शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
3
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
4
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
5
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
6
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
7
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
8
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
9
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
10
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
11
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
12
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
13
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
14
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
15
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
16
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
17
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
18
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
19
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
20
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
Daily Top 2Weekly Top 5

दहशत, अपप्रवृत्ती विरोधात आवाज उठवणार - संदेश पारकर 

By सुधीर राणे | Updated: September 8, 2023 19:23 IST

कणकवली : माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे , युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी माझ्यावर ...

कणकवली : माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी माझ्यावर दिलेली आहे. या जबाबदारीच्या माध्यमातून सर्व पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन कणकवली, देवगड, वैभववाडी आणि मालवण या चारही तालुक्यांमध्ये संघटनात्मक बांधणी करण्यात येईल. आम्ही दहशत,अपप्रवृत्ती विरोधात आवाज उठवणार आहोत.कणकवली विधानसभेसाठी उमेदवार कोण ? यापेक्षा शिवसेना संघटना बांधणी हे महत्वाचे असल्याचे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे नूतन जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी सांगितले.शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचा गावभेट कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रत्येक गावातील शिवसैनिकांना ताकद देणार आहे. ज्या मालवण मध्ये राणेंचा पराभव वैभव नाईक यांनी केला. त्याचप्रमाणे कणकवली विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचा भगवा फडकेल, अशी संघटना बांधणी केली जाईल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.कणकवली येथील विजय भवन  येथे शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, महिला आघाडी अध्यक्षा निलम पालव -सावंत, तालुकाप्रमुख शैलेश भोगले, देवगड तालुकाप्रमुख मिलिंद साटम, शहरप्रमुख प्रमोद मसुरकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.ते म्हणाले, धनशक्तीच्या जोरावर फोडाफोडीचे राजकारण करून स्थानिक सत्ता व कार्यकर्ते फोडण्याचे काम भाजपकडून केले जात आहे. त्या विरोधात जनतेच्या मनात तीव्र संतापाची लाट आहे. त्यामुळे शिवसेना संघटना बांधणी करत राणे भाजपचा पराभव कणकवलीत घडवणार आहोत. एक वर्ष हे निवडणुकीचे आहे. पुढच्या वर्षभरात परिवर्तन घडेल.खासदार विनायक राऊत जेव्हा पहिल्यांदा खासदारकीसाठी उभे राहिले तेव्हा नवखे होते,मात्र तेव्हाच्या मूठभर शिवसैनिकांच्या जीवावर ते लढले. दोनदा निलेश राणेचा पराभव त्यांनी केला. कुडाळ -मालवण विधानसभा निवडणुकीत राणेंचा पराभव वैभव नाईक यांनी केला. जिल्ह्यातील जनतेला हा दहशत वाद मान्य नाही. त्यामुळे या अप प्रवृत्तीच्या विरोधात शिवसेना लढणार आहे. जिल्ह्यातील आरोग्याचा प्रश्न असेल,प्रशासकीय व्यवस्था व अन्य सर्व समस्यांबाबत शिवसेना यापुढे आक्रमकपणे लढा देईल असेही पारकर यांनी सांगितले.आता तर हा पक्षासाठी संघर्षाचा काळ आहे. भाजपा विरोधात जनतेच्या मनात फार चीड आहे, संतापाची लाट आहे.त्यामुळे उद्धव ठाकरे पुन्हा राज्याचे नेतृत्व करतील. त्यासाठी संघटनेत, आवश्यक बदल करावे लागतील. जुन्या नव्याने एकत्र करुन चांगली संघटना बांधणी केली जाईल. पक्षाला न्याय देणाऱ्या कार्यकर्त्याला संधी दिली जाईल. असे पारकर म्हणाले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरे