शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
2
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
3
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
4
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
6
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
7
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
8
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
9
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
10
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
11
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
12
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
13
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
14
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
15
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
16
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
17
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
18
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
19
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
20
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत

कणकवली येथे जाचक अटी असलेला कचरा प्रकल्प होऊ देणार नाही : सुशांत नाईक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 16:29 IST

जाचक अटी लादलेला हा प्रकल्प आम्ही होवु देणार नाही असे प्रतिपादन कणकवली नगरपंचायतीमधील शिवसेनेचे गटनेते नगरसेवक सुशांत नाईक यानी दिला आहे.

ठळक मुद्देजाचक अटी असलेला कचरा प्रकल्प होऊ देणार नाही सुशांत नाईक यांचे प्रतिपादन

कणकवली : कणकवली येथे कचरा निर्मुलनासाठी ए.जी .डॉटर्स कंपनीचा 900 कोटीचा न होणारा प्रकल्प घालण्याचा घाट घातला जात आहे. अत्यंत जाचक अटी या प्रकल्पाच्या करारपत्रामध्ये नमुद करण्यात आल्या आहेत.कणकवली नगरपंचायतीवर यानिमित्ताने 100 कोटीचा बोजा ठेवण्याचे काम या प्रकल्पाच्या माध्यमातुन नगरपंचायतीचे सत्ताधारी करत आहेत. त्यामुळे हा प्रकल्प आणुन दाखवावाच असे आमचे आव्हान या प्रकल्पाच्या समर्थकांना असुन जाचक अटी लादलेला हा प्रकल्प आम्ही होवु देणार नाही असे प्रतिपादन कणकवली नगरपंचायतीमधील शिवसेनेचे गटनेते नगरसेवक सुशांत नाईक यानी दिला आहे.कणकवली येथील विजय भवन येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी नगरसेवक सुशांत नाईक यांनी ए.जी. डॉटर्सच्या या 900 कोटी प्रकल्पाबाबतचे करारपत्र सादर करत या करारपत्रात नमुद केलेल्या जाचक अटींचा ऊहापोह करताना या अटी भविष्यात कणकवलीवासियांसाठी धोक्याची घंटा असल्याचे त्यानी सांगितले. यावेळी त्यांच्यासमवेत नगरसेविका मानसी मुंज, माही परुळेकर, योगेश मुंज, सुजीत जाधव, बाळु पारकर उपस्थित होते.नगरसेवक सुशांत नाईक म्हणाले, ए.जी.डॉटर्स कंपनी कणकवलीत 900 कोटीची गुंतवणुक करत हा भव्यदिव्य कचरा प्रकल्प राबवित आहे. या प्रकल्पाचे भूमिपुजन झाले असुन याबाबतचा करारनामा आमच्या हाती असुन यावर नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, बांधकाम सभापती, मुख्याधिकारी यांच्या सह्या आहेत.175 मेट्रीक टन कचरा प्रतिदिन या प्रकल्पासाठी लागणार असुन जर्मन तंत्रावर आधारीत हा प्रकल्प आहे. यासाठी 25 वर्षाकरीता नगरपंचायतीने लिजवर हा प्रकल्प स्विकारला आहे. नगरपंचायतीने कचरा उपलब्ध करुन देण्याची हमी दिली असुन यासाठी जिल्ह्यातील नगरपरिषदा त्याचप्रमाणे हॉस्पिटल, मोठ्या ग्रामपंचायती गृहीत धरल्या आहेत.हा कचरा प्रोजेक्ट प्लॅनपर्यंत आणण्याची जबाबदारी त्या त्या संस्थेची राहणार आहे. 175 मेट्रीक टनापैकी निदान 80 टक्के कचरा जमा झालाच पाहीजे असेही मान्य करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे सदर प्रकल्प अर्धवट काम झाले असता रद्द झाल्यास जवळ पास 100 कोटीची भरपाई या कंपनीला द्यावी लागणार आहे. त्याचप्रमाणे प्रकल्प पुर्ण होऊन बंद झाल्यास 300 कोटी रुपये भरपाईपोटी द्यावे लागणार आहेत. हा प्रकल्प नगरपंचायतीला नेमके काय देणार याबाबतचा स्पष्ट उल्लेख करार पत्रात नाही.या प्रकल्पातुन 60 मेगावॅट विजनिर्मिती दररोज होणार असुन प्रति तासाला 60 हजार युनिट धरल्यास विज वितरण कंपनी देत असलेल्या अडीज रुपये दराप्रमाणे तासाला दिड लाख रुपयाची वीज विकली जाणार आहे. एका दिवसात 36 लाखाची वीज निर्मिती होणार असुन वर्षभरात 100 कोटी विज विक्रीतुन या प्रकल्पाला मिळणार आहेत.हेच गणित साधुन 900 कोटीचा हा प्रकल्प कणकवलीत घालण्याचा घाट आखला जात असुन यदाकदाचित प्रकल्प रद्द झाल्यास 100 कोटी रुपये या कंपनीला संबंधित संस्थेने देणे आवश्यक आहे. याचाच अर्थ आमदार नितेश राणे 100 कोटीचा बोजा नगरपंचायतीच्या माथी ठेवणार असल्याचा आरोप सुशांत नाईक यानी केला असुन हा न होणारा प्रकल्प आहे.वेंगुर्ले नगरपरीषदेने स्वतःचा 5 टनाचा प्रकल्प विकसीत केला आहे. भारतात अन्य ठिकाणी कमी खर्चाचे प्रकल्प असताना कणकवलीतच 900 कोटीचा जाचक अटींचा हा प्रकल्प कशासाठी ? असा सवाल करताना 3 हेक्टरमध्ये 900 कोटीचा प्रकल्प उभा राहणार कसा ? याचे उत्तर सबंधितानी द्यावे. असे सांगतानाच आमचे या सत्ताधार्‍यांना आव्हान आहे.या प्रकल्पासाठी 900 कोटी आणुन दाखवाच आणि जाचक अटी लादुन हा प्रकल्प लादला जात असेल तर शिवसेनेच्या माध्यमातुन या प्रकल्पाला आम्ही ठामपणे विरोध करु असेही सुशांत नाईक यानी यावेळी सांगितले.

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नsindhudurgसिंधुदुर्ग