शहरं
Join us  
Trending Stories
1
"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!
2
मोठी घडामोड! अमेरिकेविरोधात युद्धास तयार झाला हा देश; ३७ लाखांच्या सैन्याला तयारीचे आदेश, रशियाचेही समर्थन...
3
डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का! 'भारतातून मालाची आयात वाढवण्याचे पुतिन यांचे आदेश; पंतप्रधान मोदींचे कौतुकही केले
4
डॉक्टरांच्या खराब हँडरायटिंगवर हायकोर्टचा 'स्ट्राँग' डोस! म्हणाले, रुग्णांच्या आयुष्याशी खेळ...
5
टाटा मोटर्सचा IPO... दोन दिवसांनी कमाईची संधी, लिस्टिंग कधी, प्राईज बँड काय, सर्वकाही जाणून घ्या
6
"'युद्ध का डर...!'; आम्ही कागदी वाघ, तर मग नाटो कोण?" पुतिन यांचा अमेरिकेवर तगडा प्रहार, भारतासंदर्भातही स्पष्टच बोलले!
7
VIDEO : केएल राहुलनं शिट्टी मारत साजरी केली सेंच्युरी; जाणून घ्या त्यामागचं कारण
8
त्या' 11 संशयितांची कसून चौकशी अकोला, मुंबईचे पोलीस पथक परतवाड्यात दाखल, इंट्रोगेशन सुरू
9
अमेरिकेनंतर आणखी एका मोठ्या देशात शटडाऊन; कर्मचारीच गेले संपावर, पर्यटन स्थळेही झाली बंद...
10
"तसेही आज तेच करावे लागले ना?"; भाजपने उद्धव ठाकरेंना डिवचले, दसरा मेळाव्यावरून हल्ला
11
Mirabai Chanu : मीराबाई चानूने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रचला इतिहास; १९९ किलो वजन उचलून जिंकलं सिल्व्हर मेडल
12
धक्कादायक! मुंबईतील २६/११ मधील हल्ल्यात NSG कमांडोने शौर्य दाखवले; आता गांजा तस्करीच्या आरोपाखाली अटक
13
"रावण वाईट नव्हता, थोडा खोडकर...", अभिनेत्रीची वादग्रस्त पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
14
Tragedy in Bihar: हृदयद्रावक घटना! वंदे भारत एक्सप्रेसच्या धडकेत ४ ठार; २ जण गंभीर जखमी
15
पुणे हादरले! टीव्ही बंद करण्यावरुन वाद, बापाची मुलाकडून हत्या; कोथरुडमधील घटना
16
टाटा मोटर्स वगळता विक्रीचा दबाव; जागतिक बाजारातील संमिश्र संकेतामुळे भारतीय बाजार रेड झोनमध्ये
17
मला पुरस्कार द्या...! पठ्ठ्याने फास्टॅग पास आल्यापासून २५ दिवसांत ११,००० किमी थार चालविली, वाचले एवढे रुपये...
18
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडेसाठी अभिषेक शर्मा-तिलक वर्माची टीम इंडियात एन्ट्री
19
"सुशांतबद्दल सांगायचं तर आम्ही ३ वर्ष...", अभिनेत्याच्या मृत्यूनंतर पहिल्यांदाच व्यक्त झाल्या सविता प्रभुणे
20
IT क्षेत्रासाठी मोठा धक्का! TCS मधून १२,००० जणांना काढणार, कर्मचाऱ्यांसमोर दोनच पर्याय

"गेली पाच वर्षे गृहराज्यमंत्री शिवसेनेचे होते, तेव्हा खासदार विनायक राऊत झोपले होते का?"

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2020 17:11 IST

जिल्ह्यातील काही जुन्या प्रकरणांचा पुन्हा नव्याने तपास करणार असल्याचे खासदार विनायक राऊत सांगत आहेत. मग गेली पाच वर्षे गृहराज्यमंत्री शिवसेनेचे होते, त्यावेळी खासदार राऊत आणि आमदार वैभव नाईक झोपले होते का? असा प्रतिटोला भाजपा नेते, जिल्हा बँक संचालक अतुल काळसेकर यांनी लगावला आहे.

ठळक मुद्दे गेली पाच वर्षे खासदार झोपले होते का ?, अतुल काळसेकर यांचा सवालविनायक राऊत यांच्या टीकेला दिले प्रत्युत्तर

कणकवली : अभिनेता सुशांतसिंह मृत्यू प्रकरणात काही शिवसेना नेत्यांची नावे असल्याची चर्चा सुरू झाली. त्याविषयी खासदार नारायण राणे यांनी आवाज उठविल्यानंतर विनाकारण त्रास देण्याच्या हेतूने जिल्ह्यातील काही जुन्या प्रकरणांचा पुन्हा नव्याने तपास करणार असल्याचे खासदार विनायक राऊत सांगत आहेत. मग गेली पाच वर्षे गृहराज्यमंत्री शिवसेनेचे होते, त्यावेळी खासदार राऊत आणि आमदार वैभव नाईक झोपले होते का? असा प्रतिटोला भाजपा नेते, जिल्हा बँक संचालक अतुल काळसेकर यांनी लगावला आहे.याबाबत त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, भाजपा नेत्यांच्या पाठपुराव्याने जिल्ह्यात दोन कोविड तपासणी लॅब उभ्या झाल्या. याचा पोटशूळ सत्ताधारी नेत्यांना आहे. मात्र, राणेंच्या कोविड लॅबचे राजकारण नको. कारण अत्यावश्यक असलेल्या लोकांना कोविड अहवाल तत्काळ मिळत आहेत.शिवसेनेच्या नेत्यांना केवळ राजकारणापलीकडे काहीच दिसत नाही. आता जुन्या गुन्ह्यांबाबत वक्तव्य करून लोकांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. यापूर्वीच संबंधित गुन्ह्यांबाबत पोलिसांनी तपास केलेला आहे. मग पुन्हा तपास करणार असल्याचे सांगून जनतेची दिशाभूल खासदार राऊत यांनी करू नये.अनेकदा अशा तपासाच्या घोषणा शिवसेनेच्या नेत्यांनी केलेल्या आहेत. जर खरोखरच या गुन्ह्यात काही तथ्य होते आणि त्याचा छडा लावायचा होता तर या जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री व गृहराज्यमंत्री दीपक केसरकर असताना विनायक राऊत यांनी का प्रयत्न केले नाहीत ? केसरकर यांना राणे विरोधाचे श्रेय मिळेल म्हणून त्यांनी तसे केले नाही का? याचे उत्तर द्यावे.मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केवळ खासदार राऊत दिखाऊपणा करीत आहेत. सध्या सिंधुदुर्गात दर दिवशी कोविड रुग्णांची संख्या वाढत आहे. सरकारी रुग्णालयात कोविड लक्षणे नसल्यास तपासणी केली जात नाही. त्यामुळे पडवे येथील लाईफटाईम हॉस्पिटलमध्ये कोविड लॅब झाल्यानंतर काही लोक राजकारण करीत आहेत.

या काळात जिल्ह्यातून इतर राज्यांमध्ये जाणाऱ्या लोकांना ताबडतोब अहवाल मिळत आहे. तसेच जिल्ह्यातील नोकरीनिमित्त जाणारे नागरिक, शिक्षणासाठी जाणारे विद्यार्थी व अन्य लोकांसाठी पडवेतील ही लॅब अत्यंत महत्त्वाची ठरत आहे. रत्नागिरीतील वालावलकर हॉस्पिटल येथील कोविड तपासणी लॅब बंद करण्यात आली. त्यामुळे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकांसाठी ही लॅब फार महत्त्वाची आहे.राणेंच्या हॉस्पिटलमध्ये अत्यंत कमी दरात डायलिसीसनारायण राणे यांच्या हॉस्पिटलमुळे न होऊ शकणाऱ्या शस्त्रक्रिया जिल्ह्यात होत आहेत. अत्यंत कमी दरात डायलिसीस सेवा तिथे सुरू आहे. जिल्ह्यातील सरकारी हॉस्पिटलमध्ये किती डायलिसीस होतात आणि जिल्ह्यात किती रुग्ण आहेत याचाही हिशोब खासदारांनी घ्यावा. मग कदाचित त्यांच्या मानेवरचे राणे विरोधाचे भूत उतरेल. असेही काळसेकर यांनी या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणAtul Kalasekarअतुल काळसेकरShiv SenaशिवसेनाVinayak Rautविनायक राऊत sindhudurgसिंधुदुर्ग