शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

 विठ्ठल साखर कारखान्याच्या चेअरमनपदी अभिजित पाटील तर व्हाइस चेअरमनपदी प्रेमलता रोंगे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2022 15:20 IST

 कारखान्याच्या ४५ वर्षाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच पाहिला उपाध्यक्ष मान मिळाला.

पंढरपूर : पंढरपूर येथील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी अभिजीत पाटील यांचे तर उपाध्यक्षपदी प्रेमलता रोंगे यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली.

कारखान्याच्या नूतन संचालकांची आज कारखाना कार्यस्थळावर निवडणूक निर्णय अधिकारी नागेश पाटील यांच्या उपस्थितीत सभा पार पडली. यामध्ये अध्यक्षपदी अभिजीत पाटील यांची तर उपाध्यक्षपदी  प्रेमलता रोंगे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.  कारखान्याच्या ४५ वर्षाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच पाहिला उपाध्यक्ष मान मिळाला.

विठ्ठल कारखान्याच्या चाव्या तिसऱ्यांदा पाटलाच्या हाती

श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची स्थापना तत्कालीन चेअरमन कर्मवीर कै. औदुंबरअण्णा पाटील यांनी केली आहे. औदुंबरअण्णा पाटील यांच्या कारकिर्दीचे, उत्कृष्ट कारभाराचे आजही राज्यभर दाखले दिले जातात. त्यांच्यानंतर कै. राजाभाऊ पाटील, कै. वसंतदादा काळे, कै. भारत भालके आणि भगीरथ भालके यांनी कारखान्याचे चेअरमन म्हणून काम पाहिले. 

मागील चार वर्षांपासून कारखान्यावर अधिक कर्जांचा डोंगर झाला. यामुळे अनेक शेतकरी संघटना, सभासदांनी आंदोलन केले. यामुळे जशी अण्णांची कारकिर्द उत्कृष्ट कारभार म्हणून ओळखली जात होती. त्याप्रमाणे भालके यांची कारकिर्द आंदोलने गाजली आहेत. परंतु मागील १५ दिवसांत झालेल्या कारखान्याच्या निवडणुकीत भालके गटाचा पराभव करत अभिजीत पाटील यांनी विजय मिळवला. कारखान्याचे चेअरमन होणारे तिसरे पाटील आहेत. यामुळे हे पाटील कारखान्याला डबघाईतून वर काढतील, कारखाना बंद पाडतील की, सुरू करतील. सभासद, ठेकेदारांची देणी देतील का? याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरSugar factoryसाखर कारखानेPandharpurपंढरपूरElectionनिवडणूकPoliticsराजकारण