शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

Exclusive; उजनी धरणावर २४ तासात होतेय ३ लाख युनिट विजेची निर्मिती

By appasaheb.patil | Updated: September 5, 2020 13:14 IST

उजनी धरणावरील वीजनिर्मिती केंद्र कार्यान्वित; इंदापूर, वालचंदनगर अन् बारामतीला वापरली जातेय वीज

ठळक मुद्देउजनी धरणातील पाणीसाठा १०० टक्यांच्या वर गेला तरच या वीजनिर्मिती केंद्राला पाणी सोडले जाते़एका तासाला १२ हजार युनिट वीज निर्मिती होत असून, यासाठी १ हजार ६०० क्युसेक पाण्याची आवश्यकता

आप्पासाहेब पाटील

सोलापूर : सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी समजल्या जाणाºया उजनी धरणातील पाणीसाठा १०० टक्के पार झाला आहे़ दरम्यान, धरणातील पाणी वीजनिर्मिती प्रकल्पाला सोडण्यात आल्यामुळे धरणावरील वीजनिर्मितीचा प्रकल्प कार्यान्वित झाला आहे़ सध्या २४ तासाला ३ लाख युनिट विजेची निर्मिती होत असल्याची माहिती अतिरिक्त कार्यकारी अभियंता आऱ एस़ कदम यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.

राज्यात असे विविध ठिकाणी चार प्रकल्प असून, यात उजनी वीज निर्मिती प्रकल्पाचा समावेश आहे. हा प्रकल्प महाराष्ट्र शासनाच्या जलविद्युत विभागाच्या मालकीचा असून, हा प्रकल्प महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीकडे भाडेतत्त्वावर हस्तांतरित केला आहे. अशा प्रकारचा रिव्हरसेबल प्लांट महाराष्ट्रात जायकवाडी येथे १२ मेगावॅट, भाटघर येथे २५ मेगावॅटचे दोन संच कार्यरत आहेत, असे चार प्लांट आहेत. या प्रकल्पाची खोली जमीन लेव्हलपासून शंभर फूट खोलीवर असून, टर्बाईनच्या माध्यमातून वीज निर्मिती केली जाते. भीमानगर येथील वीजनिर्मिती प्रकल्पातून निर्माण होणारी वीज इंदापूर येथे १३२ केव्ही सबस्टेशनला जोडली आहे. तेथून वालचंदनगरला वीज पुरवली जाते व भीमानगर येथून सीना-माढा पंपहाऊसलादेखील वीज पुरवठा केला जाऊ शकतो. त्यासाठी भीमानगर इथे तशी व्यवस्था केली आहे. जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणाच्या निर्मितीनंतर याच धरणावर मे १९९४ रोजी वीज प्रकल्प कार्यान्वित झाला.---------१०० दिवसच चालतो हा प्रकल्पउजनी धरणातील पाणीसाठा १०० टक्यांच्या वर गेला तरच या वीजनिर्मिती केंद्राला पाणी सोडले जाते़ अन्यथा हा प्रकल्प बंदच असतो़ वर्षभरात केवळ १०० दिवसच हा प्रकल्पातून विजेची निर्मिती करण्यात येत असल्याचेही यावेळी सांगितले़ वीज निर्मितीसाठी वापरलेले पाणी परत धरणात पाणी सोडले जाते. एका तासाला १२ हजार युनिट वीज निर्मिती होत असून, यासाठी १ हजार ६०० क्युसेक पाण्याची आवश्यकता आहे. २४ तासांत दोन लाख ८८ हजार युनिट वीज निर्मिती होत असून, रिव्हर्स प्लांट (पाणी परत धरणात सोडले जाते) असल्याने वर्षात तीन ते चार महिनेच हा प्रकल्प चालतो़

टॅग्स :SolapurसोलापूरUjine Damउजनी धरणmahavitaranमहावितरण