शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
4
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
5
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
6
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
7
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
8
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
9
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
10
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
11
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
12
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
13
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
14
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
15
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
16
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
17
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
18
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
19
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
20
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?

अब्दुल सत्तारांनी वारकऱ्यांना घातले साकडे; काय आहे नेमकी बातमी ? वाचा सविस्तर

By appasaheb.patil | Updated: November 4, 2022 16:44 IST

पंढरपुरात झाली प्रबोधनपर बैठक

सोलापूर/ पंढरपूर : वारकरी संप्रदायाने गावोगावी होणाऱ्या भजन कीर्तनाच्या माध्यमातून प्रबोधनाद्वारे समाजाला जागृत करण्याचे काम केले. यामुळे समाजातील अनेकांचे संसार सुखी झाले आहेत. याच माध्यमातून शेतकऱ्यांचेही प्रबोधन केले तर शेतकरी कधीही आत्महत्या करणार नाही. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, नुकसानग्रस्त एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज येथे दिली.

शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत वारकरी संप्रदायातील वारकरी व फडकरी समवेत आयोजित प्रबोधनपर बैठकीत ते बोलत होते. संत तुकाराम भवन येथे आयोजित या बैठकीस आमदार डॉ. बालाजी किणीकर, बापूसाहेब देहुकर, गणेश महाराज शिंदे, विठ्ठल पाटील, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी बाळासाहेब शिंदे, उपविभागीय कृषि अधिकारी आर. एन. कांबळे, सर्जेराव तळेकर यांच्यासह वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कृषिमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले, वारकरी, फडकरी यांच्या प्रत्येक शब्दाला समाजात मान असून, समाजाला भजन, कीर्तनाच्या माध्यमातून जागृत करण्याचे काम ते करतात. शेत पिकांमुळे नुकसान होऊन शेतकरी कर्जबाजारी झाला तर आत्महत्त्या हा पर्याय नाही. राज्याचे मुख्यमंत्री हे शेतकऱ्यांचे मंत्री आहेत. मागील आठवड्यात नियमित कर्जफेड करणाऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान दिले. राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी विविध विकास योजना आणत आहे, शेतकऱ्यांनी या योजनांचा लाभ घेवून तसेच विविध आधुनिक कृषि तंत्राचा वापर करून आपली प्रगती करावी. शेतकरी आत्महत्या करणार नाही, याबाबत वारकरी, फडकरी यांनी पुढाकार घेऊन समाज प्रबोधन करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

कृषिमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले, परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पीक विम्याच्या माध्यमातून, राज्य व केंद्र सरकारकडून भरीव मदत करण्यात येणार आहे. नुकसानीची अंतिम आकडेवारी चार दिवसात हाती येईल. ३३ टक्के पाऊस झाला असेल त्या ठिकाणचा देखील पंचनामा करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच शेतीसाठी १२ तास वीजपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात येणार असल्याचे सांगितले. निसर्गाच्या लहरीपणामुळे नैसर्गिक संकटे आली तर योग्य नुकसान भरपाई देऊ, कृषि मालाला चांगला व योग्य दर देण्याचा प्रयत्न करू, असेही ते म्हणाले.

बापूसाहेब देहूकर म्हणाले, शेतकऱ्यांनी आत्महत्या करायची नाही, हे संत तुकाराम महाराज यांनी चारशे वर्षांपूर्वी सांगितले आहे. समुद्राचे पाणी वाढत नाही, दुष्काळ पडला म्हणून कमी होत नाही, हे शेतकरी बांधवांनी लक्षात ठेवावे. परंतु, परिस्थिती शेतकऱ्यांना हतबल करते, त्यामुळे शेतकरी आत्महत्येस प्रवृत्त होतो. सध्याचे शासन हे शेतकऱ्यांची काळजी घेणारे शासन असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpurपंढरपूरPandharpur Wariपंढरपूर वारीAbdul Sattarअब्दुल सत्तारFarmerशेतकरीagricultureशेतीmahavitaranमहावितरण