शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
3
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
4
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
5
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
6
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
7
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
8
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
9
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
10
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
11
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
12
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
13
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
14
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
15
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
16
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
17
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
18
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
19
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
20
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली

एकरात घेतले २९ टन फळपीक अन् उत्पन्न मिळवले अडीच लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2020 12:18 IST

विभूते कुटुंबाची यशोगाथा; कोरवलीच्या कलिंगडाची करणी पोहोचली जर्मनीत

ठळक मुद्देशेतीत पैसे घालणे, मेहनत करणे म्हणजे निसर्गाबरोबर पैज लावण्यासारखेच असतेनिसर्गाने साथ दिली तर मालामाल अन् नाही दिली तर कंगाल असा नियम असतोकोरवली (ता.मोहोळ) येथील शेतकरी लक्ष्मण विभूते यांनी अन् मिळवले एकरी  अडीच लाखांचे उत्पन्न

नितीन उघडे 

कामती : शेतीत पैसे घालणे, मेहनत करणे म्हणजे निसर्गाबरोबर पैज लावण्यासारखेच असते. निसर्गाने साथ दिली तर मालामाल अन् नाही दिली तर कंगाल असा नियम असतो. या नियमाची पैज लावली कोरवली (ता.मोहोळ) येथील शेतकरी लक्ष्मण विभूते यांनी अन् मिळवले एकरी  अडीच लाखांचे उत्पन्न. आज या कलिंगडाची करणी जर्मनीत पोहोचली आहे.

ही यशोगाथा आहे लक्ष्मण विभूते यांची़ त्यांची नऊ एकर वडिलोपार्जित शेती कोरवली येथे आहे. लक्ष्मण यांनी  इलेक्ट्रीशियन पदवीपर्यंत शिक्षण घेतले़ पण त्यांनी नोकरी केली नाही. वडिलोपार्जित असणारी शेती कसण्यातच त्यांनी आनंद मानला़ या वर्षी नऊ एकर जमिनीपैकी एक एकरात चामुंडा ५५ या वाणाच्या कलिंगडाची लागवड केली. 

दोन महिन्यापूर्वी शेतीची मशागत करून एकरी दोन ट्रॉली  शेणखत टाकले. त्यानंतर ६ फूट अंतराचे बेड तयार केले. त्यावर मल्चिंग पेपर अंथरुण ठिबक सिंचन केले़  त्यानंतर दीड फूट अंतरावर एक कलिंगडाचे रोप याप्रमाणे ६ हजार रोपांची लागवड केली. ८ ते १० दिवसांच्या अंतराने खतांची मात्रा, योग्य वेळी पाणी आणि रासायनिक खते व औषधांची मात्रा दिली. या एक एकरावर लागवडीसाठी ६० हजार रुपये खर्च केले. दोन महिन्यातच कलिंगड विक्रीसाठी आले. शेतातून मिळालेला सर्व माल दिल्ली येथे पाठवण्यात आला़ पुढे त्या व्यापाºयांनी माल जर्मनीला निर्यात केला. 

कलिंगडकडचा कल वाढला - कमी कालावधीत जास्त उत्पन्न कसे घेता येईल, यासाठी शेतकºयांचा प्रयत्न असतो. यातच मागील दोन वर्षांपासून कोरवली परिसरात अनेक शेतकरी कलिंगड लागवड करीत आहेत. या वर्षी मागील तीन महिन्यात कलिंगड लागवड करून पंचक्रोशीतून विक्रमी उत्पादन घेतले जात आहे. शेकडो एकर क्षेत्रात कलिंगड पीक पाहायला मिळते आहे़ ५० ते ६० दिवसात येणारे पीक त्यातही हमखास बाजारभाव मिळत असल्याने शेतकºयांचा कलिंगड लागवडीकडे कल वाढलेला दिसतोय़ सध्या स्थानिक बाजारपेठेसह परराज्यातून तसेच परदेशातूनही कलिंगडाला मागणी आहे. 

वडिलांनी मला इलेक्ट्रीशियन पदवीपर्यंत शिक्षण घेण्यास मदत केली. गरीब परिस्थिती असल्याने नोकरीची गरज होती़ पण गावात कलिंगडापासून जास्त उत्पन्न मिळत असल्याचे पाहून शेतीकडे वळलो. आता नोकरीची गरज नाही़ शेती करून आनंदी जीवन जगतो आहे़ प्रयोगशील शेती काळाची गरज आहे़ - लक्ष्मण विभूतेकलिंगड उत्पादक, कोरवली

टॅग्स :SolapurसोलापूरagricultureशेतीFarmerशेतकरी