शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

अबब... उजनी धरणात पकडली ११० किलो वजनाची मगर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2019 10:38 IST

मच्छीमार बांधवांचे साहस: दोन तास चालला थरार; दहा फूट लांब, तीन फूट रुंद

ठळक मुद्देगेल्या चार दिवसांपासून सोलापुरात मगर आढळल्याची चर्चाअखेर पकडलेली ही मगर वनविभागाकडे सुपूर्द करण्यात आलीतीन तास उलटून गेले तरी वनविभागाचा एकही अधिकारी आला नव्हता

भीमानगर: गेल्या चार दिवसांपासून सोलापुरात मगर आढळल्याची चर्चा सुरू असताना आज (रविवारी) उजनी धरणामध्ये चक्क ११० किलो वजनाची मगर मच्छीमार बांधवांनी जीव धोक्यात घालून पकडली. तब्बल दोन तास हा थरार सुरू होता. अखेर पकडलेली ही मगर वनविभागाकडे सुपूर्द करण्यात आली.

रविवारी सकाळी सहाच्या सुमारास भीमानगर येथील मच्छीमार बांधव मासे पकडण्यासाठी उजनी धरणाच्या काठावर गेले. धरणावर ड्यूटीसाठी असलेल्या साखरे यांनी त्यांना थांबवले. धरणाच्या काठावर मगर असल्याचे त्यांनी सांगितले. मग तिला जेरबंद करण्यासाठी साखरे यांनी प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घेऊन आजूबाजूच्या लोकांना सांगितले. मच्छीमार बांधवांनी आपल्या सहकाºयांना फोन करून बोलावले. साधारण १० फूट लांब व तीन फूट रुंद असलेली अन् १०० ते ११० किलो वजन असलेली मगर काठावर ऐसपैस पसरून बसल्याचे सर्वांनी पाहिले.

भीमानगरच्या मच्छीमार बांधवांनी अन्य नागरिकांच्या सहकार्याने दोरखंड, जाळ्यांच्या साह्याने जेरबंद करण्यासाठी प्रयत्न चालवला. तब्बल दोन तास हा थरार सुरू होता. दरम्यान, सकाळी सहा वाजताच मच्छीमार बांधवांनी ही खबर सोशल मीडियावर पोस्ट केली. परंतु वनविभागाला, पोलीस स्टेशनला खबर देऊनही तीन तास उलटून गेले तरी वनविभागाचा एकही अधिकारी आला नव्हता. 

धरणावर मगर दिसल्याच्या वार्तेने बघ्यांची एकच गर्दी उसळली. त्यांना पांगवण्यासाठी अनेकांना शिकस्त करावी लागली. काही हौशी मंडळी मगरीसमवेत सेल्फी घेण्यात धन्यता मानत असल्याचेही चित्र दिसून आले. या पकडलेल्या मगरीजवळ वनविभाग कर्मचाºयाचे बंदोबस्त नसल्याने जो येईल तो हात लावून मगरीच्या अंगावरून हात फिरवत होता. यामुळे कदाचित मगर सुटली असती तर मोठा अनर्थ झाला असता. मात्र चार तासांनंतर दहा वाजता वनविभागाचे कर्मचारी येऊन मगरीला घेऊन गेले. वन अधीक्षकांच्या आदेशानुसार पुढील कार्यवाही केली जाईल, असे सांगण्यात आले. 

धरण काठावर दहशत; कर्मचारी नियुक्तीची मागणी - मगर दिसल्याच्या वार्तेने उजनी जलाशय काठच्या लोकांमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे. गेल्या तीन वर्षांपासून धरणात मगरी आहेत, अशा चर्चा सुरू होत्या. आज प्रत्यक्षात पाहायला मिळाले. अजूनही उजनीत मगरी आहेत, यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. यामुळे नागरिकांमधून कायमस्वरूपी वन विभागाकडून एका कर्मचाºयाची नियुक्ती करावी, दररोज गस्त घालण्याची मागणी नेताजी चमरे यांच्यासह मच्छीमार बांधवांनी केली आहे. 

यांनी  दाखवले साहस-  ही मगर पकडण्यासाठी महादेव नगरे, मामू भोई, शांतिलाल नगरे, नितीन सल्ले, सूरज नगरे, अशोक पतुले, नेताजी चमरे, दशरथ पतुले, संदीप खानेवाले, रवींद्र नगरे, पिंटू सल्ले, अशोक चमरे, भगवान भोई, मामू खानेवाले, हनुमंत माने, धनाजी कारंडे, नाना मेटे व मच्छीमार बांधवांनी मदत केली.

दीड वर्षापूर्वी करमाळा तालुक्यातही पाहिली मगर

  • - उजनी धरणामध्ये यापूर्वीपासून मगरींचे वास्तव्य आहे, अशा पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या. दीड वर्षांपूर्वी करमाळा तालुक्यातील नदीकाठच्या गावातील मच्छीमार लोकांना पाहायला मिळाली होती, नागरिकांमध्ये चर्चा सुरू होती. मात्र अद्यापपर्यंत कोणावर हल्ला झाला नसल्याचे  सांगण्यात आले. प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून वनविभागाने दखल घ्यावी, असे नागरिकांचे म्हणणे  आहे. 
  • -  वनविभागाच्या कर्मचाºयांनी सांगितले, तूर्तास तरी ही आमच्या ताब्यात घेऊन जातोय. वनअधीक्षक सांगतील त्याप्रमाणे पुढील कार्यवाही केली जाईल.
  • -  वनविभागाने आतातरी उजनी वसाहतीत एका कायमस्वरूपी वनकर्मचाºयाची नेमणूक करून त्याच्यावर रोज गस्त घालण्याची जबाबदारी  सोपवावी, अशी मागणी मच्छीमार बांधवांच्या वतीने नेताजी चमरे, भीमानगर यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.
टॅग्स :SolapurसोलापूरUjine Damउजनी धरणwater shortageपाणीकपात