शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना एकरी ५० हजार नुकसानभरपाई द्या; सोलापुरातील रिपाइंच्या मेळाव्यात ठराव

By appasaheb.patil | Updated: October 6, 2022 17:28 IST

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या मेळाव्यात केला ठराव

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आजही अनेकांची पिके पाण्यातच आहेत. अशा अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई म्हणून एकरी ५० हजार रुपये देण्याचा ठराव रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या मेळाव्यात करण्यात आला. याचवेळी अन्य १० ते १२ ठरावही करण्यात आले.

या मेळाव्याचे उद्घाटन रिपाइंचे राष्ट्रीय खजिनदार रामराव दाभाडे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुबोध वाघमोडे होते. प्रारंभी प्रास्ताविक पक्षाचे पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष मुकुंद कांबळे यांनी केले.

याप्रसंगी डाॅ. सारीपुत्र तिपुरे, डाॅ. राजकुमार सोनवले, संजय गाडे, चंद्रकांत कांबळे, जलील भाई, इ. जा. तांबोळी, प्रा. सुहास उघडे, फारूक शेख, रियाज सय्यद आदी मान्यवरांनी आपले विचार मांडले.

यावेळी जक्कापा कांबळे, दत्ता सावंत, विनोद धाहिजे, रावसाहेब प्रक्षाळे, राजाभाऊ लोंढे, गौस पिरजादे, इजाज शेख, रफिक शेख, सलीम मुल्ला, अखिलेश माने, आबुबकर करजगीकर, इम्रान शेख, इब्राहिम शेख, समीर मुजावर, इरफान कलयाणी, महबूब पठाण, बोधी लालसरे, दयानंद वाघमारे, नसरीन शेख, अरुणा सरवदे, रेणुका सरवदे, प्रवीण म्हेत्रे, संदीप ससाणे यांच्यासह आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन कांचन बनसोडे तर आभार सलीम शेख यांनी मानले.

-------------

मेळाव्यातील ठरावावर एक नजर..

  • - मुंबईतील दादर इंदू मिलच्या जागेवर होत असलेले डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे राष्ट्रीय स्मारकाचे काम लवकर पूर्ण करावे. रमाई आवास योजनेच्या लाभाची रक्कम वाढवून ५ लाख रुपयांपर्यंत करण्यात यावी.
  • - रेशन धान्य दुकानदारांमार्फत ग्राहकांना धान्य न देणाऱ्या या दुकानदारांवर कारवाई करण्यात यावी.
  • - मागासवर्गीय वित्तीय महामंडळामार्फत कर्ज योजनेचा लाभ हा त्या घटकांना मिळावा यासाठी जिल्हाधिकारी यांनी लीड बँकेला सक्ती करावी.
  • - संजय निराधार लाभार्थ्यांना दर महिन्याला रक्कम मिळावी
  • -जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ असणारे खोके त्यांना पर्यायी जागा दिल्याशिवाय हलवू नये

-----------

 

टॅग्स :SolapurसोलापूरagricultureशेतीFarmerशेतकरीfloodपूर