शहरं
Join us  
Trending Stories
1
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
2
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
3
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
4
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
5
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
6
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
7
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
8
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
9
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
10
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
11
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
12
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
13
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
14
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
16
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
17
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
18
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
19
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
20
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा

सोलापूर जिल्ह्यातील १०१ शाळांमध्ये ‘आरटीई’ प्रवेश नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2020 12:54 IST

सोलापूर जिल्ह्यात ३२९ शाळा : माळशिरसमध्ये सर्वात जास्त २६ शाळेत प्रवेश नाही

ठळक मुद्देयंदाच्या शैक्षणिक वर्षात सोलापूर शहर आणि जिल्ह्यात ३२९ शाळांमधून आरटीई प्रवेश प्रक्रिया राबवण्यात आली.३२ शाळा अशा आहेत त्यात प्रवेशासाठी एकाही पालकाने अर्ज केला नाही तर ६९ शाळा अशा आहेतज्यामध्ये प्रवेशासाठी अर्ज केल्यानंतर संबंधित पाल्याचा नंबर त्या शाळेत लागला नाही किंवा त्या शाळेत प्रवेश घेतलेला नाही

सोलापूर : बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमानुसार विनाअनुदानित शाळांमध्ये वंचित व दुर्बल घटकातील मुलांसाठी २५ टक्के जागा रिक्त ठेवण्यात येतात. सोलापूर जिल्ह्यातून ३२९ शाळांनी आरटीई अंतर्गत नोंदणी केलेली होती, यापैकी १०१ शाळांमध्ये एकाही विद्यार्थ्यांने आरटीई अंतर्गत प्रवेश घेतला नाही यामुळे ज्या शाळांमध्ये प्रवेश झालेले नाहीत त्याचे कारण शोधून त्या शाळांमध्ये सुविधा देण्यात याव्यात अशी मागणी पालकांकडून होत आहे.

यंदाच्या शैक्षणिक वर्षात सोलापूर शहर आणि जिल्ह्यात ३२९ शाळांमधून आरटीई प्रवेश प्रक्रिया राबवण्यात आली. यातील ३२ शाळा अशा आहेत त्यात प्रवेशासाठी एकाही पालकाने अर्ज केला नाही तर ६९ शाळा अशा आहेत की ज्यामध्ये प्रवेशासाठी अर्ज केल्यानंतर संबंधित पाल्याचा नंबर त्या शाळेत लागला नाही किंवा त्या शाळेत प्रवेश घेतलेला नाही़ यामुळे अशा शाळांमध्ये प्रवेश का होत नाहीत याची माहिती घेऊन पुढील उपाययोजना करावी अशी मागणी पालकांकडून होत आहे़ फेब्रुवारीपासून आरटीई अंतर्गत सुरू असलेली प्रवेश प्रक्रिया नुकतीच संपली असून सोलापूर जिल्ह्यातून जवळपास ८५ टक्के म्हणजेच २३६२ जागांपैकी २००५ जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आले. म्हणजेच ३५७ जागा मात्र शेवटच्या दिवसांपर्यंत रिक्त राहिल्या आहेत.

------------

प्रवेश न झालेल्या शाळांची यादी तालुक्यानुसार

तालुका प्रवेश न झालेल्या शाळांची संख्या

  • अक्कलकोट ३
  • बार्शी ३
  • करमाळा ४
  • माढा १२
  • माळशिरस २६
  • मंगळवेढा १२
  • पंढरपूर २२
  • सांगोला १३
  • उत्तर सोलापूर ३
  • दक्षिण सोलापूर ३

जिल्ह्यातील ज्या शाळांमध्ये आरटीई अंतर्गत प्रवेश झालेले नाहीत त्यांचे कारण शोधण्यात येईल़ याबाबत पालकांकडूनही प्रतिक्रिया आम्ही घेऊन पुढील काळात सर्व्हे करू. पुढील वर्षी आरटीई अंतर्गत जास्तीतजास्त प्रवेश होतील याकडे आम्ही लक्ष देऊ.

- संजयकुमार राठोड, प्राथमिक शिक्षणाधिकारी  

टॅग्स :SolapurसोलापूरEducationशिक्षणSchoolशाळा