शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Exclusive; उजनी धरणावर २४ तासात होतेय ३ लाख युनिट विजेची निर्मिती

By appasaheb.patil | Updated: September 5, 2020 13:14 IST

उजनी धरणावरील वीजनिर्मिती केंद्र कार्यान्वित; इंदापूर, वालचंदनगर अन् बारामतीला वापरली जातेय वीज

ठळक मुद्देउजनी धरणातील पाणीसाठा १०० टक्यांच्या वर गेला तरच या वीजनिर्मिती केंद्राला पाणी सोडले जाते़एका तासाला १२ हजार युनिट वीज निर्मिती होत असून, यासाठी १ हजार ६०० क्युसेक पाण्याची आवश्यकता

आप्पासाहेब पाटील

सोलापूर : सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी समजल्या जाणाºया उजनी धरणातील पाणीसाठा १०० टक्के पार झाला आहे़ दरम्यान, धरणातील पाणी वीजनिर्मिती प्रकल्पाला सोडण्यात आल्यामुळे धरणावरील वीजनिर्मितीचा प्रकल्प कार्यान्वित झाला आहे़ सध्या २४ तासाला ३ लाख युनिट विजेची निर्मिती होत असल्याची माहिती अतिरिक्त कार्यकारी अभियंता आऱ एस़ कदम यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.

राज्यात असे विविध ठिकाणी चार प्रकल्प असून, यात उजनी वीज निर्मिती प्रकल्पाचा समावेश आहे. हा प्रकल्प महाराष्ट्र शासनाच्या जलविद्युत विभागाच्या मालकीचा असून, हा प्रकल्प महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीकडे भाडेतत्त्वावर हस्तांतरित केला आहे. अशा प्रकारचा रिव्हरसेबल प्लांट महाराष्ट्रात जायकवाडी येथे १२ मेगावॅट, भाटघर येथे २५ मेगावॅटचे दोन संच कार्यरत आहेत, असे चार प्लांट आहेत. या प्रकल्पाची खोली जमीन लेव्हलपासून शंभर फूट खोलीवर असून, टर्बाईनच्या माध्यमातून वीज निर्मिती केली जाते. भीमानगर येथील वीजनिर्मिती प्रकल्पातून निर्माण होणारी वीज इंदापूर येथे १३२ केव्ही सबस्टेशनला जोडली आहे. तेथून वालचंदनगरला वीज पुरवली जाते व भीमानगर येथून सीना-माढा पंपहाऊसलादेखील वीज पुरवठा केला जाऊ शकतो. त्यासाठी भीमानगर इथे तशी व्यवस्था केली आहे. जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणाच्या निर्मितीनंतर याच धरणावर मे १९९४ रोजी वीज प्रकल्प कार्यान्वित झाला.---------१०० दिवसच चालतो हा प्रकल्पउजनी धरणातील पाणीसाठा १०० टक्यांच्या वर गेला तरच या वीजनिर्मिती केंद्राला पाणी सोडले जाते़ अन्यथा हा प्रकल्प बंदच असतो़ वर्षभरात केवळ १०० दिवसच हा प्रकल्पातून विजेची निर्मिती करण्यात येत असल्याचेही यावेळी सांगितले़ वीज निर्मितीसाठी वापरलेले पाणी परत धरणात पाणी सोडले जाते. एका तासाला १२ हजार युनिट वीज निर्मिती होत असून, यासाठी १ हजार ६०० क्युसेक पाण्याची आवश्यकता आहे. २४ तासांत दोन लाख ८८ हजार युनिट वीज निर्मिती होत असून, रिव्हर्स प्लांट (पाणी परत धरणात सोडले जाते) असल्याने वर्षात तीन ते चार महिनेच हा प्रकल्प चालतो़

टॅग्स :SolapurसोलापूरUjine Damउजनी धरणmahavitaranमहावितरण