शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

संततधारेचे ११७ कोटी मंजूर करेना; १८ हजार शेतकऱ्यांचे पैसे अडकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2023 12:31 IST

विमा कंपनीने नुकसान झालेल्या पिकांची तपासणी करून विम्यास पात्र केलेल्या १३ हजार शेतकऱ्यांचे १४ कोटी ११ लाख ३७ हजार रुपये मंजूर असूनही खात्यावर जमा होत नाहीत.

लोकमत न्युज नेटवर्क 

सोलापूर : संपूर्ण खरीप पिके पाण्यात गेलेल्या शेतकऱ्यांना विमा कंपनी व राज्य सरकार आर्थिक मदत देण्यासाठी गॅसवर ठेवत आहे. पुढचा खरीप हंगाम तीन महिन्यांवर आला तरी मागील वर्षाचे पैसे मिळाले नाहीत. जिल्ह्यात पावसाच्या नुकसानीचे अहवाल शासनाने मंजूर केले नाहीत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मागील वर्ष फारच खडतर गेले. खरीप पेरणीसाठी खर्च केलेली पिके अतिवृष्टी व संततधारेने पाण्यात गेली. उशिरापर्यंत पाऊस पडत राहिल्याने रब्बी पेरणीवरही परिणाम झाला. खरीप व रब्बी पदरात पडला नसल्याने विमा नुकसानभरपाई व शासनाकडून आर्थिक मदत तात्काळ मिळणे अपेक्षित होते. मात्र पुढचा हंगाम तीन महिन्यांवर आला तरी मागील वर्षाचे पैसे शेतकऱ्यांना मिळाले नाहीत.

विमा कंपनीने नुकसान झालेल्या पिकांची तपासणी करून विम्यास पात्र केलेल्या १३ हजार शेतकऱ्यांचे १४ कोटी ११ लाख ३७ हजार रुपये मंजूर असूनही खात्यावर जमा होत नाहीत. याशिवाय नुकसानीच्या सूचनांपैकी विमा निश्चिती न केलेले ९,८३५ शेतकरी आहेत. असाच प्रकार पीक नुकसानीबाबत झाला आहे. नुकसान पिकांचे पंचनामे करून सहा महिन्याचा कालावधी उलटला तरी शासनाकडून पैसे जमा होत नाहीत.

एक लाख शेतकऱ्यांना ११२ कोटी

खरीप पीकविमा भरलेल्या एक लाख ९७ हजार ६६२ शेतकऱ्यांपैकी एक लाख ६३ हजार ९९० शेतकऱ्यांनी स्थानिक नैसर्गिक आपत्ती व काढणी पश्चात जोखीम अंतर्गत पूर्वसूचना दिल्या होत्या. तपासणीत २३,८८१ शेतकरी अपात्र झाले, तर पूर्वसूचना दिलेले ५५६३ शेतकरी विमा कंपनीला कागदपत्रे देत नाही. पात्र झालेल्या एक लाख ४० हजार १०९ शेतकऱ्यांपैकी एक लाख १७ हजार ८९२ शेतकऱ्यांच्या खात्यावर ११२ कोटी ७३ लाख ७३ हजार रुपये जमा झाले आहेत. पूर्वसूचना दिलेल्या १९ हजार शेतकरी विमा नुकसानभरपाईच्या प्रतीक्षेत आहेत.

३६ कोटी कधी जमा होणार?सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या २६ हजार १४२ शेतकऱ्यांना २३ हजार ८६७ हेक्टरसाठी ३६ कोटी दोन लाख रुपये मंजूर आहेत. उत्तर, दक्षिण सोलापूर व अक्कलकोट तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी १७ नोव्हेंबर रोजी मंजूर करण्यात आले आहेत. मात्र ही रक्कम अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली नाही.

* संततधार पावसाने नुकसान झालेल्या पिकांची नुकसानभरपाई मिळावी यासाठी मंद्रूप अपर तहसीलदार पाच कोटी, बार्शी तालुक्याचे १९ कोटी तसेच उत्तर सोलापूर, मंद्रूप अपर तहसील, माढा, करमाळा, पंढरपूर, मोहोळ, मंगळवेढा व सांगोला तालुक्यासाठी ९२ कोटींचा प्रस्ताव राज्य सरकारकडे गेला आहे. मात्र हे प्रस्ताव मंजूर झाले नाहीत.

त्या ३७ हजार शेतकऱ्यांचे काय?

खरीप हंगामातील पिकांसाठी एक लाख ९७ हजार ६६२ शेतकऱ्यांनी विमा भरला होता. त्यापैकी एक लाख ६३ हजार ९९० शेतकऱ्यांनी पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्याची पूर्वसूचना कृषी खाते व विमा कंपनीला दिली होती. पूर्वसूचना न दिलेल्या ३६ हजार ६७२ शेतकऱ्यांना विम्याची रक्कम मिळणार की नाही, हे माहिती नाही.

टॅग्स :Farmerशेतकरी