शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
7
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
8
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
9
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
10
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
11
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
12
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
13
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
14
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
15
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
16
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
17
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
18
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
19
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

अकोले बु येथे अपघात, दोन युवक जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 12:24 IST

जखमींना वेळेत उपचार मिळू शकले नाहीत. बराच वेळ ते दोघेही अपघातस्थळी पडून होते

ठळक मुद्देअपघाताची फिर्याद सुरेश ज्ञानेश्वर माने यांनी दिली सागर शरद माने व सुहास शिंदे हे दोघे शेतीविषयक औषधांच्या कंपनीत काम करीत होते

पंढरपूर/टेंभुर्णी : टेंभुर्णी-पंढरपूर रोडवरील अकोले बु. (ता. माढा) येथे कार व मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात वाखरी (ता. पंढरपूर) येथील दोन युवकांचा मृत्यू झाला. ही घटना वाखरी परिसरात घडली.

सागर शरद माने (वय २६) आणि त्याचा मित्र सुहास दादासाहेब शिंदे (वय २८, दोघे रा. वाखरी, ता. पंढरपूर) अशी अपघातात मयत झालेल्या तरुणांची नावे आहेत. सागर शरद माने व सुहास शिंदे हे दोघे त्यांच्याकडील मोटरसायकल (क्र. एम. एच. १३/ सी.डब्लू. १४७८) वरून पंढरपूरला निघाले होते. ते अकोले बु. येथे आले असता त्यांच्या मोटरसायकलला समोरून येणाºया कार (क्र. एम.एच. १३/ ए.झेड. ८९१६)ने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात माने हा जागीच ठार झाला तर शिंदे हा अकलूजकडे उपचारास घेऊन जाताना वाटेत मयत झाला. अपघाताची माहिती मिळताच टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे पोहेकॉ. दिलीप केंगार व पोकॉ. भोये यांनी घटनास्थळी भेट दिली. शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.

अपघाताची फिर्याद सुरेश ज्ञानेश्वर माने यांनी दिली असून, कारचालक रणजित राजू बुधनेर (रा. नारायण चिंचोली, ता. पंढरपूर) याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. तपास पोहेकॉ. दिलीप केंगार करीत आहेत.

उपचाराला विलंब- जखमींना वेळेत उपचार मिळू शकले नाहीत. बराच वेळ ते दोघेही अपघातस्थळी पडून होते. यानंतर त्यांना उपचारासाठी हलविण्यात आले. सागर शरद माने व सुहास शिंदे हे दोघे शेतीविषयक औषधांच्या कंपनीत काम करीत होते. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीसAccidentअपघात