शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
3
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
4
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
5
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
6
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
7
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
8
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
9
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
10
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
11
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
12
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
13
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
14
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
15
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
16
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
17
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
18
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
19
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
20
Viral Video: "ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

‘मालवण’ युद्धनौकेचे कोची येथे झाले जलावतरण; अत्याधुनिक अंडरवॉटर सेन्सर्सने सुसज्ज

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: December 1, 2023 18:35 IST

नौदल दिनापूर्वीच मालवणचा सन्मान 

मालवण (सिंधुदुर्ग) : मालवणवासीयांना अभिमानाची गोष्ट ठरलेल्या ‘मालवण’ नावाच्या युद्धनौकेचे भारतीय नौदलाने गुरुवारी कोची येथे आयोजित कार्यक्रमात जलावतरण केले. पाणबुडीविरोधी कारवायांबरोबरच अत्याधुनिक अंडरवॉटर सेन्सर्सने सुसज्ज अशी ही नौका असणार आहे. नौदल दिनाच्या कार्यक्रमापूर्वीच मालवणचा सन्मान झाल्याने जिल्हावासीयांसाठी ते भूषणावह ठरणार आहे.या युद्धनौकेबरोबरच माहे आणि मंगरोळ या दोन नौकांचेही त्याचवेळी जलावतरण करण्यात आले. भारतीय नौदलासाठी कोची शिपयार्ड लिमिटेड (सीएसएल, कोची)कडून पाणबुडी अवरोधक उथळ जलस्तरीय सागरयुद्ध प्रकल्पांतर्गत या पहिल्या तीन नौकांचे काम हाती घेण्यात होते.सागरी परंपरेला अनुसरून, तीनही नौकांचे विधिवत अथर्ववेदाच्या आवाहनात समुद्रात जलावतरण करण्यात आले. मालवण या नौकेचे व्हाइस एडमिरल सूरज बेरी, सी-इन-सी यांच्या उपस्थितीत कंगना बेरी यांच्या हस्ते जलावतरण करण्यात आले. यावेळी नौसेना उपप्रमुख व्हाईस ॲडमिरल संजय जे. सिंह, व्हाईस ॲडमिरल कमांडेंट आईएनए, पुनीत बहल, अंजली बहल, जरिन लॉर्ड सिंह आदी मान्यवर उपस्थित होते.

बंदरांच्या आरमारी इतिहासाचे स्मरणमाहे श्रेणीतील या पाणबुडी अवरोधक उथळ जलस्तरीय सागरयुद्ध, शॅलो वॉटर क्राफ्ट्सचे नामकरण भारताच्या किनारपट्टीवरील मोक्याच्या आणि महत्त्वाच्या बंदरांच्या नावावरून करण्यात आले आहे. त्यामुळे या बंदरांना असलेला आरमारी युद्धनौकांचा गौरवशाली इतिहास सर्वांसमोर नेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

अत्याधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्णसंरक्षण मंत्रालय आणि कोचीन शिपयार्ड लिमिटेड यांच्यात ३० एप्रिल २०१९ रोजी आठ अँटि-सबमरीन वॉरफेअर शॅलो क्राफ्ट जहाजे बांधण्याचा करार करण्यात आला होता. माहे श्रेणीतील ही जहाजे स्वदेशी विकसित आणि अत्याधुनिक अंडरवॉटर सेन्सर्सने सुसज्ज असतील. या नौकांचा उपयोग समुद्राच्या पाण्यात पाणबुडीविरोधी कारवायांबरोबरच कमी तीव्रतेचे समुद्री ऑपरेशन्स (LIMO) आणि माइन लेइंग ऑपरेशन्ससाठी होणार आहे.जलावतरण करण्यात आलेल्या अँटि-सबमरीन वॉरफेअर शॅलो क्राफ्ट ७८ मीटर लांब असून, कमाल वेग २६ नॉट्स आहे. आणि त्यांचा विस्थपण अंदाजे ९०० टन आहे.

युद्धनौका बांधणीत आत्मनिर्भर भारतएकाच वर्गातील तीन जहाजांची एकाचवेळी बांधणी हे ‘आत्मनिर्भर भारत’ आणि भारताच्या ‘मेक इन इंडिया’ वचनबद्धतेला बळकटी देणारे आहे. या प्रकल्पांतर्गत पहिली नौका २०२४ मध्ये वितरित करण्याचे नियोजित आहे. अँटि-सबमरीन वॉरफेअर शॅलो क्राफ्ट जहाजामध्ये ८० टक्क्यांपेक्षा जास्त स्वदेशी सामग्री आहे. ज्यामुळे भारतीय उत्पादन युनिट्सद्वारे मोठ्या प्रमाणावर संरक्षण उत्पादन कार्यान्वित केले जाईल. देशात रोजगार निर्माण होईल आणि क्षमता वाढेल.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग