शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

कणकवलीतील उड्डाणपूलाचे काम रखडले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2020 17:45 IST

मुंबई - गोवा महामार्ग चौपदरीकरण कामांतर्गत कणकवली शहरात उभारण्यात येणारा उड्डाणपूल ऑक्टोबर महिन्यात पूर्ण होऊन तो वाहतुकीस खुला होईल. असे आश्वासन दिलीप बिल्डकॉन या ठेकेदार कंपनीकडून दिले होते. मात्र, सद्य:स्थितीत हा उड्डाणपूल निर्धारित वेळेत पूर्ण होण्याची आशा धूसर झाली आहे.

ठळक मुद्देऑक्टोबरमध्ये वाहतुकीस खुला होण्याची चिन्हे धूसर ठेकेदार कंपनीचा हलगर्जीपणा वारंवार उघड

सुधीर राणे कणकवली : मुंबई - गोवा महामार्ग चौपदरीकरण कामांतर्गत कणकवली शहरात उभारण्यात येणारा उड्डाणपूल ऑक्टोबर महिन्यात पूर्ण होऊन तो वाहतुकीस खुला होईल. असे आश्वासन दिलीप बिल्डकॉन या ठेकेदार कंपनीकडून पालकमंत्री उदय सामंत यांनी घेतलेल्या चौपदरीकरण कामाच्या आढावा बैठकीत दिले होते. मात्र, सद्य:स्थितीत त्या कामाचा दर्जा व स्थिती पाहिली असता हा उड्डाणपूल निर्धारित वेळेत पूर्ण होण्याची आशा धूसर झाली आहे. तर वेळोवेळी अनेक प्रसंगातून ठेकेदार कंपनीचा हलगर्जीपणाच समोर येत आहे.कणकवली येथील विजय भवनच्या सभागृहात महामार्ग कामाची आढावा बैठक पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली २१ मे रोजी झाली होती. यावेळी आमदार वैभव नाईक, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, कोकण सिंचन मंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर, संजय पडते,अतुल रावराणे,प्रांताधिकारी वैशाली राजमाने,तहसीलदार आर.जे.पवार,महामार्ग प्राधिकरण अधिकारी व विविध विभागाचे अधिकारी, ठेकेदार कंपनीचे अधिकारी उपस्थित होते.यावेळी गडनदी ते जानवली नदी उड्डाण पूल वाहतुकीसाठी कधी खुला होणार ? याबाबत कणकवलीवासीयांच्यावतीने संदेश पारकर यांनी ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली होती. त्यावेळी कणकवलीतील उड्डाण पूल ऑक्टोबर मध्ये वाहतूकीस खुला होईल.असे दिलीप बिल्डकाँनचे गौतमकुमार यांनी सांगितले होते. मात्र, त्यानंतर कणकवली एस.एम. हायस्कूल नजीक बॉक्सेलच्या भिंतीला भगदाड पडले. त्यामुळे कणकवली वासीयांनी आंदोलन करावे लागले. तर सामाजिक कार्यकर्त्यांना न्यायालयात धाव घ्यावी लागली.

बॉक्सेल ऐवजी पूर्ण पिलर घालून उड्डाणपुलच करा अशी मागणी आता पुढे आली आहे. त्यासाठी भाजपचे प्रदेश सचिव माजी आमदार प्रमोद जठार माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यासह आपल्या पक्षातील इतर नेत्यांच्या सोबत केंद्रिय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे प्रयत्न करीत आहेत. खासदार विनायक राऊत यांनीही या मागणीला पाठींबा दर्शविला आहे. या मागणीला यश यावे अशी कणकवलीवासीयांची इच्छा आहे.शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळील उड्डाणपुलाचे काम सुरू असताना ३१ जुलै रोजी तेथील स्लॅबचा काही भाग कोसळला. त्यामुळे परत कणकवलीवासीय आक्रमक झाले. ठेकेदार कंपनीचा हलगर्जीपणा वारंवार उघड होत असल्याने दुर्घटना घडून जीवितहानी होवू नये यासाठी गणेशोत्सव होईपर्यंत उड्डाणपुलाचे काम बंद ठेवण्याची मागणी त्यांच्याकडून करण्यात आली आहे. त्यामुळे सध्या काम बंद आहे.त्यानंतर उबाळे मेडीकल जवळ उड्डाणपुलाच्या खाली सर्व्हिस रोड लगत सुरक्षिततेसाठी उभा केलेला एक पत्रा ४ ऑगस्ट रोजी चारचाकी गाडीवर पडला. मात्र, चालकाच्या प्रसंगावधानाने मोठी दुर्घटना टळली. ठेकेदार कंपनीने सुरक्षिततेची व्यवस्थित काळजी न घेतल्याने अशा दुर्घटना वरचेवर घडत आहेत. त्यामुळे कामाला विलंब होत आहे. त्यात सध्या पावसाने जोर धरला आहे. त्यामुळे कामगारांना काम करताना अडचणी येत आहेत. यासर्व पार्श्वभूमीवर उड्डाणपुलाचे काम रखडले आहे.तीन वर्षाहून अधिक काळ महामार्ग चौपदरीकरणाचे काम सूरु आहे. त्यामुळे फार मोठी गैरसोय होत असून कणकवलीवासीय आता या कामाला कंटाळले आहेत. केव्हा एखदा हे काम पूर्ण होते आणि आपली वारंवार उदभवणाऱ्या समस्यांपासून सुटका होते. असे त्याना झाले आहे. त्यामुळे शासन आणि प्रशासन यांनी वेळीच याकडे लक्ष देऊन महामार्ग चौपदरीकरण कामामुळे निर्माण झालेल्या समस्येतून नागरिकांची सुटका करावी. अन्यथा नागरिकांच्या तीव्र आंदोलनाला आता त्यांना लवकरच सामोरे जावे लागेल.महामार्ग समस्यांप्रकरणी उपोषण !महामार्ग चौपदरीकरणामुळे उदभवलेल्या समस्या दूर व्हाव्यात यासाठी कणकवली वासीयांनी विविध प्रकारची आंदोलने केली आहेत. वयोवृद्ध नागरिकांनी उपोषणही केले होते. तर महामार्ग प्राधिकरणच्या उपभियंत्यांवर चिखलफेकही झाली होती. आता परत काँग्रेसचे कणकवली तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर यांनी प्रांताधिकारी कार्यालया समोर उपोषण सुरू केले आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्ताना शासनाकडून आता तरी न्याय मिळणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

टॅग्स :highwayमहामार्गsindhudurgसिंधुदुर्गKankavliकणकवली