोटी ३८ लाख), गोकुळ धोत्री ( ५ कोटी २६ लाख), बबनराव शिंदे तुर्कपिंपरी ( २४ कोटी), ओंकार चांदापुरी ( ४ कोटी १४ लाख), जयहिंद ( ७२ कोटी), विठ्ठल रिफायनरी पांडे ( ५२ कोटी २५ लाख), आष्टी शुगर ( १६ कोटी ११ लाख), भीमा टाकळी सिकंदर ( २८ कोटी), सीताराम महाराज खर्डी ( ६ कोटी), धाराशीव शुगर सांगोला (६ कोटी), शंकर सहकारी( ७ कोटी १७ लाख), सिद्धेश्वर कुमठे ( २८ कोटी ५१ लाख), विठ्ठल कार्पोरेशन ( ९ कोटी)

लोकमंगल अन् भैरवनाथ...

लोकमंगल उद्योग समूहाच्या लोकमंगल बीबीदारफळ, लोकमंगल भंडारकवठे व लोकमंगल माऊली उस्मानाबाद या तीनही साखर कारखान्यांना ऊस पुरवठा केलेल्या ऊस उत्पादकांचे एफआरपीनुसार संपूर्ण पैसे दिल्याचे लोकमंगल उद्योग समूहाने प्रादेशिक उपसंचालक ( साखर) यांना कळविले आहे. त्याप्रमाणेच भैरवनाथच्या लवंगी, विहाळ व आलेगाव येथील कारखान्यांनी मागील वर्षीची रक्कम चुकती केली असल्याचे सांगण्यात आले.

राज्यात यावर्षी गाळप घेतलेल्या २०० साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांचे ९६ टक्के पैसे दिले आहेत. सोलापूर व उस्मानाबाद जिल्ह्यातच साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांचे पैसे थकविले आहेत. त्यासाठी सुनावणी घेण्यात येत आहे. त्यात दिलेल्या मुदतीत एफआरपीनुसार पैसे दिले नाहीत तर, आर.आर.सी.ची कारवाई केली जाईल.

- शेखर गायकवाड, साखर आयुक्त, पुणे

टॅग्स :SolapurसोलापूरSugar factoryसाखर कारखानेOsmanabadउस्मानाबाद