शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
5
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
6
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
7
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
8
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
9
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
10
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
11
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
12
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
13
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
14
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
15
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
16
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
17
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
18
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
19
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
20
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ

सिंधुदुर्ग  जिल्ह्यात राडेबाजीची संस्कृती चालू देणार नाही : वैभव नाईक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 12:34 IST

राडेबाजी हाच स्वाभिमान पक्षाचा एकमेव अजेंडा आहे. मात्र राडेबाजीची संस्कृती जिल्ह्यात आम्ही चालू देणार नाही. कुठेही दहशत निर्माण केली गेली तर त्याविरोधात आम्ही उभे रहाणार असल्याचा ठाम विश्वास शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार वैभव नाईक यांनी येथे व्यक्त केला.

ठळक मुद्देसिंधुदुर्ग जिल्ह्यात राडेबाजीची संस्कृती चालू देणार नाही : वैभव नाईकनलावडे-पारकर गटातील हाणामारीनंतर नाईक यांची पत्रकार परिषद

कणकवली : राडेबाजी हाच स्वाभिमान पक्षाचा एकमेव अजेंडा आहे. मात्र राडेबाजीची संस्कृती सिंधुदुर्ग जिल्ह्यात आम्ही चालू देणार नाही. कुठेही दहशत निर्माण केली गेली तर त्याविरोधात आम्ही उभे रहाणार असल्याचा ठाम विश्वास शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार वैभव नाईक यांनी येथे व्यक्त केला.कणकवलीत झालेल्या नलावडे-पारकर गटातील हाणामारीनंतर आमदार नाईक यांनी येथील विजय भवनमध्ये गुरुवारी पत्रकार परिषद घेतली.यावेळी आमदार नाईक म्हणाले, कणकवली नगरपंचायत निवडणुकीत राणे पितापुत्रांनी विकासाचा नारा दिला होता. मात्र निवडणुकीनंतर अवघ्या सहा महिन्यात त्यांच्या पक्षाचे नगराध्यक्ष कणकवली शहरातून दांडे घेऊन फिरत आहेत.

दुसरे एक नगरसेवक आपल्या फ्लॅटधारकांना गोळीबार करून धमकावत आहेत. नुकतेच स्वाभिमान शहराध्यक्षपदी विराजमान झालेले घरातून भाडेकरुना बाहेर काढत आहेत. त्यामुळे सिंधुदुर्ग वासियाना त्यांची संस्कृती दिसून आली आहे.राणेंच्या कार्यकर्त्यांच्या याच राडेबाजीमुळे त्यांना कुठला पक्ष जवळ करीत नाही. आता सिंधुदुर्ग जिल्हयापुरता मर्यादीत असलेल्या स्वाभिमान पक्षाचा राडेबाजी हाच एकमेव अजेंडा राहिला आहे. तसेच स्वाभिमानचे कुठलेही पद घेतल्यानंतर राडेबाजी करायलाच हवी असे नूतन पदाधिकाऱ्यांच्या राडेबाजीतील सहभागावरुन दिसून येत आहे. त्यामुळे येणाऱ्या कालावधीत स्वाभिमान पक्षाला सिंधुदुर्गवासीय स्वीकारणार नाहीत.कणकवली शहरात बसविलेले अनेक सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत. ते सुरु करण्याची मागणी आम्ही करणार आहोत. सीसीटीव्ही कॅमेरे असतील तर अशा घटनाना आळा बसेल. जिल्हा नियोजन मधून 20 लाखांचा निधी मंजूर झाला असुन कुडाळ आणि कणकवली येथे लवकरच सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येतील .असेही यावेळी वैभव नाईक यांनी सांगितले.आम्ही दहशतवादाच्या विरोधात !यापूर्वीही अनेक वेळा शिवसेना दहशतवादाच्या विरोधात उभी राहिली आहे. त्यामुळे जिल्ह्यात कुठेही दहशतीचा प्रकार झाला तर शिवसेना त्याविरोधात ठामपणे उभी रहाणार आहे. दहशतीचे वातावरण निर्माण करणारे कोणत्याही पक्षाचे असतील तर त्याला आमचा विरोध राहील. दहशत रोखण्यासाठीच जनतेने आम्हाला निवडून दिले आहे. असे यावेळी पत्रकारानी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरादरम्यान वैभव नाईक यानी सांगितले.

टॅग्स :Vaibhav Naikवैभव नाईक sindhudurgसिंधुदुर्ग