शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

एसटीच्या सिंधुदुर्ग विभागाला नवीन बसेस कधी मिळणार?, प्रवाशांची गैरसोय

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2024 13:50 IST

सध्या फक्त ३५२ बस उपलब्ध : फेऱ्यांवर परिणाम; किमान ९८ बसची आवश्यकता 

कणकवली : राज्य परिवहन महामंडळाच्या सिंधुदुर्ग विभागातून सन २०१९-२०च्या सुमारास दररोज २१००च्या जवळपास फेऱ्या सुटायच्या. आता त्यांची संख्या १८००वर आली आहे. मात्र, त्यावेळी सिंधुदुर्ग विभागाकडे उपलब्ध बसेसची संख्या ४५०हून अधिक होती, ती आता ३५२वर आली आहे. अशा स्थितीत सध्या सुरू असलेल्या फेऱ्याही टिकवून ठेवण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. अजून किमान ९८ बसची आवश्यकता असून, सिंधुदुर्ग विभागाला या नवीन बसेस कधी मिळणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

एसटीच्या सिंधुदुर्ग विभागाला सन २०१९-२० पासून फक्त नवीन दहा बसेस मिळाल्या आहेत. त्यावेळी या विभागात कार्यरत बसेसची संख्या ४५०हून अधिक होती. मात्र, टप्प्याटप्प्यात या बसेसचे आयुष्यमान संपत गेले. शासनाकडून नवीन बसेस न आल्याने आयुष्यमान संपलेल्या बसेस भंगारात काढण्यात आल्या आहेत. त्यामुळे बसेसची संख्या घटत गेली. या समस्येकडे शासन तसेच लोकप्रतिनिधी लक्ष देतील का, असा प्रश्न प्रवाशांकडून विचारला जात आहे.एसटीचा सिंधुदुर्ग विभाग आजही पूर्ण क्षमतेने चालवायचा असेल, तर किमान ४५० सुस्थितीतील बसेसची गरज आहे. परंतु, या विभागाकडे ३५२ बसेस चालू स्थितीत आहेत. पाच वर्षांपूर्वी या विभागाकडून प्रत्येक दिवशी साधारणतः २१००च्या जवळपास बसफेऱ्या सुटत होत्या. त्यातच सुमारे ८० हून अधिक बसेस या कालावधीत भंगारात गेल्या, त्यामुळे या फेऱ्या पुढे कशा सुरू ठेवणार, हा प्रश्न निर्माण झाला आहे.वर्षभरापूर्वी राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात इलेक्ट्रिक बसेस येणार असल्याचे परिवहन मंत्र्यांकडून जाहीर करण्यात आले होते. सिंधुदुर्गमध्ये चार आगारांमध्ये या बसेससाठी चार्जिंग स्टेशनही तयार करण्यात येत आहेत. मात्र, अद्याप या इलेक्ट्रिक बसेस उपलब्ध झालेल्या नाहीत.सिंधुदुर्ग विभागाला पुढील महिनाभरात काही बसेस मिळतील, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येते. पण मार्च २०२५ पर्यंतचा विचार केला, तर सध्या कार्यरत असलेल्या बसपैकी अजून सुमारे ४० ते ५० बसेस १५ वर्षे पूर्ण झाल्याने भंगारात काढाव्या लागणार आहेत. तोपर्यंत आवश्यक बसेस न आल्यास या विभागातील १८०० फेऱ्यांमध्येही घट होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग