शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

सोलापूर अन् उस्मानाबाद जिल्ह्यातील २६ कारखान्यांवर आरसीसी अंतर्गत कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2022 16:40 IST

साखर कारखानदार हाजीर हो : शेतकऱ्यांचे पैसे थकविणाऱ्या कारखान्यांची सुनावणी

सोलापूर : शेतकऱ्यांनी तक्रारी करूनही उसाचे पैसे दिले जात नसल्याने उस्मानाबादसोलापूर जिल्ह्यातील २६ साखर कारखान्यांवर आरआरसीअंतर्गत कारवाईचा प्रस्ताव सोलापूर प्रादेशिक उपसंचालक कार्यालयाने पाठविला आहे. त्यावर बुधवार दिनांक ६ जुलै रोजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्याकडे सुनावणी घेण्यात येणार आहे.

सोलापूर जिल्ह्यातील यावर्षी गाळप हंगाम घेतलेल्या ३३ साखर कारखान्यांपैकी १८ कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या उसाचे पैसे थकविले आहेत. उसाचे पैसे मिळत नसल्याच्या तक्रारी शेतकरी वारंवार करीत आहेत. या तक्रारीच्या अनुषंगाने संबंधित साखर कारखान्याच्या प्रशासनाला वारंवार फोनवरून शिवाय पत्रही दिले असल्याचे सांगण्यात आले. याशिवाय थकबाकी चुकती करण्याबाबत नोटिसाही बजावल्या मात्र, शेतकऱ्यांचे एफआरपी (रास्त व किफायतशीर दर) नुसार पैसे अडकवणाऱ्या साखर कारखान्यांवर आर. आर. सी. नुसार कारवाई करण्याचा प्रस्ताव सोलापूर प्रादेशिक संचालकांनी साखर आयुक्त कार्यालयाकडे पाठविला होता. त्यानुसार साखर आयुक्त शेखर गायकवाड हे बुधवार दिनांक ६ जुलै रोजी सुनावणी घेऊन पुढील कारवाई करणार असल्याचे सांगण्यात आले.

श्री. संत दामाजी (३० कोटी ३८ लाख), श्री. मकाई ( १२ कोटी २८ लाख), लोकनेते बाबुराव पाटील अनगर ( ३२ कोटी २६ लाख), सिद्धनाथ शुगर तिर्हे ( २४ कोटी २६ लाख), जकराया ( १० कोटी), इंद्रेश्वर शुगर ( ३१ कोटी ३८ लाख), गोकुळ धोत्री ( ५ कोटी २६ लाख), बबनराव शिंदे तुर्कपिंपरी ( २४ कोटी), ओंकार चांदापुरी ( ४ कोटी १४ लाख), जयहिंद ( ७२ कोटी), विठ्ठल रिफायनरी पांडे ( ५२ कोटी २५ लाख), आष्टी शुगर ( १६ कोटी ११ लाख), भीमा टाकळी सिकंदर ( २८ कोटी), सीताराम महाराज खर्डी ( ६ कोटी), धाराशीव शुगर सांगोला (६ कोटी), शंकर सहकारी( ७ कोटी १७ लाख), सिद्धेश्वर कुमठे ( २८ कोटी ५१ लाख), विठ्ठल कार्पोरेशन ( ९ कोटी)

लोकमंगल अन् भैरवनाथ...

लोकमंगल उद्योग समूहाच्या लोकमंगल बीबीदारफळ, लोकमंगल भंडारकवठे व लोकमंगल माऊली उस्मानाबाद या तीनही साखर कारखान्यांना ऊस पुरवठा केलेल्या ऊस उत्पादकांचे एफआरपीनुसार संपूर्ण पैसे दिल्याचे लोकमंगल उद्योग समूहाने प्रादेशिक उपसंचालक ( साखर) यांना कळविले आहे. त्याप्रमाणेच भैरवनाथच्या लवंगी, विहाळ व आलेगाव येथील कारखान्यांनी मागील वर्षीची रक्कम चुकती केली असल्याचे सांगण्यात आले.

राज्यात यावर्षी गाळप घेतलेल्या २०० साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांचे ९६ टक्के पैसे दिले आहेत. सोलापूर व उस्मानाबाद जिल्ह्यातच साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांचे पैसे थकविले आहेत. त्यासाठी सुनावणी घेण्यात येत आहे. त्यात दिलेल्या मुदतीत एफआरपीनुसार पैसे दिले नाहीत तर, आर.आर.सी.ची कारवाई केली जाईल.

- शेखर गायकवाड, साखर आयुक्त, पुणे

टॅग्स :SolapurसोलापूरSugar factoryसाखर कारखानेOsmanabadउस्मानाबाद