शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

कष्टाने मिळालेली नोकरी पण पहिल्या दिवशी दिला राजीनामा; कारण समजताच व्हाल हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2023 16:12 IST

तरुणाने स्वतः सोशल मीडियावर संपूर्ण गोष्ट शेअर केली आहे. पण आता मात्र त्याला आपल्या निर्णयाचा पश्चाताप होत आहे.

एखाद्याने पहिल्याच नोकरीचा पहिल्याच दिवशी राजीनामा दिला अस जर कोणी सांगितलं तर सुरुवातीला विश्वासच बसणार नाही. पण हो हे खरं आहे. दिल्लीतील एका तरुणाने असं केलं आहे. तरुणाच्या या निर्णयामुळे बहुतेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. दिल्लीतील एका तरुणाला गुरुग्राममध्ये पहिली नोकरी मिळाली. मात्र नोकरीत रुजू झाल्यानंतर पहिल्याच दिवशी त्याने राजीनामा दिला. सोशल मीडियावर त्याने याचं कारण सांगितलं. घरापासून ऑफिस लांब असल्याने पहिल्याच दिवशी नोकरी सोडल्याचं या तरुणाचे म्हणणं आहे.

तरुणाने स्वतः सोशल मीडियावर संपूर्ण गोष्ट शेअर केली आहे. पण आता मात्र त्याला आपल्या निर्णयाचा पश्चाताप होत आहे. कारण मोठ्या संख्येने लोक दिल्लीहून गुरुग्रामला नोकरीसाठी जातात आणि असे लोक आता या तरुणांना सल्ला देत आहेत की चांगली नोकरी, चांगला पगार यासाठी काही समस्यांना तोंड द्यावं लागेल. घरी बसून नोकरी कुठे मिळेल? हा तरुण दिल्लीच्या नॉर्थ वेस्ट भागात राहत होता. 

मुलाखतीच्या अनेक फेऱ्या पूर्ण केल्यानंतर ही नोकरी मिळाल्याचं त्याने सांगितलं. मी खूप उत्साही होतो.. कारण ही माझी पहिली नोकरी होती. पण नंतर लक्षात आले की या कामासाठी रोज खूप प्रवास करावा लागतो. कारण मी दिल्लीच्या नॉर्थ वेस्ट भागात पिंकलाइनवर राहत होतो आणि नोकरी मौलसरी अव्हेन्यूमध्ये होती. तरुणांच्या म्हणण्यानुसार, या नोकरीमुळे तो घरात फक्त 3 तास राहू शकत होता. याशिवाय प्रवासासाठी पाच हजार रुपये खर्च करावे लागले. त्यानंतर त्याने राजीनामा दिला.

लोकांनी तरुणाला सांगितलं की बहुतांश चांगल्या कंपन्या फक्त गुरुग्राममध्ये आहेत. त्यामुळे तुला चांगल्या नोकरीसाठी प्रवास करावा लागेल. आपला अनुभव शेअर करताना एका युजरने लिहिले की, मी गाझियाबादहून दररोज गुरुग्रामला जातो. एका बाजूने प्रवास करण्यासाठी मला सुमारे 120-130 मिनिटे लागतात. मी अभ्यास करण्यासाठी माझ्या वरिष्ठांकडून पुस्तकं घेतो आणि मेट्रोमध्ये अभ्यास करतो. हे काम 6 वर्षांपासून सुरू आहे. प्रवासाला जास्त वेळ लागत असेल तर त्या वेळेचा सदुपयोग करायला शिका. तुमच्या मार्गावरून जाणाऱ्या सहकाऱ्यांशी मैत्री करा. वेळ छान निघून जाईल. 

आणखी एका युजरने लिहिले की, दिल्लीतील निम्मे लोक रोज गुरुग्रामला जातात. अधिक कमाई करण्यासाठी, तुला धावावं लागेल. त्यानंतर या तरुणाला वाईट वाटलं. त्याने आपली पोस्ट एडीट करून मी घाईघाईने निर्णय घेतल्याचं लिहिलं. लोक रोज एवढा प्रवास करतात हे मला माहितही नव्हते. माझ्याशी बोलायला कोणीच नव्हतं म्हणून घाईघाईने हा निर्णय घेतला. पण भविष्यात मला जी काही संधी मिळेल त्यावर मी चांगले काम करेन असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :jobनोकरीSocial Viralसोशल व्हायरलResignationराजीनामा