शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
IPL 2026 Player Trade Updates : जड्डू घाट्यात! संजू ना नफा ना तोटा तत्वावर CSK च्या ताफ्यात
3
जप्त केलेली ३५० किलो स्फोटके कशी फुटली? स्टेशन बाहेरच्या 'त्या' कारवर संशय, अवयव ३०० फूटांवर फेकले गेले
4
"मी कट्टर BJP आहे, त्यामुळे..."; निवेदिता सराफ यांचं वक्तव्य चर्चेत; बिहार निवडणुकीबद्दल काय म्हणाल्या?
5
SIM Swap Fraud: तुमचा मोबाईल नंबर, त्यांचा कंट्रोल; OTP फ्रॉडनं वाढलीये डोकेदुखी, कसं वाचाल?
6
ऐन निवडणुकीत अश्लील व्हिडिओ व्हायरल, मात्र जनतेने दिली साथ; भाजपा उमेदवार किती मतांनी जिंकले?
7
“बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोग अन् मतचोरी, SIR मुळे NDAचा विजय”: हर्षवर्धन सपकाळ
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १७ नोव्हेंबर २०२५ रोजी खुला होणार, १२.६२% पर्यंत परताव्याचा दावा
9
अहिल्यानगर, तुळजापूरमध्ये शिवसेनेची ताकद वाढली; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत मोठे पक्षप्रवेश
10
वाईट घडलं! नवले पूल अपघातात ३० वर्षीय मराठी अभिनेत्याचा दुर्देवी मृत्यू, ३ महिन्याचा मुलगा पोरका
11
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
12
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
13
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
14
लग्नाच्या वाढदिवशीच घरी लक्ष्मी आली! राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा
15
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
16
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
17
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
18
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
19
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
20
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रानं सुरक्षा पुरवल्यास महाराष्ट्रात येऊ : दीपक केसरकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2022 22:39 IST

राज्यातील कायदा सुव्यवस्थेबाबत उपस्थित केले प्रश्नचिन्ह

सावंतवाडी : आम्ही महाराष्ट्रात यायला केव्हाही तयार आहोत. पण विधानसभा उपाध्यक्ष यांनी तशी परवानगी दिली पाहिजे. सध्या महाराष्ट्रात कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्न उपस्थित राहिला असून आमच्या सुरक्षेची हमी कोण घेणार असा सवाल करत शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार दीपक केसरकर यांनी महाराष्ट्राच्या कायदाच व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. महाराष्ट्र येण्यासाठी केंद्राने आम्हाला सुरक्षा दिल्यास ती आम्ही स्वीकारू असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच मागच्या काळात जर माझे मंत्रीपद राऊतांमुळे गेले असेल तर आनंदच आहे असा टोला ही त्यांनी यावेळी हाणला. आमदार दीपक केसरकर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकारांशी ऑनलाईन संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध प्रश्नांवर सडेतोड उत्तरे दिली.

केसरकर म्हणाले, पहिल्यापासून आमची भूमिका ही महाविकास आघाडी न करता भाजप बरोबर जाण्याची होती. शिवसेनेच्या नेतृत्वाची भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाशी चर्चाही घडवून आणण्याचा प्रयत्न मी केला. पण त्यात यश आले नाही. राज्यातील काही मतदारसंघात शिवसेनेचे आमदार राष्ट्रवादी व काँग्रेसच्या उमेदवारांना पराभूत करून निवडून आले. मात्र अडीच वर्षाच्या सत्तेच्या काळात त्यांना अधिकचा निधी दिला गेला आणि निवडून आलेल्या आमदाराला तसेच ताटकळत ठेवण्यात आले. हे आम्ही कसे काय खपवून घेऊ? शिवसेनेच्या कार्यक्रमांना खासदार आमदारांना निमंत्रण दिले जात नव्हते. हे योग्य नाही त्यांचा कुठे तरी राग आपल्या मनात ठेवून या सर्व आमदारांनी बंड केले आहे.

देशातील हे सर्वात मोठे बंड असून आता माघार नाही. पुढे काय होईल ते आमचे नेते एकनाथ शिंदेच ठरवतील, अशी स्पष्ट भूमिका केसरकर यांनी मांडली. आम्ही महाराष्ट्रात केव्हा यायला तयार आहोत पण येथील कायदा-सुव्यवस्था ही योग्य नाही. आमदार म्हणून आमचे संरक्षण होणार नसेल तर कसे यायचे?, असा सवाल करत विधानसभा अध्यक्ष जेव्हा बोलवतील तेव्हा आम्ही येऊ असे त्यांनी सांगितले.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात आपणास मंत्रिपद मिळाले नाही. ते खासदार विनायक राऊत यांच्यामुळे असे मी मानत नाही. मला मंत्रीपद देऊ नये यासाठी राऊत यांनी प्रयत्न केला असेल तरी मला आनंदच आहे. पण अशी काही माणसे चुकीची माहिती पक्षप्रमुखांना देतात आणि त्यातून खरे काम करणारे कार्यकर्ते मागे राहतात. मातोश्री वर काही बडवे आहेत त्यातील एक विनायक राऊत का? असा उलटा सवाल केसरकर यांनी पत्रकारांना केला.

मी आज ही शिवसैनिकमी आज ही शिवसैनिक असून माझे नेते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हेच आहेत. पण काही माणसे आग पेटवतात पण मी विझवणारा असून कोकणात अनेक आंदोलने झाली दहशतवाद मोडून काढला. प्रेमाने जग जिंकता येते हा संदेश आहे. तो महाराष्ट्राला देण्याची गरज असल्याचे मत ही केसरकर यांनी व्यक्त केले.

टॅग्स :Deepak Kesarkarदीपक केसरकर Shiv SenaशिवसेनाMaharashtraमहाराष्ट्र