शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्र्यांनी ५० कोटी आणले कोठून

By admin | Updated: January 13, 2016 21:33 IST

नीलेश राणे : सांगेलीतील काँगे्रस मेळाव्यात सरकारवर चौफेर टीका

 सावंतवाडी : भारतीय जवानांना पाकिस्तान गोळ्या घालत असताना पाकिस्तानला केक भरवणारे पंतप्रधान, सैन्यात दहशतवादी सापडल्यानंतर ते कोठून आले हे समजले नाही म्हणणारे संरक्षणमंत्री तर जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना बांगड्या भरण्याचा इशारा त्यांच्याच मित्रपक्षाने दिला आहे. यामुळे या सरकारचा विकास ठप्प झाला आहे. तसेच राज्य सरकारवर कर्ज असतानाही पालकमंत्र्यांनी ५० कोटी रुपये कोठून आणले, असा टोला माजी खासदार नीलेश राणे यांनी पालकमंत्र्यांना लगावला. सांगेली जिल्हा परिषद मतदारसंघ कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष सतीश सावंत, डॉ. जयेंद्र परुळेकर, काँग्रेस तालुकाध्यक्ष संजू परब, संदीप कुडतरकर, जिल्हा सरचिटणीस मंदार नार्वेकर, पंचायत समिती सभापती प्रमोद सावंत, शहराध्यक्ष सुधीर आडिवरेकर, आनंद शिरवलकर, अंकुश जाधव, जिल्हा परिषद सदस्य पंढरीनाथ राऊळ, प्रमोद कामत, गुरुनाथ पेडणेकर, रवी मडगावकर, प्रेमानंद देसाई, आत्माराम पालयेकर, गजानन गावडे, अभय किनळोसकर, सत्यवान बांदेकर, दिलीप भालेकर, जॅकी डिसोजा, गीता परब आदी उपस्थित होते. यावेळी नीलेश राणे म्हणाले, ग्राम व वित्त विकास ही दोन्ही पदे जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांकडे असताना ४० टक्के निधी विदर्भाकडे जात आहे. मार्चमध्ये मंजूर झालेला निधी अद्यापही खर्च होत नाही. या मार्चमध्ये हा निधी पुन्हा परत जाण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात घरपट्टी वाढविली आहे. राज्य सरकारवर ३ लाख कोटींचे कर्ज असतानाही पालकमंत्र्यांनी ५० कोटी कुठून आणले, असा टोला राणे यांनी लगावला. रेल्वेमंत्र्यांनाही रेल्वेची कामे पूर्ण करता येत नसल्याने रेल्वे बजेटमधील बारा हजार कोटी कमी झाले आहेत. मंत्र्यांना मंजूर झालेली कामेही करून घेता येत नाहीत, हे दुर्दैव आहे. संरक्षणमंत्री म्हणताहेत, दहशतवादी आत कसे घुसले ते कळलेच नाही. मग घुसले तेव्हा काय केले? पंतप्रधान याच दहशतवाद्यांना संरक्षण देण्याचे काम करत आहेत. शेतकऱ्यांना संरक्षण देण्यापेक्षा दहशतवाद्यांना संरक्षण देणे पंतप्रधानांना जास्त गरजेचे वाटत आहे, असेही राणे यांनी सांगितले. सावंतवाडी नगरपरिषदेत पालकमंत्री दीपक केसरकर कुणाचे, नगराध्यक्ष कुणाचे, नगरसेवक कुणाचे हेच कळत नाही. येत्या निवडणुकीत सावंतवाडी नगरपरिषदेवर काँगे्रसचीच सत्ता बसेल, असा विश्वासही राणे यांनी व्यक्त केला. या मेळाव्याला जिल्हा परिषद मतदारसंघातील सर्व कार्यकर्ते उपस्थित होते. (वार्ताहर) ठेकेदारांवर आत्महत्येची वेळ : सतीश सावंत यावेळी सतीश सावंत म्हणाले, पंतप्रधान सडक योजना राबवून ठेकेदारांवर आत्महत्येची वेळ खासदारांनी आणली आहे. केंद्र सरकारचा त्यांना अभ्यास नसल्यामुळे कुठल्याच योजना प्रभावीपणे राबविता येत नाहीत. यामुळे महिलांसाठी जिल्हा बँकेमार्फत विविध योजना राबवू, असे सावंत म्हणाले. सत्तेसाठीच दीपक केसरकर यांनी पक्ष बदलले आहेत. मंत्रिमंडळातही त्यांना कोण विचारत नाही. तर जिल्ह्यात मित्रपक्षच पालकमंत्र्यांना बांगड्या भरायला सांगतात. ही बाब दुर्दैवी आहे, असे डॉ. परूळेकर यांनी सांगितले. तालुकाध्यक्षपदाची अधिकृत जबाबदारी मिळाल्यानंतर सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी अनेक आंदोलने सुरू केली. यामध्ये डेगवे येथील भातखरेदी आंदोलन, विद्युत प्रवाह सुरळीत करण्यासाठी, आरोंदा जेटी, आयटीआय याठिकाणी जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी आंदोलने केली. यापुढेही तालुक्यातील जनतेच्या विकासासाठी प्रयत्नशील राहू व जिल्हा परिषद, पंचायत समिती व येत्या नगरपरिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसचेच वर्चस्व राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. - संजू परब