शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

प्रत्येक महिन्याला येणारे बांधकाममंत्री आहेत कुठे? :परशुराम उपरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 15:07 IST

प्रत्येक महिन्याला सिंधुदुर्गात येऊन महामार्गाची पाहणी करणार असे आश्वासन देणारे सार्वजनिक बांधकामंत्री चंद्रकांत पाटील आता आहेत कुठे? असा प्रश्न उपस्थित करतानाच खड्डेमय महामार्गामुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे. तर कित्येक जखमी झाले आहेत. मात्र, त्यांना भेटण्यासाठी बांधकाममंत्र्यांकडे सवड नाही. पण ज्यांनी इथल्या सर्वसामान्य जनतेला खड्ड्यांत घातले अशा अधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी बांधकाममंत्र्यांकडे वेळच वेळ आहे, अशी टीका मनसेचे प्रदेश सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी केली आहे.

ठळक मुद्देप्रत्येक महिन्याला येणारे बांधकाममंत्री आहेत कुठे? :परशुराम उपरकर पालकमंत्र्यांनाही खड्डे दिसत नाहीत का ?

कणकवली : प्रत्येक महिन्याला सिंधुदुर्गात येऊन महामार्गाची पाहणी करणार असे आश्वासन देणारे सार्वजनिक बांधकामंत्री चंद्रकांत पाटील आता आहेत कुठे? असा प्रश्न उपस्थित करतानाच खड्डेमय महामार्गामुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे. तर कित्येक जखमी झाले आहेत. मात्र, त्यांना भेटण्यासाठी बांधकाममंत्र्यांकडे सवड नाही. पण ज्यांनी इथल्या सर्वसामान्य जनतेला खड्ड्यांत घातले अशा अधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी बांधकाममंत्र्यांकडे वेळच वेळ आहे, अशी टीका मनसेचे प्रदेश सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी केली आहे.येथील मनसे संपर्क कार्यालयात ते बोलत होते. परशुराम उपरकर पुढे म्हणाले, राज्य सरकार सर्वसामान्यांच्या बाजूने असायला हवे. पण हे सरकार ठेकेदार आणि अधिकाऱ्यांचीच तळी उचलून धरत आहे. कणकवली शहरातील महामार्ग खड्ड्यांच्याप्रश्नी मनसेसह सर्वच पक्षांनी आंदोलने केली. राजकीय पक्ष बाजूला ठेवून कणकवली तालुक्यातील सर्वसामान्य जनता रस्त्यावर उतरली. परंतु याकडे बांधकाममंत्र्यांनी दुर्लक्ष केले आहे. तर मुजोर महामार्ग अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी मात्र तत्परता दाखविली जात आहे. याला काय म्हणावे?"कार्यकर्त्यांना त्रास देण्यापेक्षा खड्डेमुक्तीसाठी वेळ द्याचिखलफेक आंदोलनामधील आमदार नीतेश राणे आणि स्वाभिमानचे कार्यकर्ते यांची छळवणूक करण्यासाठी पालकमंत्री दीपक केसरकर वेगवेगळे फंडे वापरत आहेत. गृहराज्यमंत्री पदाचा अवाजवी वापर करीत आहेत. हाच वेळ त्यांनी महामार्ग दुरुस्ती कामासाठी दिला असता तर जनतेचा त्रास कमी झाला असता असे परशुराम उपरकर यावेळी म्हणाले.किती अधिकारी, ठेकेदार ब्लॅकलिस्टमध्ये गेले?बैठकांना गैरहजर राहणारे अधिकारी तसेच निकृष्ट कामे करणाऱ्या ठेकेदारांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकणार असे गेली साडे चार वर्षे पालकमंत्री सांगत आहेत. त्यानंतर महामार्गासह प्रमुख जिल्हा मार्गाची दुरवस्था झाली. तर महसूलसह सर्वच खात्यात भ्रष्टाचार वाढला. त्यामुळे आजपर्यंत पालकमंत्र्यांनी किती अधिकारी आणि ठेकेदारांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकले ते जाहीर करावे अशी मागणी उपरकर यांनी यावेळी केली.

टॅग्स :Parshuram Upkarपरशुराम उपरकर sindhudurgसिंधुदुर्ग