शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

माजगाव,चराठ्याला नगरपालिकेकडून पाणीपुरवठा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 14:06 IST

water shortage Sawatnawadi Sindudurg : गेल्या अनेक वर्षांपासून सावंतवाडी नगरपालिकेने माजगाव, चराठा या गावांना पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र या ग्रामपंचायत सोबतचा करार संपल्यानंतर सावंतवाडी नगरपालिकेने अखेर पाणी पुरवठा करण्याचा निर्णय गुरूवारपासून थांबवला असून, कुणकेरीला पुरवठा होणारा अतिरिक्त पाणीसाठाही थांबविला आहे.

ठळक मुद्दे कुणकेरीलाही कराराप्रमाणे पाणी सावंतवाडीत पाणी पुरत नसल्याने घेतला निर्णय

सावंतवाडी : गेल्या अनेक वर्षांपासून सावंतवाडी नगरपालिकेने माजगाव, चराठा या गावांना पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र या ग्रामपंचायत सोबतचा करार संपल्यानंतर सावंतवाडी नगरपालिकेने अखेर पाणी पुरवठा करण्याचा निर्णय गुरूवारपासून थांबवला असून, कुणकेरीला पुरवठा होणारा अतिरिक्त पाणीसाठाही थांबविला आहे. माजगाव ग्रामस्थांनी नगराध्यक्ष संजू परब यांची भेट घेतली पण परब यांनी टँकरने पाणी पुरवठा करू असे सांगितले. आमदार दीपक केसरकर यांनीही यात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला.सावंतवाडी नगरपालिका माजगाव, चराठा, कोलगाव, कुणकेरी या ग्रामपंचायत क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून पाणी पुरवठा करत आहे. अनेक वेळा सावंतवाडी नगरपालिकेने माजगाव, चराठा या गावांना तुम्ही स्वत:ची व्यवस्था करा. कारण वाढत्या शहरीकरणामुळे पाणी पुरवठा करणे भविष्यात शक्य होणार नसल्याचे कळवले होते.नगरपालिकेचा ग्रामपंचायतशी झालेला करारही केव्हाच संपला आहे. तरीही नगरपालिका या गावांना पाणी पुरवठा करत आहे.यातील कुणकेरी गावात सावंतवाडीला पाणी पुरवठा करणारे पाळणेकोंड धरण असल्याने कुणकेरीला कायम स्वरूपी ८० हजार लिटर पाणी देणे बंधनकारक आहे. ते आजही सुरूच आहे. मात्र, पालिका ग्रामस्थांच्या आग्रहाखातर १ लाख २० हजार लीटर पाणी सोडत होते. यातील ४० हजार लीटर पाणी हे अतिरिक्त होते. मात्र गुरुवारपासून ८० हजार लीटरच पाणी देण्यात येणार आहे.माजगावमधील घरे पाण्यापासून वंचितमाजगाव व चराठा या गावांना नगरपालिका पाणी सोडत होती. ते पाणी आता कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय सावंतवाडी नगर पालिकेकडून घेण्यात आला आहे. त्यामुळे माजगावमधील अनेक घरे पाण्यापासून वंचित राहणार आहे. माजगाव येथील पाणी पुरवठा बंद झाल्यानंतर माजगाव ग्रामस्थांनी नगराध्यक्ष संजू परब यांची भेट घेऊन पाणी सोडण्याबाबत विनंती केली. पण परब यांनी पाणी सोडण्यात येणार नसून, तुम्हाला टँकरने पाणी पुरवठा करू असे सांगितले. आमदार दीपक केसरकर यांनीही मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला पण त्यांचे प्रयत्न असफल ठरल्याचे दिसून आले.

टॅग्स :water shortageपाणीकपातSawantwadiसावंतवाडीsindhudurgसिंधुदुर्ग