शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

शैक्षणिक समुपदेशन, काळाची गरज...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 11:51 IST

मागील काही वर्षांत शिक्षण क्षेत्रात प्रचंड बदल झालेला आहे. अनेक नवीन शिक्षण संस्था व त्या अंतर्गत नवीन कोर्सेस सुरू ...

ठळक मुद्देविद्यार्थ्यांचा सर्व उन्नतीसाठी किंवा प्रगतीसाठी विषय ज्ञानाबरोबर विद्यार्थ्यांची मानसिकता योग्यरितीने वाढीस ज्याचा प्रचलित शिक्षणपद्धतीमध्ये किंवा अभ्यासक्रमामध्ये फारसा समावेश नाही

मागील काही वर्षांत शिक्षण क्षेत्रात प्रचंड बदल झालेला आहे. अनेक नवीन शिक्षण संस्था व त्या अंतर्गत नवीन कोर्सेस सुरू झालेले आहेत. भवितव्य घडण्यासाठी अनेक नवीन क्षेत्रं उपलब्ध झाली आहेत. अनेक व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू झाले आहेत व या सर्व कोर्सेसची शैक्षणिक संस्थातर्फे आक्रमक प्रसिद्धी होत आहे. यामुळे पालक व विद्यार्थी यांच्यामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. याशिवाय या सर्व कोर्सेसची  व त्यामधील भवितव्य घडणीची योग्य व संपूर्ण माहिती पालक व विद्यार्थी यांना मिळत नाही. अर्धवट माहितीवर भवितव्य दिशा निवडल्यास विद्यार्थ्यांचे कायमस्वरुपी नुकसान होऊ शकते. 

शैक्षणिक समुपदेशनाद्वारे विद्यार्थ्यांची आवड व क्षमता लक्षात घेतली जाते व त्याप्रमाणे त्याला मार्गदर्शन केले जाते. बºयाचवेळा पालकाच्या आग्रहास्तव किंवा इच्छेखातर विद्याशाखा निवडली जाते, परंतु त्यादृष्टीने त्या विषयात विद्यार्थ्यांची क्षमता नसते व त्यामुळे मानसिकताही नसते. म्हणून बºयाचवेळा अपयश येते व विद्यार्थी मानसिकदृष्ट्या खचतो. 

मानसोपचार तज्ज्ञांच्या सर्वेक्षणानुसार  सद्यस्थितीत विद्यार्थ्यांचे सर्व कृतीमध्ये ३० % बुध्यांक व ७० % भावनांकाचा प्रभाव असतो. हल्लीच्या युवा पिढीच्या कृतीवर भावनांचा प्रभाव जास्त प्रमाणात आढळून येतो. त्यामुळे कोणतीही कृती करताना विद्यार्थी त्या कृतीचे बुद्धीने विश्लेषण न करता भावनेच्या आहारी जाताना आढळतो. बहुतेकवेळा जीवनातील महत्त्वाचे निर्णय घेताना चुका होतात किंवा चुकीची दिशा निवडली जाते. यासाठी हल्लीच्या युगात पालक फार मोठ्या प्रमाणात जबाबदार आहेत. मुलांवर (पाल्यांवर) हक्क गाजवताना आपण त्यांच्या भावना ज्याचा भवितव्याशी संबंध आहे, हे लक्षात घेत नाही. 

प्रशिक्षित तज्ज्ञशिक्षक हे विषयतज्ज्ञ असतात त्यांनी दिलेले शिक्षण किंवा समुपदेशन हे त्याविषयाच्या ज्ञानापुरते मर्यादित असते. त्यांच्या शिकवण्याचा किंवा समुपदेशनाचा उपयोग हा विद्यार्थ्यांचा बुध्यांक वाढविण्यासाठी नक्कीच होतो, परंतु त्याचा विद्यार्थ्यांच्या मानसिकतेशी किंवा भावनांशी फारसा संबंध येत नाही. 

विद्यार्थ्यांचा सर्व उन्नतीसाठी किंवा प्रगतीसाठी विषय ज्ञानाबरोबर विद्यार्थ्यांची मानसिकता योग्यरितीने वाढीस लागणे, हेही महत्त्वाचे आहे. ज्याचा प्रचलित शिक्षणपद्धतीमध्ये किंवा अभ्यासक्रमामध्ये फारसा समावेश नाही. यासाठी शिक्षक किंवा पालक याशिवाय त्रयस्थ समुपदेशकाची आवश्यकता लागते. समुपदेशक विद्यार्थ्यांच्या मानसिकतेच्या स्वभावाचा ज्या वातावरणात विद्यार्थी वाढला आहे. त्या वातावरणाचा विश्लेषण करून विद्यार्थ्यांच्या भावनिक परिस्थितीचा अभ्यास करतो व त्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक भावना वाढीस लागणे व नकारात्मक भावना कमी होणे. यादृष्टीने प्रयत्न करणे हा मानसोपचार असून यामुळे विद्यार्थ्यांच्या भावनांकाच्या बरोबर बुद्ध्यांक वाढीस लागतो व विद्यार्थ्यांची मानसिकता योग्य भवितव्याच्या दृष्टिकोनातून तयार होते. 

यास्तव विद्यार्थ्याला विविध कोर्सेसची योग्य माहिती, संस्थांची माहिती देण्यासाठी ब्रेन शैक्षणिक सल्ला केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. या केंद्रातर्फे विद्यार्थ्यांची आवड व क्षमता लक्षात घेऊन योग्य क्षेत्र निवडीस मदत केली जाते. एवढेच नव्हे तर सदर क्षेत्रातील योग्य संस्था निवड अभ्यास करण्याची पद्धती व योग्य नियोजन करून दिले जाते. यशाचे शिखर गाठेपर्यंत विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी मागोवा घेतला जातो.- शलाका कुलकर्णी(लेखिका बाल व कुमार मानसोपचार अभ्यासक आहेत)

टॅग्स :SolapurसोलापूरEducationशिक्षणSchoolशाळा