शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

"गेली पाच वर्षे गृहराज्यमंत्री शिवसेनेचे होते, तेव्हा खासदार विनायक राऊत झोपले होते का?"

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2020 17:11 IST

जिल्ह्यातील काही जुन्या प्रकरणांचा पुन्हा नव्याने तपास करणार असल्याचे खासदार विनायक राऊत सांगत आहेत. मग गेली पाच वर्षे गृहराज्यमंत्री शिवसेनेचे होते, त्यावेळी खासदार राऊत आणि आमदार वैभव नाईक झोपले होते का? असा प्रतिटोला भाजपा नेते, जिल्हा बँक संचालक अतुल काळसेकर यांनी लगावला आहे.

ठळक मुद्दे गेली पाच वर्षे खासदार झोपले होते का ?, अतुल काळसेकर यांचा सवालविनायक राऊत यांच्या टीकेला दिले प्रत्युत्तर

कणकवली : अभिनेता सुशांतसिंह मृत्यू प्रकरणात काही शिवसेना नेत्यांची नावे असल्याची चर्चा सुरू झाली. त्याविषयी खासदार नारायण राणे यांनी आवाज उठविल्यानंतर विनाकारण त्रास देण्याच्या हेतूने जिल्ह्यातील काही जुन्या प्रकरणांचा पुन्हा नव्याने तपास करणार असल्याचे खासदार विनायक राऊत सांगत आहेत. मग गेली पाच वर्षे गृहराज्यमंत्री शिवसेनेचे होते, त्यावेळी खासदार राऊत आणि आमदार वैभव नाईक झोपले होते का? असा प्रतिटोला भाजपा नेते, जिल्हा बँक संचालक अतुल काळसेकर यांनी लगावला आहे.याबाबत त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, भाजपा नेत्यांच्या पाठपुराव्याने जिल्ह्यात दोन कोविड तपासणी लॅब उभ्या झाल्या. याचा पोटशूळ सत्ताधारी नेत्यांना आहे. मात्र, राणेंच्या कोविड लॅबचे राजकारण नको. कारण अत्यावश्यक असलेल्या लोकांना कोविड अहवाल तत्काळ मिळत आहेत.शिवसेनेच्या नेत्यांना केवळ राजकारणापलीकडे काहीच दिसत नाही. आता जुन्या गुन्ह्यांबाबत वक्तव्य करून लोकांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. यापूर्वीच संबंधित गुन्ह्यांबाबत पोलिसांनी तपास केलेला आहे. मग पुन्हा तपास करणार असल्याचे सांगून जनतेची दिशाभूल खासदार राऊत यांनी करू नये.अनेकदा अशा तपासाच्या घोषणा शिवसेनेच्या नेत्यांनी केलेल्या आहेत. जर खरोखरच या गुन्ह्यात काही तथ्य होते आणि त्याचा छडा लावायचा होता तर या जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री व गृहराज्यमंत्री दीपक केसरकर असताना विनायक राऊत यांनी का प्रयत्न केले नाहीत ? केसरकर यांना राणे विरोधाचे श्रेय मिळेल म्हणून त्यांनी तसे केले नाही का? याचे उत्तर द्यावे.मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केवळ खासदार राऊत दिखाऊपणा करीत आहेत. सध्या सिंधुदुर्गात दर दिवशी कोविड रुग्णांची संख्या वाढत आहे. सरकारी रुग्णालयात कोविड लक्षणे नसल्यास तपासणी केली जात नाही. त्यामुळे पडवे येथील लाईफटाईम हॉस्पिटलमध्ये कोविड लॅब झाल्यानंतर काही लोक राजकारण करीत आहेत.

या काळात जिल्ह्यातून इतर राज्यांमध्ये जाणाऱ्या लोकांना ताबडतोब अहवाल मिळत आहे. तसेच जिल्ह्यातील नोकरीनिमित्त जाणारे नागरिक, शिक्षणासाठी जाणारे विद्यार्थी व अन्य लोकांसाठी पडवेतील ही लॅब अत्यंत महत्त्वाची ठरत आहे. रत्नागिरीतील वालावलकर हॉस्पिटल येथील कोविड तपासणी लॅब बंद करण्यात आली. त्यामुळे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकांसाठी ही लॅब फार महत्त्वाची आहे.राणेंच्या हॉस्पिटलमध्ये अत्यंत कमी दरात डायलिसीसनारायण राणे यांच्या हॉस्पिटलमुळे न होऊ शकणाऱ्या शस्त्रक्रिया जिल्ह्यात होत आहेत. अत्यंत कमी दरात डायलिसीस सेवा तिथे सुरू आहे. जिल्ह्यातील सरकारी हॉस्पिटलमध्ये किती डायलिसीस होतात आणि जिल्ह्यात किती रुग्ण आहेत याचाही हिशोब खासदारांनी घ्यावा. मग कदाचित त्यांच्या मानेवरचे राणे विरोधाचे भूत उतरेल. असेही काळसेकर यांनी या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणAtul Kalasekarअतुल काळसेकरShiv SenaशिवसेनाVinayak Rautविनायक राऊत sindhudurgसिंधुदुर्ग