शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

यशस्वी घोडदौड कायम ठेवणार

By admin | Updated: April 22, 2016 23:53 IST

नीतेश राणे यांचा विश्वास : नारायण राणेंनी करपलेली भाकरी योग्य वेळी बदलल्याने काँग्रेसला यश

कणकवली : नारायण राणे यांनी करपलेली भाकरी योग्यवेळी पलटल्याने जिल्हा बँक, कृषी उत्पन्न बाजार समिती, वैभववाडी, दोडामार्ग व नुकतीच झालेल्या कुडाळ नगरपंचायतीमध्ये काँग्रेसला चांगले यश मिळाले आहे. कुजलेले काही आंबे आमच्यापासून लोकांना दूर ठेवत होते. त्यांना राणेंनी बाजूला केल्यामुळे यशस्वी होवू शकलो. ही जिल्ह्यातील यशस्वी घोडदौड कायम ठेवणार असल्याचा विश्वास आमदार नीतेश राणे यांनी कणकवली येथील पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केला.नीतेश राणे म्हणाले, कुडाळ नगरपंचायत निकाल काँग्रेस आघाडीच्या बाजूने लागला. हे निव्वळ राणेसाहेबांचेच यश आहे. त्यांनी घेतलेली मेहनत आणि बसविलेल्या नियोजनामुळे सत्तेमध्ये नसतानाही आणि आतापर्यंत काँग्रेसच्या विरोधात असलेले कुडाळ शहरवासीयांनी आम्हाला चांगला कौल दिला आहे. त्यामुळे त्यांचे आभार मानणे गरजेचे आहे. त्यांनी आमच्यावर टाकलेला विश्वास सार्थकी लावण्यासाठी दिवसरात्र मेहनत घेणार आहे. कुडाळवासीयांना दोन वर्षातच आपली चूक समजल्यामुळे त्यांनी राणेसाहेबांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा विश्वास दाखविला आहे.विधीमंडळामध्ये कोकण आणि मुंबईबाबत चर्चा झाली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी उत्तर देताना कोकणासाठी स्वतंत्र महामंडळ आणि करोडोंचे पॅकेज जाहीर केले. सर्व दैनिकांनी याच्या हेडलाईन केल्या. मात्र, या सरकारने विश्वासार्हता एवढी गमावली आहे की, या घोषणेनंतरही मुख्यमंत्र्यांना टाहो फोडून भाषणबाजी करूनही कुडाळमधील एकच नगरसेवक निवडून आला. त्यामुळे सरकारच्या विश्वासार्हतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. तुम्ही जर एवढा निधी आणला तर येथील जनता एकहाती तुमच्याकडे सत्ता देणे अपेक्षीत होते. तुमच्या फुगविलेल्या आकडेवारीवर जनतेचा विश्वासच राहिलेला नाही. आधी याबाबत विचार करा, असा टोलाही नीतेश राणे यांनी लगावला.या पत्रकार परिषदेदरम्यान, राणे यांनी पालकमंत्री दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक, तसेच काँग्रेस सोडून शिवसेनेत आणि भाजपमध्ये गेलेल्या पदाधिकाऱ्यांवर जोरदार हल्ला चढविला. (विशेष प्रतिनिधी)दानवेंचे आभार : प्रमोद जठारांमुळे भाजपला सिंधुदुर्गात ‘अच्छे दिन’भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी प्रमोद जठार यांची जिल्हाध्यक्षपदी निवड केली. त्याबद्दल मी रावसाहेब दानवेंचे आभार मानतो. मोदी लाट असताना आणि मोदींची जाहीर प्रचारसभा घेऊन जी व्यक्ती २५ हजारांपेक्षा जास्त मतांनी पराभूत होते. मतदारांमध्ये विश्वास निर्माण करू शकली नाही, ती व्यक्ती संघटना काय बांधणार ? भाजप पक्ष कसा काय उभा करणार. मात्र, असे असतानाही जठार जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर कुडाळमध्ये त्यांना कळून चुकले आहे की, आपली कुवत काय आहे? जठार यांची वयाची पन्नाशी झाली तरी अजून त्यांची बौद्धीक प्रगती झाली नसल्याचा आरोप राणेंनी केला.जनतेशी बांधील असल्याने प्रश्न विचारणारपोलिस अधीक्षकांचे स्वागतजिल्हा पोलिस अधीक्षकांचे मी स्वागत करतो. त्यांच्या बदलीची अगर कारवाईची मागणी काँग्रेसने कधीच केली नव्हती. याउलट ज्यांनी केली होती ते आता उलटे पडले आहेत. आपण डंपर राड्याबाबतचा प्रश्न विधानसभेत मांडल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पोलिस अधीक्षकांना सक्तीच्या रजेवर पाठविले.