शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

दहशत, अपप्रवृत्ती विरोधात आवाज उठवणार - संदेश पारकर 

By सुधीर राणे | Updated: September 8, 2023 19:23 IST

कणकवली : माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे , युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी माझ्यावर ...

कणकवली : माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी माझ्यावर दिलेली आहे. या जबाबदारीच्या माध्यमातून सर्व पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन कणकवली, देवगड, वैभववाडी आणि मालवण या चारही तालुक्यांमध्ये संघटनात्मक बांधणी करण्यात येईल. आम्ही दहशत,अपप्रवृत्ती विरोधात आवाज उठवणार आहोत.कणकवली विधानसभेसाठी उमेदवार कोण ? यापेक्षा शिवसेना संघटना बांधणी हे महत्वाचे असल्याचे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे नूतन जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी सांगितले.शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचा गावभेट कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रत्येक गावातील शिवसैनिकांना ताकद देणार आहे. ज्या मालवण मध्ये राणेंचा पराभव वैभव नाईक यांनी केला. त्याचप्रमाणे कणकवली विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचा भगवा फडकेल, अशी संघटना बांधणी केली जाईल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.कणकवली येथील विजय भवन  येथे शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, महिला आघाडी अध्यक्षा निलम पालव -सावंत, तालुकाप्रमुख शैलेश भोगले, देवगड तालुकाप्रमुख मिलिंद साटम, शहरप्रमुख प्रमोद मसुरकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.ते म्हणाले, धनशक्तीच्या जोरावर फोडाफोडीचे राजकारण करून स्थानिक सत्ता व कार्यकर्ते फोडण्याचे काम भाजपकडून केले जात आहे. त्या विरोधात जनतेच्या मनात तीव्र संतापाची लाट आहे. त्यामुळे शिवसेना संघटना बांधणी करत राणे भाजपचा पराभव कणकवलीत घडवणार आहोत. एक वर्ष हे निवडणुकीचे आहे. पुढच्या वर्षभरात परिवर्तन घडेल.खासदार विनायक राऊत जेव्हा पहिल्यांदा खासदारकीसाठी उभे राहिले तेव्हा नवखे होते,मात्र तेव्हाच्या मूठभर शिवसैनिकांच्या जीवावर ते लढले. दोनदा निलेश राणेचा पराभव त्यांनी केला. कुडाळ -मालवण विधानसभा निवडणुकीत राणेंचा पराभव वैभव नाईक यांनी केला. जिल्ह्यातील जनतेला हा दहशत वाद मान्य नाही. त्यामुळे या अप प्रवृत्तीच्या विरोधात शिवसेना लढणार आहे. जिल्ह्यातील आरोग्याचा प्रश्न असेल,प्रशासकीय व्यवस्था व अन्य सर्व समस्यांबाबत शिवसेना यापुढे आक्रमकपणे लढा देईल असेही पारकर यांनी सांगितले.आता तर हा पक्षासाठी संघर्षाचा काळ आहे. भाजपा विरोधात जनतेच्या मनात फार चीड आहे, संतापाची लाट आहे.त्यामुळे उद्धव ठाकरे पुन्हा राज्याचे नेतृत्व करतील. त्यासाठी संघटनेत, आवश्यक बदल करावे लागतील. जुन्या नव्याने एकत्र करुन चांगली संघटना बांधणी केली जाईल. पक्षाला न्याय देणाऱ्या कार्यकर्त्याला संधी दिली जाईल. असे पारकर म्हणाले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरे