शहरं
Join us  
Trending Stories
1
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
2
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
3
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
4
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
5
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
6
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
7
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
8
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
9
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
10
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
11
प्रेमासाठी ओलांडल्या देशासह धर्माच्या सीमा; पाकिस्तानी तरुणावर जडला भारतीय महिलेचा जीव
12
बिहारमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; मंत्रिमंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला?
13
पत्नीच्या नावाने म्युच्युअल फंडात SIP करताय? टॅक्स स्लॅब आणि 'कॅपिटल गेन्स'चे नियम स्पष्ट समजून घ्या!
14
जबरदस्तीची मिठी अन् दोन वेळा Kiss...! प्रसिद्ध ज्वेलर्सच्या मुलाचं घाणेरड कृत्य; व्हिडिओ व्हायरल
15
भारताचा लाजिरवाणा पराभव! आफ्रिकेने हरवल्यानंतर उपकर्णधार पंत म्हणतो- "आज झालेला पराभव...
16
दिल्ली स्फोट प्रकरण: डझनभर डॉक्टरांचे फोन बंद; 'अल फलाह' विद्यापीठातील मोठे नेटवर्क उघड
17
IND vs SA : आम्ही जिंकलो असतो तर...! लाजिरवाण्या पराभवानंतर नेमकं काय म्हणाले कोच गौतम गंभीर?
18
‘वंदे भारत’च्या मदतीला TATA कंपनी? ट्रेन बांधणीत ठरणार गेम चेंजर! ‘मेक इन इंडिया’ वेग घेणार
19
टीम इंडियासमोर दक्षिण आफ्रिकेची कमाल! 'लो स्कोअरिंग' टेस्टमध्ये बेस्ट कामगिरीसह मारली बाजी
20
“काही ठिकाणी महायुती झाली, कुठे नाही, परवापर्यंत सगळे समजेल”: CM फडणवीसांनी केले स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग  जिल्ह्यात राडेबाजीची संस्कृती चालू देणार नाही : वैभव नाईक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 12:34 IST

राडेबाजी हाच स्वाभिमान पक्षाचा एकमेव अजेंडा आहे. मात्र राडेबाजीची संस्कृती जिल्ह्यात आम्ही चालू देणार नाही. कुठेही दहशत निर्माण केली गेली तर त्याविरोधात आम्ही उभे रहाणार असल्याचा ठाम विश्वास शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार वैभव नाईक यांनी येथे व्यक्त केला.

ठळक मुद्देसिंधुदुर्ग जिल्ह्यात राडेबाजीची संस्कृती चालू देणार नाही : वैभव नाईकनलावडे-पारकर गटातील हाणामारीनंतर नाईक यांची पत्रकार परिषद

कणकवली : राडेबाजी हाच स्वाभिमान पक्षाचा एकमेव अजेंडा आहे. मात्र राडेबाजीची संस्कृती सिंधुदुर्ग जिल्ह्यात आम्ही चालू देणार नाही. कुठेही दहशत निर्माण केली गेली तर त्याविरोधात आम्ही उभे रहाणार असल्याचा ठाम विश्वास शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार वैभव नाईक यांनी येथे व्यक्त केला.कणकवलीत झालेल्या नलावडे-पारकर गटातील हाणामारीनंतर आमदार नाईक यांनी येथील विजय भवनमध्ये गुरुवारी पत्रकार परिषद घेतली.यावेळी आमदार नाईक म्हणाले, कणकवली नगरपंचायत निवडणुकीत राणे पितापुत्रांनी विकासाचा नारा दिला होता. मात्र निवडणुकीनंतर अवघ्या सहा महिन्यात त्यांच्या पक्षाचे नगराध्यक्ष कणकवली शहरातून दांडे घेऊन फिरत आहेत.

दुसरे एक नगरसेवक आपल्या फ्लॅटधारकांना गोळीबार करून धमकावत आहेत. नुकतेच स्वाभिमान शहराध्यक्षपदी विराजमान झालेले घरातून भाडेकरुना बाहेर काढत आहेत. त्यामुळे सिंधुदुर्ग वासियाना त्यांची संस्कृती दिसून आली आहे.राणेंच्या कार्यकर्त्यांच्या याच राडेबाजीमुळे त्यांना कुठला पक्ष जवळ करीत नाही. आता सिंधुदुर्ग जिल्हयापुरता मर्यादीत असलेल्या स्वाभिमान पक्षाचा राडेबाजी हाच एकमेव अजेंडा राहिला आहे. तसेच स्वाभिमानचे कुठलेही पद घेतल्यानंतर राडेबाजी करायलाच हवी असे नूतन पदाधिकाऱ्यांच्या राडेबाजीतील सहभागावरुन दिसून येत आहे. त्यामुळे येणाऱ्या कालावधीत स्वाभिमान पक्षाला सिंधुदुर्गवासीय स्वीकारणार नाहीत.कणकवली शहरात बसविलेले अनेक सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत. ते सुरु करण्याची मागणी आम्ही करणार आहोत. सीसीटीव्ही कॅमेरे असतील तर अशा घटनाना आळा बसेल. जिल्हा नियोजन मधून 20 लाखांचा निधी मंजूर झाला असुन कुडाळ आणि कणकवली येथे लवकरच सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येतील .असेही यावेळी वैभव नाईक यांनी सांगितले.आम्ही दहशतवादाच्या विरोधात !यापूर्वीही अनेक वेळा शिवसेना दहशतवादाच्या विरोधात उभी राहिली आहे. त्यामुळे जिल्ह्यात कुठेही दहशतीचा प्रकार झाला तर शिवसेना त्याविरोधात ठामपणे उभी रहाणार आहे. दहशतीचे वातावरण निर्माण करणारे कोणत्याही पक्षाचे असतील तर त्याला आमचा विरोध राहील. दहशत रोखण्यासाठीच जनतेने आम्हाला निवडून दिले आहे. असे यावेळी पत्रकारानी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरादरम्यान वैभव नाईक यानी सांगितले.

टॅग्स :Vaibhav Naikवैभव नाईक sindhudurgसिंधुदुर्ग