शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
2
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
3
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
4
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
5
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
6
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
7
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
8
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
9
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
10
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
11
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
12
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
13
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
14
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
15
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
16
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
17
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
18
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
19
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

कणकवलीतील उड्डाणपूलाचे काम रखडले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2020 17:45 IST

मुंबई - गोवा महामार्ग चौपदरीकरण कामांतर्गत कणकवली शहरात उभारण्यात येणारा उड्डाणपूल ऑक्टोबर महिन्यात पूर्ण होऊन तो वाहतुकीस खुला होईल. असे आश्वासन दिलीप बिल्डकॉन या ठेकेदार कंपनीकडून दिले होते. मात्र, सद्य:स्थितीत हा उड्डाणपूल निर्धारित वेळेत पूर्ण होण्याची आशा धूसर झाली आहे.

ठळक मुद्देऑक्टोबरमध्ये वाहतुकीस खुला होण्याची चिन्हे धूसर ठेकेदार कंपनीचा हलगर्जीपणा वारंवार उघड

सुधीर राणे कणकवली : मुंबई - गोवा महामार्ग चौपदरीकरण कामांतर्गत कणकवली शहरात उभारण्यात येणारा उड्डाणपूल ऑक्टोबर महिन्यात पूर्ण होऊन तो वाहतुकीस खुला होईल. असे आश्वासन दिलीप बिल्डकॉन या ठेकेदार कंपनीकडून पालकमंत्री उदय सामंत यांनी घेतलेल्या चौपदरीकरण कामाच्या आढावा बैठकीत दिले होते. मात्र, सद्य:स्थितीत त्या कामाचा दर्जा व स्थिती पाहिली असता हा उड्डाणपूल निर्धारित वेळेत पूर्ण होण्याची आशा धूसर झाली आहे. तर वेळोवेळी अनेक प्रसंगातून ठेकेदार कंपनीचा हलगर्जीपणाच समोर येत आहे.कणकवली येथील विजय भवनच्या सभागृहात महामार्ग कामाची आढावा बैठक पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली २१ मे रोजी झाली होती. यावेळी आमदार वैभव नाईक, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, कोकण सिंचन मंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर, संजय पडते,अतुल रावराणे,प्रांताधिकारी वैशाली राजमाने,तहसीलदार आर.जे.पवार,महामार्ग प्राधिकरण अधिकारी व विविध विभागाचे अधिकारी, ठेकेदार कंपनीचे अधिकारी उपस्थित होते.यावेळी गडनदी ते जानवली नदी उड्डाण पूल वाहतुकीसाठी कधी खुला होणार ? याबाबत कणकवलीवासीयांच्यावतीने संदेश पारकर यांनी ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली होती. त्यावेळी कणकवलीतील उड्डाण पूल ऑक्टोबर मध्ये वाहतूकीस खुला होईल.असे दिलीप बिल्डकाँनचे गौतमकुमार यांनी सांगितले होते. मात्र, त्यानंतर कणकवली एस.एम. हायस्कूल नजीक बॉक्सेलच्या भिंतीला भगदाड पडले. त्यामुळे कणकवली वासीयांनी आंदोलन करावे लागले. तर सामाजिक कार्यकर्त्यांना न्यायालयात धाव घ्यावी लागली.

बॉक्सेल ऐवजी पूर्ण पिलर घालून उड्डाणपुलच करा अशी मागणी आता पुढे आली आहे. त्यासाठी भाजपचे प्रदेश सचिव माजी आमदार प्रमोद जठार माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यासह आपल्या पक्षातील इतर नेत्यांच्या सोबत केंद्रिय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे प्रयत्न करीत आहेत. खासदार विनायक राऊत यांनीही या मागणीला पाठींबा दर्शविला आहे. या मागणीला यश यावे अशी कणकवलीवासीयांची इच्छा आहे.शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळील उड्डाणपुलाचे काम सुरू असताना ३१ जुलै रोजी तेथील स्लॅबचा काही भाग कोसळला. त्यामुळे परत कणकवलीवासीय आक्रमक झाले. ठेकेदार कंपनीचा हलगर्जीपणा वारंवार उघड होत असल्याने दुर्घटना घडून जीवितहानी होवू नये यासाठी गणेशोत्सव होईपर्यंत उड्डाणपुलाचे काम बंद ठेवण्याची मागणी त्यांच्याकडून करण्यात आली आहे. त्यामुळे सध्या काम बंद आहे.त्यानंतर उबाळे मेडीकल जवळ उड्डाणपुलाच्या खाली सर्व्हिस रोड लगत सुरक्षिततेसाठी उभा केलेला एक पत्रा ४ ऑगस्ट रोजी चारचाकी गाडीवर पडला. मात्र, चालकाच्या प्रसंगावधानाने मोठी दुर्घटना टळली. ठेकेदार कंपनीने सुरक्षिततेची व्यवस्थित काळजी न घेतल्याने अशा दुर्घटना वरचेवर घडत आहेत. त्यामुळे कामाला विलंब होत आहे. त्यात सध्या पावसाने जोर धरला आहे. त्यामुळे कामगारांना काम करताना अडचणी येत आहेत. यासर्व पार्श्वभूमीवर उड्डाणपुलाचे काम रखडले आहे.तीन वर्षाहून अधिक काळ महामार्ग चौपदरीकरणाचे काम सूरु आहे. त्यामुळे फार मोठी गैरसोय होत असून कणकवलीवासीय आता या कामाला कंटाळले आहेत. केव्हा एखदा हे काम पूर्ण होते आणि आपली वारंवार उदभवणाऱ्या समस्यांपासून सुटका होते. असे त्याना झाले आहे. त्यामुळे शासन आणि प्रशासन यांनी वेळीच याकडे लक्ष देऊन महामार्ग चौपदरीकरण कामामुळे निर्माण झालेल्या समस्येतून नागरिकांची सुटका करावी. अन्यथा नागरिकांच्या तीव्र आंदोलनाला आता त्यांना लवकरच सामोरे जावे लागेल.महामार्ग समस्यांप्रकरणी उपोषण !महामार्ग चौपदरीकरणामुळे उदभवलेल्या समस्या दूर व्हाव्यात यासाठी कणकवली वासीयांनी विविध प्रकारची आंदोलने केली आहेत. वयोवृद्ध नागरिकांनी उपोषणही केले होते. तर महामार्ग प्राधिकरणच्या उपभियंत्यांवर चिखलफेकही झाली होती. आता परत काँग्रेसचे कणकवली तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर यांनी प्रांताधिकारी कार्यालया समोर उपोषण सुरू केले आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्ताना शासनाकडून आता तरी न्याय मिळणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

टॅग्स :highwayमहामार्गsindhudurgसिंधुदुर्गKankavliकणकवली