शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

व्हायरल सत्य! चीननं 2012मध्ये खरंच भारताचा हवामान उपग्रह पाडला होता?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2019 18:14 IST

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मिशन शक्तीची घोषणा केल्यानंतर त्याची फार चर्चा झाली.

नवी दिल्ली- भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनीमिशन शक्तीची घोषणा केल्यानंतर त्याची फार चर्चा झाली. भारतानं 27 मार्चला मिशन शक्तीअंतर्गत उपग्रहरोधक शस्त्र म्हणजेच A-SATच्या माध्यमातून सॅटेलाइटचा वेध घेऊन ते पाडलं होतं. अशा प्रकारे भारताला अवकाश संशोधन क्षेत्रात मोठं यश मिळालं होतं. मिसाइलच्या सहाय्यानं उपग्रह पाडणाऱ्या देशांच्या यादीत अमेरिका, रशिया आणि चीननंतर भारत चौथा देश ठरला. परंतु यासंदर्भात काही पोस्टही व्हायरल झाल्या आहेत.चीननं 2012मध्ये भारताचा हवामान उपग्रह पाडल्याच्या पोस्टही प्रसिद्ध झाल्या होत्या. परंतु याची पडताळणी केली असता, ते सर्व खोटं असल्याचं समोर आलं आहे. फेसबुकवर अमित शाह फॅन्स नावाचं पेज आहे. या पेजचे 612163 फॉलोअर्स आहेत. या पेजवर 1 एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फोटोबरोबर एक दावा केला होता. 2012मध्ये चीननं भारताचा एक हवामान उपग्रह पाडला होता आणि आता भारतानं मिशन शक्ती केल्यानंतर शांत राहण्याचं आवाहन करत आहे. मोदींमुळेच हे शक्य झालं, असंही या पोस्टमध्ये लिहिलं आहे. या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स केल्या असून, 130हून अधिक लोकांनी मोदींवर स्तुतिसुमनं उधळली होती. 2012मध्ये चीननं एक उपग्रह पाडला होता, परंतु तो भारताचा नव्हता, असंही उघड झालं आहे.

चीन 2007पासून उपग्रहरोधक क्षेपणास्त्राची चाचणी घेत होता. त्यासाठी त्यांनी स्वतःचा निष्क्रिय झालेला उपग्रह पाडला होता. त्या उपग्रहाचं नाव फेंग्युन 1सी होतं. त्यावेळी नासाच्या संशोधकांनी त्यावर चिंता व्यक्त केली होती. जर चीननं खरंच भारताचा उपग्रह पाडला होता, तर त्याची चर्चा का नाही झाली. या बातमीचा कोठेही उल्लेख नाही. असं काही झालं असतं तर भारत सरकारनं याचा विरोध नक्कीच केला असता. त्या वृत्ताची कुठेही खातरजमा होत नसून ती अफवा असल्याची चर्चा आहे. 2012मध्ये चीननं भारताचा कोणताही उपग्रह पाडलेला नव्हता.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीchinaचीनMission Shaktiमिशन शक्ती