शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

नीरा खोऱ्यातील धरणांत ५५ टक्के पाणीसाठा; गेल्या वर्षीपेक्षा २० टक्के साठा कमी

By काशिनाथ वाघमारे | Updated: February 9, 2024 17:18 IST

काशिनाथ वाघमारे, सोलापूर : सातारा, पुणे, सोलापुर जिल्हासाठी वदरदायिनी ठरलेल्या नीरा खो-यातील धरणात पाणी साठा कमी होत असल्याने शेतकरी ...

काशिनाथ वाघमारे, सोलापूर: सातारा, पुणे, सोलापुर जिल्हासाठी वदरदायिनी ठरलेल्या नीरा खो-यातील धरणात पाणी साठा कमी होत असल्याने शेतकरी धास्तावला आहे. नीरा खोऱ्यातील धरणांत ५५ टक्के पाणीसाठा असून गेल्या वर्षीपेक्षा २० टक्के साठा कमी झाला आहे. उन्हाळ्यात पिकाबरोबर जनावरांना कसं जगवायचं ? असा प्रश्न उभा टाकला आहे. नीरा-देवघर, भाटघर, वीर, गुंजवणी धरण परिसरात जून २०२२ मध्ये पाऊस लवकर पडला नव्हता. या हंगामात समाधानकारक पाऊस न पडल्याने, परतीचा पाठ फिरवल्याने खरीप पिकांना धरणातील पाणी द्यावे लागले. नीरा खो-यातील चार धरणांत बुधवार अखेर गतवर्षापेक्षा सरासरी २० टक्क्यांनी पाणीसाठा कमी असल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे.

४८ हजार ३२९ दशलक्ष घनफूट क्षमता असलेल्या नीरा खो-यातील चारही धरणात एकूण २६ हजार ६७६ दशलक्ष घनफूट उपयुक्त पाणीसाठा म्हणजेच ५५.२० टक्के उपलब्ध आहे. गतवर्षी ३६ हजार १४४ दशलक्ष घनफूट उपयुक्त पाणीसाठा अर्थात ७४.७९ टक्के उपलब्ध होता. त्यामुळे गतवर्षी जून महिन्यापर्यंत दोन्ही कालव्यातून नियमित विसर्ग सोडण्यात आले. यावर्षी या चार धरणात आज ५५,२० टक्के पाणीसाठा आहे. याचा परिणाम रब्बी व उन्हाळी हंगामाच्या पिकांना द्यावयाच्या पाण्यावर होणार आहे. त्यामुळे यावर्षी नीरा डावा व उजवा कालव्यातून पाणी द्यावे लागले.

नीरा खोऱ्यातील पाणीसाठा (७ फेब्रुवारी अखेर)

  • निरा देवघर - ४६:६८
  • भाटकघर - ५९.५१ टक्के
  • वीर - ४८.२६ टक्के
  • गूंजवणी - ७२.५२ टक्के
टॅग्स :WaterपाणीSolapurसोलापूर