शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

तीन वर्षांत सापडले २८ मानवी सांगाडे

By admin | Updated: August 12, 2014 23:14 IST

नऊ सांगाड्याची ओळख पटेना : डीएनए टेस्टमुळे होतोय नातेवाइकांचा उलगडा

दत्ता यादव -सातारा -- मानवी सांगांडे सापडल्यानंतर अनेकदा पोलीस दलात खळबळ उडत असते. अशा सांगांड्यांची ओळख कशी पटवायची हा मोठा प्रश्न पोलिसांसमोर असतो. जिल्ह्यात गेल्या तीन वर्षात २८ मानवी सांगांडे सापडले आहेत. तर अद्याप ९ सांगांड्यांची ओळख पटली नाही. काही दिवसांपूर्वी बोरगाव आणि वाई येथे मानवी सांगांडे सापडले होते. यापार्श्वभूमीवर असे सांगांडे सापडल्यानंतर पोलिसांचा नेमका तपास कसा होतो, याचा शोध घेतला असता अनेक बाबी समोर आल्या. मानवी सांगांडा सापडल्यानंतर पोलीस सुरूवातीला तो सांगांडा जप्त करतात. वैद्यकीय अधिकाऱ्यांना पाचारण करून त्या सांगांड्याचे जागेवरच शवविच्छेदन केले जाते. प्रथम दर्शनी तो सांगांडा पुरुष की स्त्री जातीचा आहे, हे नमूद केले जाते. पुरुषाचा सांगाडा हा मांडीमध्ये निमुळता असतो, तर स्त्रीचा सांगाडा हा आकाराने मोठा असतो. मात्र तुटलेल्या अवस्थेत सांगाडा असेल तर तो सांगांडा पुरुषाचा की स्त्रीचा, याचा शोध घेणे अवघड असते. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या प्राथमिक अहवालावर विसंबून न राहाता सांगांड्याचे नमुने मुंबई येथील फॉरेन्सीक लॅबमध्ये डीएनए चाचणीसाठी पाठविले जातात. या चाचणीचा अहवाल आल्यानंतरच मानवी सांगांडा कोणाचा आहे, हे ओळखले जाते. एवढेच नव्हे तर सांगांड्याचे वयही समजते. तसेच सापडलेल्या सांगांड्याची आणि त्याच्या नातेवाईकाची ओळख पटवायची असेल तर दोघांचेही डीएनए नमुने घेतले जातात. ते नमुने प्रयोगशाळेत पाठविल्यानंतर त्याच्या नातेवाईकांची ओळख पटते. मानवी सांगांड्यावरील हाडावर कोणत्याही शस्त्राचे घाव असतील तर त्याचा खून झाला आहे, असे समजले जाते. जर हाडावर निसळर डाग पडले असतील तर त्याला वीषबाधा झाल्याचे पुढे येते. छातीजवळील सापळ्याची टेस्ट घेतल्यानंतर बुडून (ब्राऊनिंग) मृत्यू झाल्याचे स्पष्ट होते. मात्र सांगांड्याची ओळख पटत नाही तोपर्यंत पोलिसांना कसोशीने तपास करावा लागतो. बेपत्ता व्यक्तीचा शोधजिल्ह्यात गेल्या तीन वर्षांत २८ मानवी सांगांडे सापडले आहेत. तसेच ९ सांगांड्यांची अद्यापही ओळख पटलेली नाही. मानवी सांगांडे सापडल्यानंतर पोलीस सुरूवातीला बेपत्ता व्यक्तिचा शोध घेत असतात. त्यातून माहिती समोर येते. पोलीस करतात सांगाड्यांचे दफन मानवी सांगांड्याची ओळख पटल्यानंतर पोलीस तो सांगांडा जमीनीमध्ये पुरतात. मात्र एखाद्या नातेवाईकाने संबंधित व्यक्तिचा खून झाला आहे, असा आक्षेप घेतल्यास तो सांगांडा तहसीलदारांच्या आदेशाने पुन्हा उकरून बाहेर काढला जातो. त्यानंतर तो सांगांडा पुन्हा फॉरेन्सीक लॅबला पाठविला जातो. त्यामुळे शक्यतो सांगांड्याचे दहन केले नाही, असे पोलिसांचे म्हणणे आहे.