शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

संततधारेचे ११७ कोटी मंजूर करेना; १८ हजार शेतकऱ्यांचे पैसे अडकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2023 12:31 IST

विमा कंपनीने नुकसान झालेल्या पिकांची तपासणी करून विम्यास पात्र केलेल्या १३ हजार शेतकऱ्यांचे १४ कोटी ११ लाख ३७ हजार रुपये मंजूर असूनही खात्यावर जमा होत नाहीत.

लोकमत न्युज नेटवर्क 

सोलापूर : संपूर्ण खरीप पिके पाण्यात गेलेल्या शेतकऱ्यांना विमा कंपनी व राज्य सरकार आर्थिक मदत देण्यासाठी गॅसवर ठेवत आहे. पुढचा खरीप हंगाम तीन महिन्यांवर आला तरी मागील वर्षाचे पैसे मिळाले नाहीत. जिल्ह्यात पावसाच्या नुकसानीचे अहवाल शासनाने मंजूर केले नाहीत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मागील वर्ष फारच खडतर गेले. खरीप पेरणीसाठी खर्च केलेली पिके अतिवृष्टी व संततधारेने पाण्यात गेली. उशिरापर्यंत पाऊस पडत राहिल्याने रब्बी पेरणीवरही परिणाम झाला. खरीप व रब्बी पदरात पडला नसल्याने विमा नुकसानभरपाई व शासनाकडून आर्थिक मदत तात्काळ मिळणे अपेक्षित होते. मात्र पुढचा हंगाम तीन महिन्यांवर आला तरी मागील वर्षाचे पैसे शेतकऱ्यांना मिळाले नाहीत.

विमा कंपनीने नुकसान झालेल्या पिकांची तपासणी करून विम्यास पात्र केलेल्या १३ हजार शेतकऱ्यांचे १४ कोटी ११ लाख ३७ हजार रुपये मंजूर असूनही खात्यावर जमा होत नाहीत. याशिवाय नुकसानीच्या सूचनांपैकी विमा निश्चिती न केलेले ९,८३५ शेतकरी आहेत. असाच प्रकार पीक नुकसानीबाबत झाला आहे. नुकसान पिकांचे पंचनामे करून सहा महिन्याचा कालावधी उलटला तरी शासनाकडून पैसे जमा होत नाहीत.

एक लाख शेतकऱ्यांना ११२ कोटी

खरीप पीकविमा भरलेल्या एक लाख ९७ हजार ६६२ शेतकऱ्यांपैकी एक लाख ६३ हजार ९९० शेतकऱ्यांनी स्थानिक नैसर्गिक आपत्ती व काढणी पश्चात जोखीम अंतर्गत पूर्वसूचना दिल्या होत्या. तपासणीत २३,८८१ शेतकरी अपात्र झाले, तर पूर्वसूचना दिलेले ५५६३ शेतकरी विमा कंपनीला कागदपत्रे देत नाही. पात्र झालेल्या एक लाख ४० हजार १०९ शेतकऱ्यांपैकी एक लाख १७ हजार ८९२ शेतकऱ्यांच्या खात्यावर ११२ कोटी ७३ लाख ७३ हजार रुपये जमा झाले आहेत. पूर्वसूचना दिलेल्या १९ हजार शेतकरी विमा नुकसानभरपाईच्या प्रतीक्षेत आहेत.

३६ कोटी कधी जमा होणार?सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या २६ हजार १४२ शेतकऱ्यांना २३ हजार ८६७ हेक्टरसाठी ३६ कोटी दोन लाख रुपये मंजूर आहेत. उत्तर, दक्षिण सोलापूर व अक्कलकोट तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी १७ नोव्हेंबर रोजी मंजूर करण्यात आले आहेत. मात्र ही रक्कम अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली नाही.

* संततधार पावसाने नुकसान झालेल्या पिकांची नुकसानभरपाई मिळावी यासाठी मंद्रूप अपर तहसीलदार पाच कोटी, बार्शी तालुक्याचे १९ कोटी तसेच उत्तर सोलापूर, मंद्रूप अपर तहसील, माढा, करमाळा, पंढरपूर, मोहोळ, मंगळवेढा व सांगोला तालुक्यासाठी ९२ कोटींचा प्रस्ताव राज्य सरकारकडे गेला आहे. मात्र हे प्रस्ताव मंजूर झाले नाहीत.

त्या ३७ हजार शेतकऱ्यांचे काय?

खरीप हंगामातील पिकांसाठी एक लाख ९७ हजार ६६२ शेतकऱ्यांनी विमा भरला होता. त्यापैकी एक लाख ६३ हजार ९९० शेतकऱ्यांनी पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्याची पूर्वसूचना कृषी खाते व विमा कंपनीला दिली होती. पूर्वसूचना न दिलेल्या ३६ हजार ६७२ शेतकऱ्यांना विम्याची रक्कम मिळणार की नाही, हे माहिती नाही.

टॅग्स :Farmerशेतकरी