शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर अन् उस्मानाबाद जिल्ह्यातील २६ कारखान्यांवर आरसीसी अंतर्गत कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2022 16:40 IST

साखर कारखानदार हाजीर हो : शेतकऱ्यांचे पैसे थकविणाऱ्या कारखान्यांची सुनावणी

सोलापूर : शेतकऱ्यांनी तक्रारी करूनही उसाचे पैसे दिले जात नसल्याने उस्मानाबादसोलापूर जिल्ह्यातील २६ साखर कारखान्यांवर आरआरसीअंतर्गत कारवाईचा प्रस्ताव सोलापूर प्रादेशिक उपसंचालक कार्यालयाने पाठविला आहे. त्यावर बुधवार दिनांक ६ जुलै रोजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्याकडे सुनावणी घेण्यात येणार आहे.

सोलापूर जिल्ह्यातील यावर्षी गाळप हंगाम घेतलेल्या ३३ साखर कारखान्यांपैकी १८ कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या उसाचे पैसे थकविले आहेत. उसाचे पैसे मिळत नसल्याच्या तक्रारी शेतकरी वारंवार करीत आहेत. या तक्रारीच्या अनुषंगाने संबंधित साखर कारखान्याच्या प्रशासनाला वारंवार फोनवरून शिवाय पत्रही दिले असल्याचे सांगण्यात आले. याशिवाय थकबाकी चुकती करण्याबाबत नोटिसाही बजावल्या मात्र, शेतकऱ्यांचे एफआरपी (रास्त व किफायतशीर दर) नुसार पैसे अडकवणाऱ्या साखर कारखान्यांवर आर. आर. सी. नुसार कारवाई करण्याचा प्रस्ताव सोलापूर प्रादेशिक संचालकांनी साखर आयुक्त कार्यालयाकडे पाठविला होता. त्यानुसार साखर आयुक्त शेखर गायकवाड हे बुधवार दिनांक ६ जुलै रोजी सुनावणी घेऊन पुढील कारवाई करणार असल्याचे सांगण्यात आले.

श्री. संत दामाजी (३० कोटी ३८ लाख), श्री. मकाई ( १२ कोटी २८ लाख), लोकनेते बाबुराव पाटील अनगर ( ३२ कोटी २६ लाख), सिद्धनाथ शुगर तिर्हे ( २४ कोटी २६ लाख), जकराया ( १० कोटी), इंद्रेश्वर शुगर ( ३१ कोटी ३८ लाख), गोकुळ धोत्री ( ५ कोटी २६ लाख), बबनराव शिंदे तुर्कपिंपरी ( २४ कोटी), ओंकार चांदापुरी ( ४ कोटी १४ लाख), जयहिंद ( ७२ कोटी), विठ्ठल रिफायनरी पांडे ( ५२ कोटी २५ लाख), आष्टी शुगर ( १६ कोटी ११ लाख), भीमा टाकळी सिकंदर ( २८ कोटी), सीताराम महाराज खर्डी ( ६ कोटी), धाराशीव शुगर सांगोला (६ कोटी), शंकर सहकारी( ७ कोटी १७ लाख), सिद्धेश्वर कुमठे ( २८ कोटी ५१ लाख), विठ्ठल कार्पोरेशन ( ९ कोटी)

लोकमंगल अन् भैरवनाथ...

लोकमंगल उद्योग समूहाच्या लोकमंगल बीबीदारफळ, लोकमंगल भंडारकवठे व लोकमंगल माऊली उस्मानाबाद या तीनही साखर कारखान्यांना ऊस पुरवठा केलेल्या ऊस उत्पादकांचे एफआरपीनुसार संपूर्ण पैसे दिल्याचे लोकमंगल उद्योग समूहाने प्रादेशिक उपसंचालक ( साखर) यांना कळविले आहे. त्याप्रमाणेच भैरवनाथच्या लवंगी, विहाळ व आलेगाव येथील कारखान्यांनी मागील वर्षीची रक्कम चुकती केली असल्याचे सांगण्यात आले.

राज्यात यावर्षी गाळप घेतलेल्या २०० साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांचे ९६ टक्के पैसे दिले आहेत. सोलापूर व उस्मानाबाद जिल्ह्यातच साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांचे पैसे थकविले आहेत. त्यासाठी सुनावणी घेण्यात येत आहे. त्यात दिलेल्या मुदतीत एफआरपीनुसार पैसे दिले नाहीत तर, आर.आर.सी.ची कारवाई केली जाईल.

- शेखर गायकवाड, साखर आयुक्त, पुणे

टॅग्स :SolapurसोलापूरSugar factoryसाखर कारखानेOsmanabadउस्मानाबाद