शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

पालकमंत्र्यांनी ५० कोटी आणले कोठून

By admin | Updated: January 13, 2016 21:33 IST

नीलेश राणे : सांगेलीतील काँगे्रस मेळाव्यात सरकारवर चौफेर टीका

 सावंतवाडी : भारतीय जवानांना पाकिस्तान गोळ्या घालत असताना पाकिस्तानला केक भरवणारे पंतप्रधान, सैन्यात दहशतवादी सापडल्यानंतर ते कोठून आले हे समजले नाही म्हणणारे संरक्षणमंत्री तर जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना बांगड्या भरण्याचा इशारा त्यांच्याच मित्रपक्षाने दिला आहे. यामुळे या सरकारचा विकास ठप्प झाला आहे. तसेच राज्य सरकारवर कर्ज असतानाही पालकमंत्र्यांनी ५० कोटी रुपये कोठून आणले, असा टोला माजी खासदार नीलेश राणे यांनी पालकमंत्र्यांना लगावला. सांगेली जिल्हा परिषद मतदारसंघ कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष सतीश सावंत, डॉ. जयेंद्र परुळेकर, काँग्रेस तालुकाध्यक्ष संजू परब, संदीप कुडतरकर, जिल्हा सरचिटणीस मंदार नार्वेकर, पंचायत समिती सभापती प्रमोद सावंत, शहराध्यक्ष सुधीर आडिवरेकर, आनंद शिरवलकर, अंकुश जाधव, जिल्हा परिषद सदस्य पंढरीनाथ राऊळ, प्रमोद कामत, गुरुनाथ पेडणेकर, रवी मडगावकर, प्रेमानंद देसाई, आत्माराम पालयेकर, गजानन गावडे, अभय किनळोसकर, सत्यवान बांदेकर, दिलीप भालेकर, जॅकी डिसोजा, गीता परब आदी उपस्थित होते. यावेळी नीलेश राणे म्हणाले, ग्राम व वित्त विकास ही दोन्ही पदे जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांकडे असताना ४० टक्के निधी विदर्भाकडे जात आहे. मार्चमध्ये मंजूर झालेला निधी अद्यापही खर्च होत नाही. या मार्चमध्ये हा निधी पुन्हा परत जाण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात घरपट्टी वाढविली आहे. राज्य सरकारवर ३ लाख कोटींचे कर्ज असतानाही पालकमंत्र्यांनी ५० कोटी कुठून आणले, असा टोला राणे यांनी लगावला. रेल्वेमंत्र्यांनाही रेल्वेची कामे पूर्ण करता येत नसल्याने रेल्वे बजेटमधील बारा हजार कोटी कमी झाले आहेत. मंत्र्यांना मंजूर झालेली कामेही करून घेता येत नाहीत, हे दुर्दैव आहे. संरक्षणमंत्री म्हणताहेत, दहशतवादी आत कसे घुसले ते कळलेच नाही. मग घुसले तेव्हा काय केले? पंतप्रधान याच दहशतवाद्यांना संरक्षण देण्याचे काम करत आहेत. शेतकऱ्यांना संरक्षण देण्यापेक्षा दहशतवाद्यांना संरक्षण देणे पंतप्रधानांना जास्त गरजेचे वाटत आहे, असेही राणे यांनी सांगितले. सावंतवाडी नगरपरिषदेत पालकमंत्री दीपक केसरकर कुणाचे, नगराध्यक्ष कुणाचे, नगरसेवक कुणाचे हेच कळत नाही. येत्या निवडणुकीत सावंतवाडी नगरपरिषदेवर काँगे्रसचीच सत्ता बसेल, असा विश्वासही राणे यांनी व्यक्त केला. या मेळाव्याला जिल्हा परिषद मतदारसंघातील सर्व कार्यकर्ते उपस्थित होते. (वार्ताहर) ठेकेदारांवर आत्महत्येची वेळ : सतीश सावंत यावेळी सतीश सावंत म्हणाले, पंतप्रधान सडक योजना राबवून ठेकेदारांवर आत्महत्येची वेळ खासदारांनी आणली आहे. केंद्र सरकारचा त्यांना अभ्यास नसल्यामुळे कुठल्याच योजना प्रभावीपणे राबविता येत नाहीत. यामुळे महिलांसाठी जिल्हा बँकेमार्फत विविध योजना राबवू, असे सावंत म्हणाले. सत्तेसाठीच दीपक केसरकर यांनी पक्ष बदलले आहेत. मंत्रिमंडळातही त्यांना कोण विचारत नाही. तर जिल्ह्यात मित्रपक्षच पालकमंत्र्यांना बांगड्या भरायला सांगतात. ही बाब दुर्दैवी आहे, असे डॉ. परूळेकर यांनी सांगितले. तालुकाध्यक्षपदाची अधिकृत जबाबदारी मिळाल्यानंतर सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी अनेक आंदोलने सुरू केली. यामध्ये डेगवे येथील भातखरेदी आंदोलन, विद्युत प्रवाह सुरळीत करण्यासाठी, आरोंदा जेटी, आयटीआय याठिकाणी जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी आंदोलने केली. यापुढेही तालुक्यातील जनतेच्या विकासासाठी प्रयत्नशील राहू व जिल्हा परिषद, पंचायत समिती व येत्या नगरपरिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसचेच वर्चस्व राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. - संजू परब