शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

२१ व्या वर्षी लग्न; नोकरीला लागलेल्या मुलीच आता नवरी म्हणून मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2021 12:18 IST

निर्णयाचे स्वागत; शिक्षण पूर्ण होईल अन् मानसिक, आर्थिक स्वावलंबी होतील

आप्पासाहेब पाटील

सोलापूर : मुलीच्या विवाहाचे वय आता २१ होणार आहे. याबाबतच्या विधेयकाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे. दरम्यान, विवाहामुळे शिक्षणाचा डाव अर्ध्यावरच मोडणाऱ्या मुली आता शिक्षण पूर्ण घेतील अन् मानसिक, आर्थिक स्वावलंबी होतील, असा विश्वासही सोलापुरातील जाणकारांनी व्यक्त केला आहे.

सध्या महिलांसाठी विवाहाचे कायदेशीर वय १८ वर्षे आहे, तर पुरुषांसाठी २१ वर्षे आहे. आता केंद्राने वय वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. तो योग्यच आहे; मात्र कायदा करण्यापेक्षा मुलींना सक्षम करण्यासाठी, त्यांची सुरक्षितता जपण्यासाठी अधिक परिणामकारक योजना अस्तित्वात आल्या पाहिजेत. समाजमन बदलण्यासाठी प्रयत्न होण्याची गरज असल्याचेही मत सोलापुरातील काही महिला सामाजिक कार्यकत्यांनी व्यक्त केले आहे.

-----------

केंद्राने घेतलेला निर्णय चांगला आहे. लग्नासाठी शिक्षण पूर्ण न होऊ देता १८ पूर्ण व्हायची वाट बघणाऱ्या पालकांना आता थांबावे लागेल आणि मुली आपले शिक्षण पूर्ण करू शकतील, तसेच स्वावलंबी होतील. कमीत कमी पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण होईल व मानसिक व आर्थिक स्वावलंबन वाढेल.

- अश्विनी राठोड, सामाजिक कार्यकर्त्या, सोलापूर.

-----------

निर्णय चांगला आहे. मुलींचे शिक्षण पूर्ण होईल. शिक्षण पूर्ण झाल्यावर मुली स्वत:च्या पायावर उभे राहतील. स्वावलंबी बनतील. त्यामुळे महागाईच्या जमान्यात त्याच्या घराला, संसाराला हातभार लागेल. हा निर्णय तसा चुकीचाही आहे; मात्र आपण या निर्णयाकडे चांगल्या विचाराने पाहिले पाहिजे, असे मला वाटते.

- अनुजा कुलकर्णी, अध्यक्ष, बालकल्याण समिती, सोलापूर.

------------

शासनाने घेतलेला निर्णय योग्य आहे. हा निर्णय तळागाळापर्यंत रूजविण्यासाठी मोठे प्रयत्न करावे लागतील. ग्रामीण भागात दहावी किंवा बारावी झाली की मुलीचं लग्न, हाच एक मुद्दा असतो. पालकांच्या डोक्यात. कमी वयात लग्न होत असल्याने मुलींना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. आता ते होणार नाही.

- पूजा कांबळे, सामाजिक कार्यकर्त्यां, सोलापूर.

-------------

करिअरमुळे मुलींच्या लग्नाचे वय लांबले...

शहरांमध्ये गेल्या काही वर्षांत मुलींच्या लग्नाच्या वयामध्ये लक्षणीय बदल झाले आहेत. मुख्यत: उच्चशिक्षण घेणाऱ्या मुलींचे लग्नाचे वय २५ वर्षांच्या पुढे गेले असून, २७ ते ३० वर्षे या वयामध्ये लग्न करणाऱ्या मुलींचे प्रमाण वाढले आहे. करिअरमुळे या मुली लग्नाचा निर्णय पुढे ढकलत आहेत.

----------

‘त्या’ कायद्याच्या अंमलबजावणीचे काय झाले ?

देशात बालविवाह विरोधी कायदा अस्तित्वात येऊन १३ वर्षे उलटली, तरी जगातील सर्वाधिक बालविवाह होणारा देश म्हणून भारताची ओळख आहे. सर्वाधिक बालविवाह होणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा पहिल्या पाच राज्यांमध्ये समावेश आहे. मुलींवरील वाढते अत्याचार आणि त्यांच्यामध्ये निर्माण झालेली असुरक्षिततेची भावना दूर करण्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजेत ,असा सवाल अनेकांनी लोकमतसमोर उपस्थित केला.

टॅग्स :Solapurसोलापूरmarriageलग्नCentral Governmentकेंद्र सरकार