शहरं
Join us  
Trending Stories
1
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
2
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
3
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
4
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
5
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
6
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
7
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
8
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
9
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
10
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज
11
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
12
राज कुंद्राने आशीर्वाद घेताच केली किडनी ऑफर, ऐकून काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून आश्चर्य वाटेल
13
"अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना आणल्यानेच महायुतीला २३८ जागा मिळाल्या’’, सुनिल तटकरेंचा दावा   
14
मुंबईत शिवसेना-मनसेची ताकद जास्त, राज ठाकरेंचा दावा; CM फडणवीस म्हणाले...
15
War 2 Review: ॲक्शनच्या नादात कथेवर फेरलं पाणी, कसा आहे हृतिक रोशन-ज्यु. एनटीआरचा 'वॉर २'?
16
थरकाप उडवणारा व्हिडीओ! मृत्यूने घातली झडप, बापाने लेकीसमोर जागेवरच सोडला जीव; दिल्लीतील घटना
17
अर्जुन तेंडुलकर संदर्भात हवाई सुंदरीला झालेला गैरसमज! क्रिकेटच्या देवानं आधी गंमत केली; मग...
18
पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टासमोर EVM मधील मतमोजणी झाली; पराभूत उमेदवार बनला 'विजयी', गावकरी अवाक्
19
Viral: माकड दादाने घेतली ‘डॉगेश भाऊं’ची मुलाखत, धम्माल VIDEO पाहून तुम्हीही पोट धरून हसाल
20
एकत्र जीवन संपवूया असं सांगून अल्पवयीन प्रेयसीला विष पाजून मारले, मग झाला फरार

भू मोजणी ग्रामस्थांनी रोखली

By admin | Updated: January 19, 2016 00:05 IST

श्रावण येथील धरण : ग्रामस्थांकडून अधिकाऱ्यांना घेराव

आचरा : श्रावण गवळीवाडी येथील पावणाईचे भाटले व झऱ्याची वाडी क्षेत्रात लघुपाटबंधारे योजनेतून होऊ घातलेल्या धरणाच्या भू मोजणीस ग्रामस्थांनी तीव्र विरोध करत १५ हेक्टरच्या भू मोजणीस आलेल्या अधिकाऱ्यांना घेराव घालत भू मोजणी ग्रामस्थांनी रोखली. भू मोजणीचे काम लघुसिंचन (जलसंधारण) उपविभाग आंबडपाल कुडाळ यांच्यामार्फत होणार होते. यावेळी संसार उद्ध्वस्त करणारे धरणच नको असल्याने मोजणीच कशाला असा सवाल करत अधिकाऱ्यांना ग्रामस्थांनी घेराव घातला.यावेळी मोजणीसाठी लघुसिंचन उपविभागीय अभियंता व्ही. आर. अजेटराव, शाखा अभियंता एस. पी. टकले, भू मापन अधिकारी चैतन्य गोसावी, वनविभागाचे राठोड, मंडल अधिकारी एन. बी. पाटील, ठेकेदार बाप्पा मांजरेकर उपस्थित होते. यावेळी मोजणी रोखण्यासाठी ग्रामस्थांसोबत माजी सभापती सीमा परुळेकर, राजू परुळेकर, नितीन पवार, ग्रामस्थ प्रकाश सावंत, विजय गवळी, मंगेश यादव, दीपक पाटकर, प्रमोद गवळी, दीपाली पाटकर, सिमंतनी कासले, सविता सडेकर, विद्या गवळी, सुगंधा नाटेकर यांच्यासह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.दरम्यान, श्रावण गवळीवाडीतील धरणासाठी लागणाऱ्या १५ हेक्टर जागेच्या भूसंपादनासाठी भू मोजणीच्या नोटीसा ३ जानेवारीला ग्रामस्थांना बजावण्यात आल्या होत्या. परंतु ग्रामस्थांनी नोटीसा न स्वीकारत आपला धरणास असलेला विरोध कायम असल्याचे दाखवून दिले होते. अधिकाऱ्यांना रस्त्यावरच रोखलेसोमवारी १० वाजण्याच्या सुमारास मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना ग्रामस्थांनी श्रावण गवळीवाडीच्या रस्त्यावरच रोखले. आम्हाला धरणच नको आहे तर तुमची मोजणी कशाला असा सवाल करत ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. यावेळी अधिकारी व ठेकेदार आप्पा मांजरेकर यांनी ग्रामस्थांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. परंतु आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी आपला विरोध कायम ठेवला. गावात मोजणीसाठी पाऊलही ठेवू देणार नसल्याचा इशारा दिला. त्यामुळे आता हा धरण प्रकल्प वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.(वार्ताहर)धरण झाल्यास : आत्मदहनाचा इशाराग्रामस्थांच्यावतीने बाजू मांडताना विजय गवळी म्हणाले की, ४५ एकर जमीन या धरणात जाणार आहे. आमच्या आंबा, काजू कलमे बागा यात नष्ट होणार आहेत. आमच्या शेतजमिनीही राहणार नाहीत तर आम्हाला धरणाचा काय उपयोग असा सवाल अधिकाऱ्यांना केला तर शासन आमच्यावर जबरदस्तीने धरण लादत असेल तर श्रावण गवळीवाडीत प्रत्येक ग्रामस्थ आत्मदहन करेल असा इशारा देत ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना गावातून निघून जाण्यास सांगितले. ग्रामस्थांचा विरोध असेल तसा अहवाल आपण वरिष्ठांना पाठवू असे सांगत ग्रामस्थांची मोजणीस परवानगी नसेल तर मोजणी करणार नाही असे सांगत काढता पाय घेतला.महिलांची आक्रमक भूमिकादरम्यान, अधिकाऱ्यांची ग्रामस्थांशी चर्चा चालू असताना मोजणीसाठी आलेल्या ठेकेदाराच्या कामगारांची गाडी गावात गेली असता महिलांनी गाडीचा पाठलाग करत वाडीत घुसलेली गाडी परतवून लावली व आमचे संसार बुडविणारे धरण कदापी होऊ देणार नसल्याचा इशारा त्यांनी अधिकाऱ्यांना दिला.