शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांची भेट घेतली; 'तुतारी' सोडून भाजपला पाठिंबा देताच अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
2
मुंबईतील चुरशीच्या लढतीत आणखी एक ट्विस्ट; शेवटच्या दिवशी नवा उमेदवार मैदानात!
3
“३५ वर्षे राजकारणात, लढायचे अन् जिंकायचे एवढेच उद्दिष्ट”; रवींद्र वायकर स्पष्ट केली भूमिका
4
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
5
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
6
ठरलं! पुढच्या महिन्यात लॉन्च होणार Bajaj ची जगातील पहिली CNG बाईक, किंमत किती..?
7
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
8
Varuthini Ekadashi 2024: एकादशीच्या व्रताला फराळी पदार्थांचे सेवन करणे योग्य की अयोग्य? वाचा शास्त्र!
9
'बोस यांनी मला स्पर्श केला अन्...'; महिलेच्या आरोपांवर राज्यपाल म्हणाले,'गोळी चालवा पण...'
10
Smriti Irani : "काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा
11
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता
12
कोविशील्ड लसीचे नेमके किती दुष्परिणाम?; कोरोना काळातील 'सुपरमॅन'ने सांगितलं 'सत्य'
13
"टीएमसी बंगालचे नाव खराब करत आहे", नरेंद्र मोदींचा ममता सरकारवर हल्लाबोल
14
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
15
अमिताभ बच्चन यांची एक पोस्ट अन् भाजप-ठाकरे गटात रंगलं ट्विटर वॉर, नेमकं काय घडलं ?
16
Share Market : शेअर बाजारात हाहाकार; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; रिलायन्स आपटला
17
MRF Share Price: एमआरएफ देणार आतापर्यंतचा सर्वाधिक डिविडंड, मोठ्या विक्रीमुळे शेअर्स ४ टक्क्यांपर्यंत घसरले
18
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
19
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
20
Apple नं केला कमाईचा रकॉर्ड; एका दिवसात Mukesh Ambani यांच्या नेटवर्थपेक्षा अधिक वाढलं मार्केट कॅप

लाटांमुळे सागरेश्वर येथील वुड हाऊसचे नुकसान,एका बाजूने खचले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2020 1:50 PM

पर्यटनवृद्धीच्या उद्देशाने वेंगुर्ला सागरेश्वर किनारी उभारण्यात आलेल्या वुड हाऊसचे समुद्राच्या लाटांनी प्रचंड नुकसान झाले आहे. या प्रकल्पातील वुड हाऊस एका बाजूने खचले असून समुद्रात वाहून जाण्याच्या स्थितीत आहे. तर चुकीच्या पद्धतीने बांधकाम झाल्याने शासनाचे लाखो रुपये पाण्यात गेल्याचा आरोप येथील ग्रामस्थांनी केला आहे.

ठळक मुद्देलाटांमुळे सागरेश्वर येथील वुड हाऊसचे नुकसान,एका बाजूने खचलेसमुद्रात वाहून जाण्याच्या स्थितीत, चुकीच्या पद्धतीने बांधकाम, लाखो रुपये पाण्यात

वेंगुर्ला : पर्यटनवृद्धीच्या उद्देशाने वेंगुर्ला सागरेश्वर किनारी उभारण्यात आलेल्या वुड हाऊसचे समुद्राच्या लाटांनी प्रचंड नुकसान झाले आहे. या प्रकल्पातील वुड हाऊस एका बाजूने खचले असून समुद्रात वाहून जाण्याच्या स्थितीत आहे. तर चुकीच्या पद्धतीने बांधकाम झाल्याने शासनाचे लाखो रुपये पाण्यात गेल्याचा आरोप येथील ग्रामस्थांनी केला आहे.वेंगुर्ला तालुक्यातील पर्यटनाचा केंद्रबिंदू समजल्या जाणाऱ्या सागरेश्वर किनारी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्यावतीने गेली दीड ते दोन वर्षे या वुड हाऊस प्रकल्पाचे काम सुरू होते. या प्रकल्पाचे जवळजवळ ८० टक्के काम हे पूर्ण झाले होते.काही दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे समुद्राच्या लाटांचा जोर वाढून या प्रकल्पासाठी समुद्रकिनाऱ्यांवर उभारण्यात आलेला पाया हा ढासळण्यास सुरुवात झाली होती. दरम्यान, मागील दोन दिवस पडणाऱ्या पावसामुळे समुद्रालाही मोठे उधाण आले होते. शनिवारी रात्रीपासून समुद्राच्या लाटांचा जोर हा पुन्हा वाढला होता. यामुळे रविवारी पहाटे या प्रकल्पाच्या शेवटी असणारे वुड हाऊस हे एका बाजूने खचले असून ते समुद्रात वाहून जाण्याच्या स्थितीत आहे.दरम्यान, या प्रकारची माहिती मिळताच उभादांडा गावचे ग्रामविकास अधिकारी अरुण जाधव, तलाठी गोरड, ग्रामपंचायत सदस्य मधुकर तिरोडकर, आशु फर्नांडिस, पोलीस पाटील विजय नार्वेकर, भाजप युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस हितेश धुरी, भूषण आंगचेकर, ग्रामस्थ डुमिंग डिसोजा यांनी तत्काळ याठिकाणी पाहणी केली. याबाबत पाहणीचा अहवाल आम्ही वरिष्ठ पातळीवर व पर्यटन विकास महामंडळ यांच्याकडे पाठविणार आहोत असे ग्रामविकास अधिकारी जाधव यांनी सांगितले. याबाबत धुरी यांनी महाराष्ट्राचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे टिष्ट्वटरद्वारे चौकशीची मागणी केली आहे.सखोल चौकशी करावीएमटीडीसीमार्फत पर्यटनाच्या नावाखाली पैसे कसे पाण्यात घालविले जातात याचे हे उत्तम उदाहरण आहे. या अगोदर जे जे पकल्प एमटीडीसीने या सागरेश्वर किनारी राबविले आहेत ते किती यशस्वी झाले याचाही खुलासा त्यांनी करावा. शासनाने सखोल चौकशी करावी, अशी मागणी भाजप युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस हितेश धुरी यांनी केली आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग