शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

प्रत्येक महिन्याला येणारे बांधकाममंत्री आहेत कुठे? :परशुराम उपरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 15:07 IST

प्रत्येक महिन्याला सिंधुदुर्गात येऊन महामार्गाची पाहणी करणार असे आश्वासन देणारे सार्वजनिक बांधकामंत्री चंद्रकांत पाटील आता आहेत कुठे? असा प्रश्न उपस्थित करतानाच खड्डेमय महामार्गामुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे. तर कित्येक जखमी झाले आहेत. मात्र, त्यांना भेटण्यासाठी बांधकाममंत्र्यांकडे सवड नाही. पण ज्यांनी इथल्या सर्वसामान्य जनतेला खड्ड्यांत घातले अशा अधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी बांधकाममंत्र्यांकडे वेळच वेळ आहे, अशी टीका मनसेचे प्रदेश सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी केली आहे.

ठळक मुद्देप्रत्येक महिन्याला येणारे बांधकाममंत्री आहेत कुठे? :परशुराम उपरकर पालकमंत्र्यांनाही खड्डे दिसत नाहीत का ?

कणकवली : प्रत्येक महिन्याला सिंधुदुर्गात येऊन महामार्गाची पाहणी करणार असे आश्वासन देणारे सार्वजनिक बांधकामंत्री चंद्रकांत पाटील आता आहेत कुठे? असा प्रश्न उपस्थित करतानाच खड्डेमय महामार्गामुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे. तर कित्येक जखमी झाले आहेत. मात्र, त्यांना भेटण्यासाठी बांधकाममंत्र्यांकडे सवड नाही. पण ज्यांनी इथल्या सर्वसामान्य जनतेला खड्ड्यांत घातले अशा अधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी बांधकाममंत्र्यांकडे वेळच वेळ आहे, अशी टीका मनसेचे प्रदेश सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी केली आहे.येथील मनसे संपर्क कार्यालयात ते बोलत होते. परशुराम उपरकर पुढे म्हणाले, राज्य सरकार सर्वसामान्यांच्या बाजूने असायला हवे. पण हे सरकार ठेकेदार आणि अधिकाऱ्यांचीच तळी उचलून धरत आहे. कणकवली शहरातील महामार्ग खड्ड्यांच्याप्रश्नी मनसेसह सर्वच पक्षांनी आंदोलने केली. राजकीय पक्ष बाजूला ठेवून कणकवली तालुक्यातील सर्वसामान्य जनता रस्त्यावर उतरली. परंतु याकडे बांधकाममंत्र्यांनी दुर्लक्ष केले आहे. तर मुजोर महामार्ग अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी मात्र तत्परता दाखविली जात आहे. याला काय म्हणावे?"कार्यकर्त्यांना त्रास देण्यापेक्षा खड्डेमुक्तीसाठी वेळ द्याचिखलफेक आंदोलनामधील आमदार नीतेश राणे आणि स्वाभिमानचे कार्यकर्ते यांची छळवणूक करण्यासाठी पालकमंत्री दीपक केसरकर वेगवेगळे फंडे वापरत आहेत. गृहराज्यमंत्री पदाचा अवाजवी वापर करीत आहेत. हाच वेळ त्यांनी महामार्ग दुरुस्ती कामासाठी दिला असता तर जनतेचा त्रास कमी झाला असता असे परशुराम उपरकर यावेळी म्हणाले.किती अधिकारी, ठेकेदार ब्लॅकलिस्टमध्ये गेले?बैठकांना गैरहजर राहणारे अधिकारी तसेच निकृष्ट कामे करणाऱ्या ठेकेदारांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकणार असे गेली साडे चार वर्षे पालकमंत्री सांगत आहेत. त्यानंतर महामार्गासह प्रमुख जिल्हा मार्गाची दुरवस्था झाली. तर महसूलसह सर्वच खात्यात भ्रष्टाचार वाढला. त्यामुळे आजपर्यंत पालकमंत्र्यांनी किती अधिकारी आणि ठेकेदारांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकले ते जाहीर करावे अशी मागणी उपरकर यांनी यावेळी केली.

टॅग्स :Parshuram Upkarपरशुराम उपरकर sindhudurgसिंधुदुर्ग