शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

पाणी पिण्यासाठी जाताना वाटेत चक्कर येऊन पडल्यानं ४९ वर्षीय गृहस्थाचा मृत्यू

By विलास जळकोटकर | Updated: January 2, 2024 17:53 IST

चक्कर येऊन पडल्यानं रक्ताची उलटी होऊन त्यांचा वाटेतच मृत्यू.

विलास जळकोटकर, सोलापूर : तहान लागली म्हणून पाणी पिण्यासाठी किचनमध्ये जाताना चक्कर येऊन पडल्यानं रक्ताची उलटी होऊन एका ४९ वर्षीय गृहस्थाचा दवाखान्यात नेण्यापूर्वीच मृत्यू झाला. मंगळवारी सकाळी ६:३० च्या सुमारास भवानी पेठ, नामदेव नगर येथे ही दुर्दैवी घटना घडली. जनार्दन एकनाथ भडंगे (वय- ४९, रा. भवानी पेठ, नामदेव नगर, सोलापूर) असे मयत व्यक्तीचे नाव आहे.

यातील मयत जनार्दन हे मंगळवारी सकाळी ६:३० च्या सुमारास तहान लागल्यानं किचनमध्ये पोहताना चक्कर आल्यानं त्यांचा तोल गेला आणि ते खाली कोसळले. त्यांच्या कानातून रक्त येऊन चेहऱ्याला जखम झाली.

रक्ताची उलटी झाल्याने घरातील सारेच घाबरले. त्यातच त्यांची शुद्ध हरपली. भाऊ उमेश भडंगे यांनी तातडीने शासकीय रुग्णालय गाठले. डॉक्टरांनी तपासणी केली मात्र त्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सिव्हील पोलीस चौकीत या घटनेची नोंद झाली आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरDeathमृत्यू