शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

सोलापूर जिल्ह्यात ६४८ कोटींची कर्जमाफी; तीन हजाराहून अधिक करदाते शेतकरी अपात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2021 14:58 IST

महात्मा फुले योजना कर्जमुक्ती योजना; तक्रारी निराकरणासाठी सहकारने राबविली विशेष मोहीम

सोलापूर : महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी अंतिम टप्प्यात असून योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ७२ हजार ८७७ शेतकऱ्यांना ६४८ कोटी ९८ लाख रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. एकूण ८४ हजार लाभार्थी पैकी तीन हजार शेतकरी हे करदाते असल्यामुळे त्यांना या योजनेतून वगळले. उर्वरित लाभार्थींना योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी सहकार विभागाने नोव्हेंबरमध्ये विशेष मोहीम राबवली होती. या योजनेला चांगला प्रतिसाद मिळाल्याने राज्य सरकारकडून सोलापूर सहकार विभागाचे कौतुक झाले.

ज्या शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण बाकी होते. तक्रारी प्रलंबित होत्या. त्यांच्यासाठी आधार प्रमाणीकरण पूर्ण करून घेण्यासाठी व तक्रार निराकरणासाठी १५ नोव्हेंबरपर्यंत सहकार विभागाच्या वतीने विशेष मोहीम राबविली. योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आधार प्रमाणीकरण न झालेल्या शेतकऱ्यांनी त्यांच्या बँक शाखेशी संपर्क साधणे आवश्यक आहे. तसेच या विशेष मोहीम कालावधीत आधार प्रमाणीकरण करून घेणे आवश्यक होते. तालुकास्तरीय समितीकडे तक्रार दाखल करणे अपेक्षित होते. परंतु तालुका पातळीवर संबंधित अपात्र किंवा त्रुटी राहिलेल्या शेतकऱ्यांनी प्रशासनाची संपर्क साधला नाही. अशा शेतकऱ्यांसाठी सुद्धा सहकार विभाग माणुसकीच्यादृष्टीने सहकार्य करत आहे.

 

  • एकूण लाभार्थी- ८४ हजार
  • अपात्र -३ हजार

 

सहकार विभागाने दाखविली माणुसकी...

या योजनेतील लाभार्थी किंवा अपात्र शेतकऱ्यांच्या अडचणी किंवा तक्रारी सोडवण्यासाठी सहकार विभागाने १५ नोव्हेंबर पर्यंत विशेष मोहीम राबविली. या दरम्यान काही शेतकऱ्यांनी तक्रारी मांडून योजनेतील अडचणी सांगितल्या. काही शेतकऱ्यांनी १५ नोव्हेंबर नंतर सहकार विभागाशी संपर्क साधला. सहकार विभागाने माणुसकीच्या दृष्टीने संबंधित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. अजूनही काही शेतकरी सहकार विभागाकडे योजनेचे लाभ मिळविण्यासाठी येतात. त्यांनाही सहकार विभाग सहकार्य करत आहे. संबंधित शेतकऱ्यांच्या बँकेशी संपर्क साधून त्यांना या योजनेचा लाभ मिळवून देत आहेत.

........

टॅग्स :SolapurसोलापूरFarmerशेतकरीagricultureशेतीBanking Sectorबँकिंग क्षेत्र