शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
2
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
3
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
4
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
5
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
6
T20 World Cup वर दहशतवादी हल्ल्याचे सावट; उत्तर पाकिस्तानमधून आली धमकी
7
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
8
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
9
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
10
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
11
Nexon EV Review: टाटा नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
12
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम
13
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
14
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
15
Video: कुटुंबासह अयोध्येत पोहोचला प्रसाद ओक; रामलला चरणी झाला नतमस्तक
16
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
17
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
18
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
19
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
20
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा

कर्जमाफीसाठी आलेले जिल्हा बँकेकडील २७५ कोटी जुनी देण्यातच गेले,  आजही राज्य बँकेचे ६०० कोटींचे कर्ज !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 2:51 PM

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतून शेतकºयांच्या कर्जमाफीसाठी शासनाकडून आलेले २७५ कोटी ४९ लाख २५ हजार १०७ रुपये ९१ पैसे जिल्हा बँकेने शासकीय कर्जरोखे व काढलेल्या कर्जात जमा केले आहेत.

ठळक मुद्देराज्य बँकेचे आजही जिल्हा बँकेवर ६०० कोटी रुपये कर्जसोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक मोठ्या आर्थिक टंचाईत होतीकारखानदार थकित कर्ज भरत नसल्याने शेतकºयांनीही पैसे भरण्याकडे पाठबँक कर्जमुक्त करण्याला प्राधान्य

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि १४ : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतून शेतकºयांच्या कर्जमाफीसाठी शासनाकडून आलेले २७५ कोटी ४९ लाख २५ हजार १०७ रुपये ९१ पैसे जिल्हा बँकेने शासकीय कर्जरोखे व काढलेल्या कर्जात जमा केले आहेत. राज्य बँकेचे आजही जिल्हा बँकेवर ६०० कोटी रुपये कर्ज असल्याचे अध्यक्ष राजन पाटील यांनी सांगितले.सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक मोठ्या आर्थिक टंचाईत होती. बँकेच्या बड्या संचालकांनीच काढलेले कर्ज न भरल्याने जिल्हाभरातील शेतकरीही कर्ज भरण्यास तयार नाहीत. याचा परिणाम थकबाकी वाढीत भर टाकण्यात झाला. कारखानदार थकित कर्ज भरत नसल्याने शेतकºयांनीही पैसे भरण्याकडे पाठ फिरवली. राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजना जाहीर केल्याने शेतकºयांकडील थकबाकी बºयापैकी वसूल होणार आहे. सुमारे ४०० कोटी रुपये शेतकºयांकडील थकबाकी वसूल होईल, असे बँकेचे अध्यक्ष पाटील यांनी सांगितले. आतापर्यंत शासनाकडून आलेली कर्जमाफीची २७५ कोटी ४९ लाख २५ हजार १०७ रुपये इतकी रक्कम बँकेची जुनी देणी देण्यातच गेली आहे. शासकीय कर्ज रोख्यात रोखता व तरलता(सी.आर.आर. व एस.एल. आर.) मध्ये १६० कोटी रुपयांची गुंतवणूक केली असून, ही गुंतवणूक आता ३५२ कोटी ४६ लाख रुपये इतकी झाली आहे. राज्य बँकेचे जिल्हा बँकेकडे ४९९ कोटी रुपये इतके कर्ज असून, यापैकी ६० कोटी रुपयांचा भरणा कर्जमाफीच्या रकमेतून करण्यात आला.पुनर्गठणासाठी राज्य बँकेचे १३ कोटी ५० लाख रुपये ९.७५ टक्के दराने कर्ज काढले होते. हे १३ कोटी ५० लाख रुपये कर्ज भरणा करण्यात आला़ राज्य बँकेत जिल्हा बँकेची ३०० कोटी रुपयांची ठेव आहे. नोटाबंदीच्या कालावधीत चलनातील नोटांचा तुटवडा असल्याने १५० कोटी रुपये त्यावर कर्ज काढले होते. त्यापैकी ४१ कोटी ९९ लाख रुपयांचा कर्जापोटी भरणा केला असल्याचे सांगण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफीतून मिळालेली संपूर्ण २७५ कोटी ४९ लाख २५ हजार इतकी रक्कम बँकेची जुनी देणी देण्यातच गेली असून, आता नव्याने येणारी रक्कमही अशाच पद्धतीने उर्वरित कर्ज देण्यासाठी वापरली जाणार आहे. आजही बँकेवर ६०० कोटी रुपयांचे राज्य बँकेचे कर्ज असून, हे देणे देण्याला प्राधान्य दिले जाणार असल्याचे बँकेचे अध्यक्ष पाटील यांनी सांगितले.----------------------------बँक कर्जमुक्त करण्याला प्राधान्य- राज्य बँक, नाबार्ड अशा वित्तीय संस्थांकडून कमी व्याजाने रक्कम घेऊन ती शेतकºयांना कर्जाने दिली जाते. परंतु बहुतांशी शेतकरी घेतलेले कर्ज भरत नाहीत, मात्र राज्य बँक आमच्याकडून वसूल करते. पुन्हा कर्जमाफीची वाट शेतकरी व आम्हाला पाहावी लागते. यामुळे बँक अडचणीत येत असल्याने नव्याने कर्जच काढायचे नाही व पीक कर्जाच्या माध्यमातून होणारे गैरप्रकार थांबवण्याचा आमचा प्रयत्न राहणार असल्याचे बँकेचे अध्यक्ष राजन पाटील यांनी सांगितले. 

टॅग्स :Solapurसोलापूर