शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
2
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
3
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
4
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
5
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
6
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
7
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
8
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
9
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
10
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
11
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
12
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
13
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
14
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
15
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
16
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
17
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
18
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर
19
बिहारमध्ये कुणाचं सरकार, भाजपाला किती जागा मिळणार?; समोर आला ताजा सर्व्हे, वाचा
20
Viral Video: ट्रेनमधून प्रवास करताना कधीच 'अशी' चूक करू नका; जीवघेणी घटना कॅमेऱ्यात कैद!

दहशत, अपप्रवृत्ती विरोधात आवाज उठवणार - संदेश पारकर 

By सुधीर राणे | Updated: September 8, 2023 19:23 IST

कणकवली : माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे , युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी माझ्यावर ...

कणकवली : माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी माझ्यावर दिलेली आहे. या जबाबदारीच्या माध्यमातून सर्व पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन कणकवली, देवगड, वैभववाडी आणि मालवण या चारही तालुक्यांमध्ये संघटनात्मक बांधणी करण्यात येईल. आम्ही दहशत,अपप्रवृत्ती विरोधात आवाज उठवणार आहोत.कणकवली विधानसभेसाठी उमेदवार कोण ? यापेक्षा शिवसेना संघटना बांधणी हे महत्वाचे असल्याचे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे नूतन जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी सांगितले.शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचा गावभेट कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रत्येक गावातील शिवसैनिकांना ताकद देणार आहे. ज्या मालवण मध्ये राणेंचा पराभव वैभव नाईक यांनी केला. त्याचप्रमाणे कणकवली विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचा भगवा फडकेल, अशी संघटना बांधणी केली जाईल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.कणकवली येथील विजय भवन  येथे शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, महिला आघाडी अध्यक्षा निलम पालव -सावंत, तालुकाप्रमुख शैलेश भोगले, देवगड तालुकाप्रमुख मिलिंद साटम, शहरप्रमुख प्रमोद मसुरकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.ते म्हणाले, धनशक्तीच्या जोरावर फोडाफोडीचे राजकारण करून स्थानिक सत्ता व कार्यकर्ते फोडण्याचे काम भाजपकडून केले जात आहे. त्या विरोधात जनतेच्या मनात तीव्र संतापाची लाट आहे. त्यामुळे शिवसेना संघटना बांधणी करत राणे भाजपचा पराभव कणकवलीत घडवणार आहोत. एक वर्ष हे निवडणुकीचे आहे. पुढच्या वर्षभरात परिवर्तन घडेल.खासदार विनायक राऊत जेव्हा पहिल्यांदा खासदारकीसाठी उभे राहिले तेव्हा नवखे होते,मात्र तेव्हाच्या मूठभर शिवसैनिकांच्या जीवावर ते लढले. दोनदा निलेश राणेचा पराभव त्यांनी केला. कुडाळ -मालवण विधानसभा निवडणुकीत राणेंचा पराभव वैभव नाईक यांनी केला. जिल्ह्यातील जनतेला हा दहशत वाद मान्य नाही. त्यामुळे या अप प्रवृत्तीच्या विरोधात शिवसेना लढणार आहे. जिल्ह्यातील आरोग्याचा प्रश्न असेल,प्रशासकीय व्यवस्था व अन्य सर्व समस्यांबाबत शिवसेना यापुढे आक्रमकपणे लढा देईल असेही पारकर यांनी सांगितले.आता तर हा पक्षासाठी संघर्षाचा काळ आहे. भाजपा विरोधात जनतेच्या मनात फार चीड आहे, संतापाची लाट आहे.त्यामुळे उद्धव ठाकरे पुन्हा राज्याचे नेतृत्व करतील. त्यासाठी संघटनेत, आवश्यक बदल करावे लागतील. जुन्या नव्याने एकत्र करुन चांगली संघटना बांधणी केली जाईल. पक्षाला न्याय देणाऱ्या कार्यकर्त्याला संधी दिली जाईल. असे पारकर म्हणाले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरे