शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

सोलापुरातील एलईडीचे ७० टक्के काम पूर्ण, बंद दिवे बदलण्यात हलगर्जीपणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 13:24 IST

महापालिकेतील नगरसेवकांचा आरोप; आयुक्तांनी स्वतंत्र बैठक घेण्याची अन् एक महिना मुदतवाढीची मागणी

ठळक मुद्दे१५ जुलैअखेर शहर आणि हद्दवाढ भागात २६ हजार ४६० एलईडी बल्ब बसविण्यात आले स्मार्ट सिटी कंपनीकडून शहर आणि हद्दवाढ भागात आवश्यक त्या ठिकाणी नवीन विद्युत पोल आणि विजेच्या तारा जोडण्याचे काम होणारएलईडीच्या कामाबाबत आणि प्रकाशाबाबत सर्वपक्षीय नगरसेवकांकडून तक्रारी केल्या जात आहेत

सोलापूर : महापालिका आणि एनर्जी एफिशिएन्शी सर्व्हिसेस लिमिटेड (ईईएसएल) कंपनीच्या माध्यमातून शहरातील पथदिव्यांवर एलईडी बल्व बसविण्याचे ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. या कामाची मुदत संपली असून ईईएसएल कंपनीने पुन्हा एक महिन्याची मुदतवाढ मागितली आहे. नव्याने बसविलेले एलईडी बल्ब बंद पडले आहेत. हे दिवे बदलण्यात कंपनीकडून हलगर्जीपणा केला जात असून मनपा आयुक्तांनी या विषयावर स्वतंत्र बैठक घ्यावी, अशी मागणी भाजप नगरसेवकांनी केली आहे. 

शहरातील ४० हजार पथदिव्यांवरील जुने दिवे बदलून एलईडी बल्ब बसविण्याचे काम डिसेंबर महिन्यात सुरू झाले होते. मनपाच्या विद्युत विभागाचे प्रमुख राजेश परदेशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ जुलैअखेर शहर आणि हद्दवाढ भागात २६ हजार ४६० एलईडी बल्ब बसविण्यात आले आहेत. ईईएसएल कंपनीने यापूर्वी मुदतवाढ मागितली होती. १५ जुलैपर्यंत मुदत देण्यात आली होती. कंपनीने पुन्हा मुदतवाढीचा प्रस्ताव ठेवला आहे. 

स्मार्ट सिटी कंपनीकडून शहर आणि हद्दवाढ भागात आवश्यक त्या ठिकाणी नवीन विद्युत पोल आणि विजेच्या तारा जोडण्याचे काम होणार आहे. अशा पाच हजार पोलवर एलईडी बल्ब बसविण्यात येतील. पुढील दोन महिन्यात तक्रार निवारण केंद्र उभारण्यात येईल. नागरिक या केंद्रात फोन करुन तक्रार नोंदवू शकतील. 

दरम्यान, एलईडीच्या कामाबाबत आणि प्रकाशाबाबत सर्वपक्षीय नगरसेवकांकडून तक्रारी केल्या जात आहेत. एलईडी बंद पडल्यानंतर विद्युत विभागाकडे तक्रारी करण्यात आल्या. या तक्रारींची दखल घेतली जाते. पण नवे बल्ब अद्याप बसविण्यात आलेले नाहीत, असेही नगरसेवकांचे म्हणणे आहे. 

वीज बिलात ५० लाख रुपयांची बचत - जानेवारी महिन्यात महापालिकेच्या पथदिव्यांचे वीज बिल एक कोटी ४७ लाख ७५ हजार १८० रुपये आले होते. जून महिन्यात एक कोटी आठ लाख ५९ हजार ६६९ रुपये आले आहे. जून महिन्याच्या वीज बिलात जवळपास ३९ लाख रुपयांची बचत झाली आहे. जुलै महिन्यात यात वाढ होऊन जवळपास ५० लाख रुपयांची बचत होईल, असा दावा विद्युत विभागातील अधिकाºयांनी केला. 

एलईडी बसविण्याचे काम संथगतीने सुरू आहे. मनपासोबत झालेल्या करारानुसार, ईईएसएल कंपनी फिलिप्स कंपनीचे एलईडी बल्ब बसविणार होती. पण सध्या साध्या कंपनीने बल्ब बसविले जात आहेत. हे बल्ब ८ ते १५ दिवसांत बंद पडतात. त्यामुळे कंपनीकडून होणाºया या कामाची चौकशी व्हायला हवी, अशी मागणी भाजपच्या नगरसेवकांकडून करण्यात येणार आहे. एलईडी बसविणार म्हणून प्रभागातील पथदिव्यांच्या देखभाल दुरुस्तीचे काम बंद आहे. हद्दवाढ भागात आजही अंधार आहे. महापालिका आयुक्तांनी या विषयांवर स्वतंत्र बैठक घ्यायला हवी, अशी मागणी आम्ही करणार आहोत. - नागेश वल्याळ, नगरसेवक, भाजप. 

काही भागात बल्ब बंद असल्याच्या तक्रारी येत आहेत. एलईडी बल्बच्या देखभाल दुरुस्तीचे काम ईईएसएल कंपनी पुढील सात वर्षे करणार आहे. कंपनी प्रतिनिधींना याची माहिती देऊन बल्ब बदलून घेतले जात आहेत. त्याच्या नोंदीही ठेवल्या जात आहेत.- राजेश परदेशी, सहायक अभियंता, विद्युत विभाग, मनपा. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिकाSmart Cityस्मार्ट सिटीBJPभाजपा