शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

माढा तालुक्याची हागणदारीमुक्तीकडे वाटचाल, १०८ पैकी ७९ ग्रा़पं हागणदारीमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 5:04 PM

स्वच्छ भारत अभियानांतर्गत जि.प चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांच्या मार्गदर्शनाखाली माढा पंचायत समितीच्या अंतर्गत १०८  ग्रामपंचायतीपैंकी ७९ ग्रामपंचायती हागणदारीमुक्त झाल्या आहेत.

ठळक मुद्देमाढा तालुका सध्या ९१ टक्के  हागणदारीमुक्त ४३ हजार १७३ शौचालयापैकी ३८ हजार ९६४ बांधून वापरात आहेतगावागावात तब्बल ५ कोटी ६८ लाख  ८६ हजार ६०० रूपयांचा निधी खर्च

आॅनलाइन लोकमत सोलापूरलऊळ दि २३ : स्वच्छ भारत अभियानांतर्गत जि.प चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांच्या मार्गदर्शनाखाली माढा पंचायत समितीच्या अंतर्गत १०८  ग्रामपंचायतीपैंकी ७९ ग्रामपंचायती हागणदारीमुक्त झाल्या आहेत. प्रत्येक घरामध्ये शौचालय बांधुन त्याचा नियमित वापर करण्यासाठीचा प्रयत्न या चळवळीतून होत आहे. त्यामध्ये  तालुक्यातील उर्वरीत गावांतूनही शौचालय बांधणीला वेग आल्याचे दिसत आहे.यामुळे माढा तालुका सध्या ९१ टक्के  हागणदारीमुक्त झाला असुन १०० टक्केकडे वाटचाल करीत असल्याची माहिती गटविकास अधिकारी गोकुळदास बैरागी यांनी दिली़१०८ ग्रामपंचायतीपैकी ७९ टक्के ग्रामपंचायती सध्या हागणदारीमुक्त झाल्या असून एकुण ४३ हजार १७३ शौचालयापैकी ३८ हजार ९६४ बांधून वापरात आहेत.उर्वरित  ग्रामपंचायतीमधील ४हजार २०९ शौंचालय बांधकामासाठी स्वच्छ भारत मिशनचे तालुका समन्वयक ज्ञानेश्वर सुतार यांच्या पथकाचे काम प्रगतीपथावर आहे. स्वच्छ भारत मिशन योजनेअंतर्गत आत्तापर्यंत तालुक्यातील गावागावात तब्बल ५ कोटी ६८ लाख  ८६ हजार ६०० रूपयांचा निधी अनुदानरुपी लाभार्थ्यांसाठी खर्च करण्यात आला आहे.                  माढा तालुक्यामध्ये टेंभुर्णी, उपळाई खु, मोडनिंब, कुर्डू, उपळाई बु, रोपळे, कव्हे, बेंबळे, पिंपळनेर, भोसरे अशी काही गावे मोठ्या लोकसंख्येची आहेत. त्यामुळे तालुका हगणदारीमुक्तीच्या १०० टक्के  शौचालयाच उद्दिष्ट पूर्तिसाठी   जि प चे अध्यक्ष संजय शिंदे, माढ्याचे सभापती विक्रम शिंदे ,स्वच्छ भारत मिशनचे तालुका समन्वयक ज्ञानेश्वर सुतार व ग्रामपंचायत कर्मचारी व पदाधिकारी हे वारंवार प्रबोधन करुन आत्तापर्यंत तब्बल ९१ टक्के गावे हगणदारीमुक्त केली आहेत. त्यासाठी स्वच्छता अभियान विभागाचे कामकाज वाढवून लाभार्थ्यांचे शौचालय बांधकामाचे अनुदान काम पूर्ण होताच त्वरित देण्याच्या पद्धतीमुळे व त्यांनी केलेल्या जनजागृतीमुळे सध्या तालुका हागणदारी मुक्त होण्याच्या शिखरावरती आहे.    तालुक्यातील हागणदारी मुक्ती कडे वाटचाल करणा-या व राहीलेल्या ग्रामपंचायती पुढीलप्रमाणे आहेत- मोडनिंब,टेंभूर्णी,कुर्डु,रोपळे( क),मानेगाव,तांदुळवाडी,उपळाई(बु),उपळाई( खु), दारफळ, सुलतापुर, म्हैंसगाव, कव्हे, वाकाव, वडशिंगे, परिते, अकोले( खु),अरण, चांदज,भोगेवाडी,मुंगशी, भुताष्टे, पिंपळनेर,आहेरगाव, बारलोणी, उजनी(मा), बेंबळे, घोटी,व व्होळे (खु),बारलोणी अशी आहेत.