शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

'बैलगाडीतून जाईन पण Air India मध्ये पुन्हा बसणार नाही', प्रवाशाचा संताप; नेमकं काय झालं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2024 21:07 IST

गेल्या काही काळापासून विमान कंपन्यांबाबत प्रवासी सातत्याने तक्रारी करत आहेत.

Air India : गेल्या काही काळापासून देशातील काही विमान कंपन्यांबाबत प्रवासी सातत्याने तक्रारी करत आहेत. यात एअर इंडियाचे नाव आघाडीवर असते. ग्राहकांनी सोशल मीडियाद्वारे केलेल्या तक्रारींची बरीच चर्चा होते. आता एअर इंडियाच्या बंगळुरू-पुणे फ्लाईटबाबत एका प्रवाशाने तक्रार केली आहे. एका स्टार्टअप कंपनीचे उपाध्यक्ष असलेल्या आदित्य कोंडावार यांनी एक्सवर केलेल्या एका पोस्टद्वारे एअर इंडियाबाबत संताप व्यक्त केला.

त्यांनी म्हटले की, 'प्रिय एअर इंडिया, काल रात्री मला एक खास धडा शिकवल्याबद्दल धन्यवाद. मी हे पूर्ण गांभीर्याने बोलतोय, मी माझ्या आयुष्यात कधीही एअर इंडिया एक्स्प्रेस किंवा एअर इंडियाच्या विमानात बसणार नाही. गरज भासल्यास मी 100% अतिरिक्त पैसे देऊन दुसऱ्या कंपनीचे विमान घेईन किंवा बैलगाडीतून जाईन.'

त्यांनी पुढे लिहिले, 'माझी 9.50 ची फ्लाइट 12.15/12.20 ला टेक ऑफ झाली. फ्लाईटमध्ये अतिशय घाण वास येत होता आणि सीट्सदेखील अतिशय घाण डागांनी भरलेल्या होत्या. मला टाटा समूह आणि त्यांच्या प्रमुखांबद्दल खूप आदर आहे. मी त्यांच्याकडून नेहमीच परिपूर्णतेची अपेक्षा करतो.' या पोस्टनंतर एअर इंडिया एक्सप्रेसने त्यांच्या पोस्टला रिप्लाय दिला आणि समस्येचे तात्काळ निराकरण करण्याचे आश्वासन दिले. 

कंपनीने म्हटले, 'आदित्य, तुम्हाला झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीरी व्यक्त करतो. कृपया लक्षात घ्या की, काही समस्या आमच्या नियंत्रणाबाहेर असतात, ज्यामुळे उशीर झाला. तुम्हाला विमानात झालेल्या समस्येकडे आम्ही लक्ष देऊ आणि त्याचे त्वरित निराकरण करू.' दरम्यान, आदित्यच्या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स करुन त्यांचा एअर इंडियाचा अनुभव शेअर केला.

टॅग्स :Air Indiaएअर इंडियाairplaneविमानSocial Viralसोशल व्हायरल