शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
2
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
3
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
4
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!
5
'शोले'तल्या भूमिकेसाठी या मराठमोळ्या अभिनेत्याला पैशांऐवजी देण्यात आलेला फ्रिज, वाचा हा किस्सा
6
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
7
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नव्हते म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
8
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
9
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला
10
Barvi Dam: ठाणेकरांची चिंता मिटली! बारवी धरण १०० टक्के भरले; सात दरवाजे उघडले
11
‘बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लॉन्च होताच कोलकात्यात वाद, बोलवावे लागले पोलीस, विवेक अग्निहोत्री म्हणाले...  
12
Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी चुकवू नका 'हा' उपाय!
13
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
14
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
15
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
16
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
17
गणेशोत्सव २०२५: यंदा श्रीगणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त कधी? पाहा, महत्त्व अन् काही मान्यता
18
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
19
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
20
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!

तपासणी नाके बंद कशासाठी?, समुद्र मार्गाने हल्ला झाला तर कोण जबाबदार? : राणेंचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 19:43 IST

गृहराज्यमंत्र्यांनी पर्यटकांना पोलीस त्रास देतात म्हणून तपासणी नाकी बंद केली म्हणणे दुर्दैवी बाब आहे. ही पोलीस तपासणी नाकी पुन्हा सुरू करा, अशी जोरदार मागणी आमदार नितेश राणे यांनी केली. आपल्या जिल्ह्यातील समुद्राची तटबंदी आहे. त्यामुळे कधी काय होईल, हे सांगता येणार नाही. त्यामुळे यावर तातडीने निर्णय घ्या, असेही ते यावेळी म्हणाले.

ठळक मुद्देतपासणी नाके बंद कशासाठी?समुद्र मार्गाने हल्ला झाला तर कोण जबाबदार? : राणेंचा सवाल

सावंतवाडी : १९९३ च्या बॉम्बस्फोटाचे उदाहरण असतानाही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व पोलीस तपासणी नाकी बंद करणे म्हणजे पुन्हा एकदा मोठ्या हल्ल्यांना निमंत्रण देण्यासारखे आहे. त्यामुळे गृहराज्यमंत्र्यांनी पर्यटकांना पोलीस त्रास देतात म्हणून तपासणी नाकी बंद केली म्हणणे दुर्दैवी बाब आहे. ही पोलीस तपासणी नाकी पुन्हा सुरू करा, अशी जोरदार मागणी आमदार नितेश राणे यांनी केली. आपल्या जिल्ह्यातील समुद्राची तटबंदी आहे. त्यामुळे कधी काय होईल, हे सांगता येणार नाही. त्यामुळे यावर तातडीने निर्णय घ्या, असेही ते यावेळी म्हणाले.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तब्बल १५ तपासणी नाकी ही पोलीस अधीक्षकांनी एका रात्रीत बंद केली आहेत. त्यामुळे अनेक पोलीस थेट पोलीस ठाण्यात दाखल झाले. तसेच तपासणी नाकी बंद झाल्याने कोणाचा कोणाला धाक राहिला नाही.

आता कोणीही थेट जिल्ह्यात कधीही, कोठेही फिरू शकतो. सिंधुदुर्ग जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात समुद्र किनारा आहे. त्यामुळे समुद्रमार्गे कोणीही, कधीही आपल्या जिल्ह्यात प्रवेश करू शकतात. आपल्याकडे १९९३ च्या बॉम्बस्फोटाचे उदाहरण आहे. त्यानंतरच ही तपासणी नाकी अस्तित्वात आली आहेत. असे असतना अचानक तपासणी नाकी बंद करण्याचा प्रकार काय? असा सवाल आमदार राणे यांनी केला आहे.आमदार नितेश राणे यांनी यावरून गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांना चांगलेच धारेवर धरले आहे. जिल्ह्यात तपासणी नाकी बंद करून तुम्हाला मोठ्या घटनेला निमंत्रण द्यायचे आहे का? तपासणी नाकी बंद करण्यामागे पोलीस अधीक्षक सांगत आहेत की पोलीस कमी आहेत. तर पोलीस तपासणी नाक्यावरून जाणाऱ्या पर्यटकांना पोलीस त्रास देतात. म्हणून आम्ही नाकी बंद केल्याचे सांगतात.

कोणाचे खरे आणि कोणाचे खोटे समजायचे. दोघांच्या बोलण्यात मोठी विसंगती आहे, असा आरोप करत पुन्हा तपासणी नाकी सुरू करा, अशी मागणीही आमदार नितेश राणे यांनी केली. तसेच तपासणी नाकी बंद केल्यामुळे पोलिसांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

टॅग्स :Nitesh Raneनीतेश राणे sindhudurgसिंधुदुर्ग