शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

ग्राम कृषी विकास समिती कागदावरच राहू नये;शेतकर्‍यांची अपेक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2020 13:25 IST

Agriculture Sector, sindhdudurgnews, farmar, grampanchyat शेतीच्या सर्वांगीण विकासाबरोबरच गावातील नैसर्गिक साधन संपत्तीचा विनियोग करणे तसेच अन्य उद्देश समोर ठेवून प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये ग्राम कृषी विकास समितीची स्थापना करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. मात्र, ही समिती फक्त कागदावरच न रहाता खऱ्या अर्थाने कृषी विकासाला दिशा देण्यासाठी व शेतकरी आर्थिक समृध्द कसा होईल या उद्देशाने ग्रामपातळीवर कार्यरत रहावी अशी अपेक्षा अनेक शेतकऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

ठळक मुद्देशेतकर्‍यांची अपेक्षा ; आर्थिक समृद्धीसाठी लागावा हातभार समितीची प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये होणार स्थापना

सुधीर राणेकणकवली : शेतीच्या सर्वांगीण विकासाबरोबरच गावातील नैसर्गिक साधन संपत्तीचा विनियोग करणे तसेच अन्य उद्देश समोर ठेवून प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये ग्राम कृषी विकास समितीची स्थापना करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. मात्र, ही समिती फक्त कागदावरच न रहाता खऱ्या अर्थाने कृषी विकासाला दिशा देण्यासाठी व शेतकरी आर्थिक समृध्द कसा होईल या उद्देशाने ग्रामपातळीवर कार्यरत रहावी अशी अपेक्षा अनेक शेतकऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.ग्राम कृषी विकास समितीच्या माध्यमातून शेतकर्‍यांना गावातच कृषी विषयक योजनांची माहिती व मार्गदर्शन मिळेल, असे जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे या समितीकडून शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. शेती हा ग्रामीण भागात महत्वाचा व्यवसाय आहे. अनेक कुटुबांच्या उपजिविकेचे ते साधन आहे. मात्र , हवामानातील बदल, बदलते पर्जन्यमान, कीड व रोग, सुधारित जातीचे बियाणे उपलब्ध न होणे, शेती मालाच्या दरामध्ये अचानक घसरण होणे आदी कारणांमुळे शेती व्यवसायातून शाश्वत उत्पन्न मिळेलच असे सांगता येत नाही.

या सर्व समस्यांवर ग्रामीण स्तरावर विचारविनिमय करून मार्गदर्शन होणे गरजेचे असते . त्यासाठी ग्रामस्तरावर समिती आवश्यक असल्याचे शासनाच्या लक्षात आले. त्यामुळे ग्राम कृषी विकास समिती प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा उद्देश खूप चांगला आहे .कृषी विभागाच्या योजना तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे या समितीने सक्षमपणे काम केल्यास सोपे होणार आहे. तसेच ग्रामीण भागात जे ठराविक ग्रामस्थ पुन्हा पुन्हा योजनांचा लाभ घेतात त्यांनाही त्यामुळे अटकाव होवू शकणार आहे. या समितीमध्ये सरपंचांसह १४ सदस्य असणार आहेत.समितीने शासनाच्या कृषी विषयक सर्व योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रसार व प्रचार करण्याबरोबरच योजनांचा नियमितपणे आढावा घ्यायचा आहे. स्थानिक स्तरावरील हवामान, पाऊस, पाण्याची उपलब्धता, जमिनीचा पोत लक्षात घेवून विविध प्रकारच्या पीक लागवडीसंबंधी नियोजन व शेतकर्‍यांना मार्गदर्शन करायचे आहे.दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन, शेळीपालन, रेशीम लागवड आदी शेतीपूरक व्यवसायाबाबत मार्गदर्शन करण्यासाठी समितीने संबंधित विभागांच्या अधिकार्‍यांना निमंत्रित करावयाचे आहे .त्यामुळे शासनाकडून अशा वेगवेगळ्या समित्या स्थापन करून ग्राम विकासाला गती देण्याचा प्रयत्न केला जातो. तशीच ही कृषी विकास समिती असून शेतकरी वर्गातून निश्चितपणे तिचे स्वागत होणार आहे. मात्र ही समिती कागदावर न राहता खर्‍या अर्थाने शेतकर्‍यांना दिशा देणारी ठरावी. अशी प्रतिक्रिया शेतकरी व्यक्त करत असून तसे झाले तर गावाचा आर्थिक दृष्ट्या सर्वांगीण विकास होण्यास मदत होणार आहे.

निर्णय चांगला, अंमलबजावणी आवश्यक !शासनाने घेतलेला निर्णय चांगला आहे. पण समिती पूर्ण क्षमतेने कार्यरत होऊन तिचा उद्देश सफल झाला पाहिजे. समितीने आपल्या कार्यकक्षेत येणाऱ्या विविध मुद्यांची अंमलबजावणी सक्षमपणे केल्यास शेतकऱ्यांना त्याचा निश्चितच फायदा होईल.- संदीप कदम, शेतकरी .

 

 

 

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रgram panchayatग्राम पंचायतsindhudurgसिंधुदुर्ग