शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

Exclusive; उजनी धरणावर २४ तासात होतेय ३ लाख युनिट विजेची निर्मिती

By appasaheb.patil | Updated: September 5, 2020 13:14 IST

उजनी धरणावरील वीजनिर्मिती केंद्र कार्यान्वित; इंदापूर, वालचंदनगर अन् बारामतीला वापरली जातेय वीज

ठळक मुद्देउजनी धरणातील पाणीसाठा १०० टक्यांच्या वर गेला तरच या वीजनिर्मिती केंद्राला पाणी सोडले जाते़एका तासाला १२ हजार युनिट वीज निर्मिती होत असून, यासाठी १ हजार ६०० क्युसेक पाण्याची आवश्यकता

आप्पासाहेब पाटील

सोलापूर : सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी समजल्या जाणाºया उजनी धरणातील पाणीसाठा १०० टक्के पार झाला आहे़ दरम्यान, धरणातील पाणी वीजनिर्मिती प्रकल्पाला सोडण्यात आल्यामुळे धरणावरील वीजनिर्मितीचा प्रकल्प कार्यान्वित झाला आहे़ सध्या २४ तासाला ३ लाख युनिट विजेची निर्मिती होत असल्याची माहिती अतिरिक्त कार्यकारी अभियंता आऱ एस़ कदम यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.

राज्यात असे विविध ठिकाणी चार प्रकल्प असून, यात उजनी वीज निर्मिती प्रकल्पाचा समावेश आहे. हा प्रकल्प महाराष्ट्र शासनाच्या जलविद्युत विभागाच्या मालकीचा असून, हा प्रकल्प महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीकडे भाडेतत्त्वावर हस्तांतरित केला आहे. अशा प्रकारचा रिव्हरसेबल प्लांट महाराष्ट्रात जायकवाडी येथे १२ मेगावॅट, भाटघर येथे २५ मेगावॅटचे दोन संच कार्यरत आहेत, असे चार प्लांट आहेत. या प्रकल्पाची खोली जमीन लेव्हलपासून शंभर फूट खोलीवर असून, टर्बाईनच्या माध्यमातून वीज निर्मिती केली जाते. भीमानगर येथील वीजनिर्मिती प्रकल्पातून निर्माण होणारी वीज इंदापूर येथे १३२ केव्ही सबस्टेशनला जोडली आहे. तेथून वालचंदनगरला वीज पुरवली जाते व भीमानगर येथून सीना-माढा पंपहाऊसलादेखील वीज पुरवठा केला जाऊ शकतो. त्यासाठी भीमानगर इथे तशी व्यवस्था केली आहे. जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणाच्या निर्मितीनंतर याच धरणावर मे १९९४ रोजी वीज प्रकल्प कार्यान्वित झाला.---------१०० दिवसच चालतो हा प्रकल्पउजनी धरणातील पाणीसाठा १०० टक्यांच्या वर गेला तरच या वीजनिर्मिती केंद्राला पाणी सोडले जाते़ अन्यथा हा प्रकल्प बंदच असतो़ वर्षभरात केवळ १०० दिवसच हा प्रकल्पातून विजेची निर्मिती करण्यात येत असल्याचेही यावेळी सांगितले़ वीज निर्मितीसाठी वापरलेले पाणी परत धरणात पाणी सोडले जाते. एका तासाला १२ हजार युनिट वीज निर्मिती होत असून, यासाठी १ हजार ६०० क्युसेक पाण्याची आवश्यकता आहे. २४ तासांत दोन लाख ८८ हजार युनिट वीज निर्मिती होत असून, रिव्हर्स प्लांट (पाणी परत धरणात सोडले जाते) असल्याने वर्षात तीन ते चार महिनेच हा प्रकल्प चालतो़

टॅग्स :SolapurसोलापूरUjine Damउजनी धरणmahavitaranमहावितरण