शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

ग्राम कृषी विकास समिती कागदावरच राहू नये;शेतकर्‍यांची अपेक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2020 13:25 IST

Agriculture Sector, sindhdudurgnews, farmar, grampanchyat शेतीच्या सर्वांगीण विकासाबरोबरच गावातील नैसर्गिक साधन संपत्तीचा विनियोग करणे तसेच अन्य उद्देश समोर ठेवून प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये ग्राम कृषी विकास समितीची स्थापना करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. मात्र, ही समिती फक्त कागदावरच न रहाता खऱ्या अर्थाने कृषी विकासाला दिशा देण्यासाठी व शेतकरी आर्थिक समृध्द कसा होईल या उद्देशाने ग्रामपातळीवर कार्यरत रहावी अशी अपेक्षा अनेक शेतकऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

ठळक मुद्देशेतकर्‍यांची अपेक्षा ; आर्थिक समृद्धीसाठी लागावा हातभार समितीची प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये होणार स्थापना

सुधीर राणेकणकवली : शेतीच्या सर्वांगीण विकासाबरोबरच गावातील नैसर्गिक साधन संपत्तीचा विनियोग करणे तसेच अन्य उद्देश समोर ठेवून प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये ग्राम कृषी विकास समितीची स्थापना करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. मात्र, ही समिती फक्त कागदावरच न रहाता खऱ्या अर्थाने कृषी विकासाला दिशा देण्यासाठी व शेतकरी आर्थिक समृध्द कसा होईल या उद्देशाने ग्रामपातळीवर कार्यरत रहावी अशी अपेक्षा अनेक शेतकऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.ग्राम कृषी विकास समितीच्या माध्यमातून शेतकर्‍यांना गावातच कृषी विषयक योजनांची माहिती व मार्गदर्शन मिळेल, असे जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे या समितीकडून शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. शेती हा ग्रामीण भागात महत्वाचा व्यवसाय आहे. अनेक कुटुबांच्या उपजिविकेचे ते साधन आहे. मात्र , हवामानातील बदल, बदलते पर्जन्यमान, कीड व रोग, सुधारित जातीचे बियाणे उपलब्ध न होणे, शेती मालाच्या दरामध्ये अचानक घसरण होणे आदी कारणांमुळे शेती व्यवसायातून शाश्वत उत्पन्न मिळेलच असे सांगता येत नाही.

या सर्व समस्यांवर ग्रामीण स्तरावर विचारविनिमय करून मार्गदर्शन होणे गरजेचे असते . त्यासाठी ग्रामस्तरावर समिती आवश्यक असल्याचे शासनाच्या लक्षात आले. त्यामुळे ग्राम कृषी विकास समिती प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा उद्देश खूप चांगला आहे .कृषी विभागाच्या योजना तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे या समितीने सक्षमपणे काम केल्यास सोपे होणार आहे. तसेच ग्रामीण भागात जे ठराविक ग्रामस्थ पुन्हा पुन्हा योजनांचा लाभ घेतात त्यांनाही त्यामुळे अटकाव होवू शकणार आहे. या समितीमध्ये सरपंचांसह १४ सदस्य असणार आहेत.समितीने शासनाच्या कृषी विषयक सर्व योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रसार व प्रचार करण्याबरोबरच योजनांचा नियमितपणे आढावा घ्यायचा आहे. स्थानिक स्तरावरील हवामान, पाऊस, पाण्याची उपलब्धता, जमिनीचा पोत लक्षात घेवून विविध प्रकारच्या पीक लागवडीसंबंधी नियोजन व शेतकर्‍यांना मार्गदर्शन करायचे आहे.दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन, शेळीपालन, रेशीम लागवड आदी शेतीपूरक व्यवसायाबाबत मार्गदर्शन करण्यासाठी समितीने संबंधित विभागांच्या अधिकार्‍यांना निमंत्रित करावयाचे आहे .त्यामुळे शासनाकडून अशा वेगवेगळ्या समित्या स्थापन करून ग्राम विकासाला गती देण्याचा प्रयत्न केला जातो. तशीच ही कृषी विकास समिती असून शेतकरी वर्गातून निश्चितपणे तिचे स्वागत होणार आहे. मात्र ही समिती कागदावर न राहता खर्‍या अर्थाने शेतकर्‍यांना दिशा देणारी ठरावी. अशी प्रतिक्रिया शेतकरी व्यक्त करत असून तसे झाले तर गावाचा आर्थिक दृष्ट्या सर्वांगीण विकास होण्यास मदत होणार आहे.

निर्णय चांगला, अंमलबजावणी आवश्यक !शासनाने घेतलेला निर्णय चांगला आहे. पण समिती पूर्ण क्षमतेने कार्यरत होऊन तिचा उद्देश सफल झाला पाहिजे. समितीने आपल्या कार्यकक्षेत येणाऱ्या विविध मुद्यांची अंमलबजावणी सक्षमपणे केल्यास शेतकऱ्यांना त्याचा निश्चितच फायदा होईल.- संदीप कदम, शेतकरी .

 

 

 

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रgram panchayatग्राम पंचायतsindhudurgसिंधुदुर्ग