दुर्लक्षामुळेच अपघात

By Admin | Updated: July 6, 2014 00:18 IST2014-07-06T00:18:08+5:302014-07-06T00:18:08+5:30

नीलम गोऱ्हे ; पंढरपूर येथे पत्रकार परिषद

Accident due to ignorance | दुर्लक्षामुळेच अपघात

दुर्लक्षामुळेच अपघात


पंढरपूर : आषाढी यात्रेच्या सोहळ्यासाठी येणाऱ्या प्रमुख दिंड्यांकडेच शासनाचे लक्ष असते; अन्य छोट्या दिंड्यांना शासन सुरक्षा देत नसल्याने भाविकांचे अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे, असे शिवसेनेच्या प्रवक्त्या नीलम गोऱ्हे यांनी सांगितले. शनिवारी पंढरपूर दौऱ्यावर आल्या असता पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या़
आढीव (ता. पंढरपूर) येथील विसाव्याजवळ अमरावतीवरून पायी आलेल्या दिंडीत कार घुसल्याने जखमी झालेल्या वारकऱ्यांना पाहण्यासाठी गोऱ्हे पंढरपूरला आल्या होत्या. यावेळी जिल्हाप्रमुख धनंजय डिकोळे, प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे, तालुकाप्रमुख संभाजी शिंदे, शहरप्रमुख संदीप केंदळे, शहर उपप्रमुख ओंकार बसवंती उपस्थित होते.
आषाढी यात्रेसाठी अनेक दिंड्या येत असतात. सोलापूरचा हाय-वे बनवताना पालख्यांसाठी एक ट्रॅक बनवला असता तर वारकऱ्यांची सोय झाली असती. यात्रा कालावधीनंतर तो ट्रॅक दुचाकी सायकल व मोटरसायकलवाल्यांना वापरता आला असता.
आषाढी यात्रा ही प्रत्येक वर्षी असते. यात्रेचे वेळापत्रक हे फार पूर्वीच जाहीर होते़ तरीही शहरातील महत्त्वाची कामे पूर्ण होत नाहीत. ऐन यात्रा कालावधीतच कामे घाईघाईने केली जातात. यावरून विभागीय आयुक्त निष्क्रियच आहेत, असेही त्या म्हणाल्या.
पंढरपूर, शिर्डी, जेजुरी व अन्य ज्या ठिकाणी देवस्थाने आहेत त्या ठिकाणी नगरपालिका व मंदिर मिळून विकास आराखडा तयार केल्याने तेथे विकास झाला आहे. पंढरीतही नगरपालिका व मंदिर समितीने समन्वय साधून विकास केला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
-------------------------------
शौचालये खराब
आषाढी यात्रेत स्वच्छता रहावी यासाठी उच्च न्यायालयाने पंढरीत ४५०० शौचालये बांधण्याचे आदेश दिले. यात्रेपूर्वी शौचालयांची सोय व्हावी, यासाठी तरटांचे शौचालय बांधण्याचे काम सुरू आहे. परंतु ही शौचालये ५ ते ७ वेळा वापरल्यास खराब होतील, असे नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.

Web Title: Accident due to ignorance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.