शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रकरण शमविले? अजित पवार दोनदा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, पार्थ पवार 'ती' जमीन मागे देण्याची शक्यता 
2
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
3
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
4
'या' सरकारी बॉन्डने ८ वर्षांत दिला तब्बल ३१६% परतावा; मॅच्युरिटीवर मिळतोय 'टॅक्स फ्री' नफा!
5
अंपायरच्या लेकीसाठी ICC नं नियम बदलला? प्रतीकाच्या गळ्यात झळकला विश्वविजेतेपदाचा 'दागिना'
6
Smartphone Hacking : व्हॉट्सअ‍ॅपवर RTOचा मेसेज आला? चुकूनही त्यावर क्लिक करू नका! नाहीतर...
7
'अमेरिका, चीन, पाकिस्तान कोणीही आपल्यावर दबाव आणू शकत नाही'; अणुचाचणीच्या चर्चेवर राजनाथ सिंह यांचं मोठं विधान
8
धक्कादायक! मुंग्यांच्या भीतीने गमावला जीव, कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे हे होतं?
9
Hanuman Upasana: दिवसाची सुरुवात 'या' मंत्राने कराल तर २१ दिवसांत फरक बघाल!
10
Indonesia: इंडोनेशियात नमाज वेळी मशिदीत स्फोट; ५० हून अधिक जण जखमी!
11
राहुल गांधींच्या ‘या’ आवडत्या शेअरची बाजारात धूम; कंपनीची एकाच दिवसात १७ हजार कोटींची कमाई
12
Typhoon Kalmaegi : खिडकीच्या काचा फुटल्या, घरं कोसळली; व्हिएतनाममध्ये कलमेगी वादळाचं थैमान, ५ जणांचा मृत्यू
13
'जरांगे, थोतांड करू नका! आरोपी यांचेच, आरोपही हेच करणार'; हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपावर धनंजय मुंडेंचा संताप
14
Rahul Gandhi: "मते चोरून सत्तेत आलेल्यांनीच जमीन चोरली, कारण त्यांना..."; राहुल गांधींचा पार्थ पवार भूखंड खरेदी प्रकरणावरून घणाघात
15
हात मिळवता मिळवता एकमेकांचे पाय खेचू लागले चीन-अमेरिका; China च्या एका निर्णयानं ट्रम्प यांचा तिळपापड
16
Dental Care: टार्टर आणि प्लाक दातांचे मुख्य शत्रू, करू शकतात गंभीर नुकसान; वेळीच घ्या 'ही' काळजी 
17
केक कापला, डीजे लावला आणि..., शेतकऱ्याने दणक्यात साजरा केला रेड्याचा वाढदिवस
18
१० लोकांना संपवलं, २७ जणांना मारण्याच्या तयारीत; नर्स रुग्णांच्या जीवावर का उठली? कारण ऐकाल तर..
19
चिकन नेकजवळ भारतीय लष्करानं केलं असं काम, शत्रूची प्रत्येक चाल होणार फेल
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदी करण्यापूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे लेटेस्ट रेट

संततधारेचे ११७ कोटी मंजूर करेना; १८ हजार शेतकऱ्यांचे पैसे अडकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2023 12:31 IST

विमा कंपनीने नुकसान झालेल्या पिकांची तपासणी करून विम्यास पात्र केलेल्या १३ हजार शेतकऱ्यांचे १४ कोटी ११ लाख ३७ हजार रुपये मंजूर असूनही खात्यावर जमा होत नाहीत.

लोकमत न्युज नेटवर्क 

सोलापूर : संपूर्ण खरीप पिके पाण्यात गेलेल्या शेतकऱ्यांना विमा कंपनी व राज्य सरकार आर्थिक मदत देण्यासाठी गॅसवर ठेवत आहे. पुढचा खरीप हंगाम तीन महिन्यांवर आला तरी मागील वर्षाचे पैसे मिळाले नाहीत. जिल्ह्यात पावसाच्या नुकसानीचे अहवाल शासनाने मंजूर केले नाहीत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मागील वर्ष फारच खडतर गेले. खरीप पेरणीसाठी खर्च केलेली पिके अतिवृष्टी व संततधारेने पाण्यात गेली. उशिरापर्यंत पाऊस पडत राहिल्याने रब्बी पेरणीवरही परिणाम झाला. खरीप व रब्बी पदरात पडला नसल्याने विमा नुकसानभरपाई व शासनाकडून आर्थिक मदत तात्काळ मिळणे अपेक्षित होते. मात्र पुढचा हंगाम तीन महिन्यांवर आला तरी मागील वर्षाचे पैसे शेतकऱ्यांना मिळाले नाहीत.

विमा कंपनीने नुकसान झालेल्या पिकांची तपासणी करून विम्यास पात्र केलेल्या १३ हजार शेतकऱ्यांचे १४ कोटी ११ लाख ३७ हजार रुपये मंजूर असूनही खात्यावर जमा होत नाहीत. याशिवाय नुकसानीच्या सूचनांपैकी विमा निश्चिती न केलेले ९,८३५ शेतकरी आहेत. असाच प्रकार पीक नुकसानीबाबत झाला आहे. नुकसान पिकांचे पंचनामे करून सहा महिन्याचा कालावधी उलटला तरी शासनाकडून पैसे जमा होत नाहीत.

एक लाख शेतकऱ्यांना ११२ कोटी

खरीप पीकविमा भरलेल्या एक लाख ९७ हजार ६६२ शेतकऱ्यांपैकी एक लाख ६३ हजार ९९० शेतकऱ्यांनी स्थानिक नैसर्गिक आपत्ती व काढणी पश्चात जोखीम अंतर्गत पूर्वसूचना दिल्या होत्या. तपासणीत २३,८८१ शेतकरी अपात्र झाले, तर पूर्वसूचना दिलेले ५५६३ शेतकरी विमा कंपनीला कागदपत्रे देत नाही. पात्र झालेल्या एक लाख ४० हजार १०९ शेतकऱ्यांपैकी एक लाख १७ हजार ८९२ शेतकऱ्यांच्या खात्यावर ११२ कोटी ७३ लाख ७३ हजार रुपये जमा झाले आहेत. पूर्वसूचना दिलेल्या १९ हजार शेतकरी विमा नुकसानभरपाईच्या प्रतीक्षेत आहेत.

३६ कोटी कधी जमा होणार?सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या २६ हजार १४२ शेतकऱ्यांना २३ हजार ८६७ हेक्टरसाठी ३६ कोटी दोन लाख रुपये मंजूर आहेत. उत्तर, दक्षिण सोलापूर व अक्कलकोट तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी १७ नोव्हेंबर रोजी मंजूर करण्यात आले आहेत. मात्र ही रक्कम अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली नाही.

* संततधार पावसाने नुकसान झालेल्या पिकांची नुकसानभरपाई मिळावी यासाठी मंद्रूप अपर तहसीलदार पाच कोटी, बार्शी तालुक्याचे १९ कोटी तसेच उत्तर सोलापूर, मंद्रूप अपर तहसील, माढा, करमाळा, पंढरपूर, मोहोळ, मंगळवेढा व सांगोला तालुक्यासाठी ९२ कोटींचा प्रस्ताव राज्य सरकारकडे गेला आहे. मात्र हे प्रस्ताव मंजूर झाले नाहीत.

त्या ३७ हजार शेतकऱ्यांचे काय?

खरीप हंगामातील पिकांसाठी एक लाख ९७ हजार ६६२ शेतकऱ्यांनी विमा भरला होता. त्यापैकी एक लाख ६३ हजार ९९० शेतकऱ्यांनी पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्याची पूर्वसूचना कृषी खाते व विमा कंपनीला दिली होती. पूर्वसूचना न दिलेल्या ३६ हजार ६७२ शेतकऱ्यांना विम्याची रक्कम मिळणार की नाही, हे माहिती नाही.

टॅग्स :Farmerशेतकरी