शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
2
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
3
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
4
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
5
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
6
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
7
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
8
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
9
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
10
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
11
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
12
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
13
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
14
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
15
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
16
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
17
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
18
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
19
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...
20
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू

कष्टाने मिळालेली नोकरी पण पहिल्या दिवशी दिला राजीनामा; कारण समजताच व्हाल हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2023 16:12 IST

तरुणाने स्वतः सोशल मीडियावर संपूर्ण गोष्ट शेअर केली आहे. पण आता मात्र त्याला आपल्या निर्णयाचा पश्चाताप होत आहे.

एखाद्याने पहिल्याच नोकरीचा पहिल्याच दिवशी राजीनामा दिला अस जर कोणी सांगितलं तर सुरुवातीला विश्वासच बसणार नाही. पण हो हे खरं आहे. दिल्लीतील एका तरुणाने असं केलं आहे. तरुणाच्या या निर्णयामुळे बहुतेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. दिल्लीतील एका तरुणाला गुरुग्राममध्ये पहिली नोकरी मिळाली. मात्र नोकरीत रुजू झाल्यानंतर पहिल्याच दिवशी त्याने राजीनामा दिला. सोशल मीडियावर त्याने याचं कारण सांगितलं. घरापासून ऑफिस लांब असल्याने पहिल्याच दिवशी नोकरी सोडल्याचं या तरुणाचे म्हणणं आहे.

तरुणाने स्वतः सोशल मीडियावर संपूर्ण गोष्ट शेअर केली आहे. पण आता मात्र त्याला आपल्या निर्णयाचा पश्चाताप होत आहे. कारण मोठ्या संख्येने लोक दिल्लीहून गुरुग्रामला नोकरीसाठी जातात आणि असे लोक आता या तरुणांना सल्ला देत आहेत की चांगली नोकरी, चांगला पगार यासाठी काही समस्यांना तोंड द्यावं लागेल. घरी बसून नोकरी कुठे मिळेल? हा तरुण दिल्लीच्या नॉर्थ वेस्ट भागात राहत होता. 

मुलाखतीच्या अनेक फेऱ्या पूर्ण केल्यानंतर ही नोकरी मिळाल्याचं त्याने सांगितलं. मी खूप उत्साही होतो.. कारण ही माझी पहिली नोकरी होती. पण नंतर लक्षात आले की या कामासाठी रोज खूप प्रवास करावा लागतो. कारण मी दिल्लीच्या नॉर्थ वेस्ट भागात पिंकलाइनवर राहत होतो आणि नोकरी मौलसरी अव्हेन्यूमध्ये होती. तरुणांच्या म्हणण्यानुसार, या नोकरीमुळे तो घरात फक्त 3 तास राहू शकत होता. याशिवाय प्रवासासाठी पाच हजार रुपये खर्च करावे लागले. त्यानंतर त्याने राजीनामा दिला.

लोकांनी तरुणाला सांगितलं की बहुतांश चांगल्या कंपन्या फक्त गुरुग्राममध्ये आहेत. त्यामुळे तुला चांगल्या नोकरीसाठी प्रवास करावा लागेल. आपला अनुभव शेअर करताना एका युजरने लिहिले की, मी गाझियाबादहून दररोज गुरुग्रामला जातो. एका बाजूने प्रवास करण्यासाठी मला सुमारे 120-130 मिनिटे लागतात. मी अभ्यास करण्यासाठी माझ्या वरिष्ठांकडून पुस्तकं घेतो आणि मेट्रोमध्ये अभ्यास करतो. हे काम 6 वर्षांपासून सुरू आहे. प्रवासाला जास्त वेळ लागत असेल तर त्या वेळेचा सदुपयोग करायला शिका. तुमच्या मार्गावरून जाणाऱ्या सहकाऱ्यांशी मैत्री करा. वेळ छान निघून जाईल. 

आणखी एका युजरने लिहिले की, दिल्लीतील निम्मे लोक रोज गुरुग्रामला जातात. अधिक कमाई करण्यासाठी, तुला धावावं लागेल. त्यानंतर या तरुणाला वाईट वाटलं. त्याने आपली पोस्ट एडीट करून मी घाईघाईने निर्णय घेतल्याचं लिहिलं. लोक रोज एवढा प्रवास करतात हे मला माहितही नव्हते. माझ्याशी बोलायला कोणीच नव्हतं म्हणून घाईघाईने हा निर्णय घेतला. पण भविष्यात मला जी काही संधी मिळेल त्यावर मी चांगले काम करेन असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :jobनोकरीSocial Viralसोशल व्हायरलResignationराजीनामा