शहरं
Join us  
Trending Stories
1
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
2
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
3
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
4
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
5
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
6
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
7
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
8
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
9
नवी दिल्लीचे झाले गॅस चेंबर; विषारी हवेमुळे श्वास कोंडला
10
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
11
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
12
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
13
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
14
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
15
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
16
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
17
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
18
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
19
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
20
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...

गोव्यातील विजय सामान्य कार्यकर्त्यांचा अन् जनतेचा - भाजप प्रदेशाध्यक्ष तानवडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2022 19:15 IST

काही एक्झीट पोल मुळे मतदार चलबिचल झाले होते. पण जो विकास आम्ही मागील पाच वर्षात केला त्यामुळेच भाजपचे सरकार येणार याचा विश्वास होता असेही तानवडे यांनी सांगितले.

सावंतवाडी : गोव्यातील विजय हा सर्व सामान्य कार्यकर्त्यांचा आणि जनतेचा विजय आहे. गोव्यात भाजपचे सरकार येणार हे मी पूर्वीच सांगितले होते. सर्व वरिष्ठ नेत्यांनी आमच्यावर विश्वास दाखवला त्यामुळेच हे सर्व शक्य झाले असे मत गोव्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंदशेठ तानवडे यांनी व्यक्त केले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी गोव्यात येऊन चांगले काम केल्याचे ही त्यांनी यावेळी सांगितले.ते कोल्हापूर हून गोव्याकडे जात असताना काही काळ सावंतवाडीत थांबले असता पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्याचे भाजप पदाधिकारी पुखराज पुरोहित यांनी स्वागत केले.तानवडे म्हणाले, गोव्यात भाजप सरकार येणार हे निश्चित होते. गेली दोन वर्षे आम्ही ग्रामीण भागात काम करत होतो. सर्व पंचायत तसेच नगर पालिकेतील यश यामुळेच आम्हाला विजयाची खात्री होती. मात्र काही एक्झीट पोल मुळे मतदार चलबिचल झाले होते. पण जो विकास आम्ही मागील पाच वर्षात  केला त्यामुळेच भाजपचे सरकार येणार याचा विश्वास होता असेही तानवडे यांनी सांगितले.ग्रामीण भागात काम करत असतना जनतेने विश्वास दिला होता त्याच जोरावर भाजप चे सरकार पुन्हा येणार हे मी सांगितले होते. वरिष्ठ नेत्यांनी आम्हाला काम करण्याची मोकळीक दिली त्यामुळेच हे सर्व शक्य झाले गोव्यातील काही नेते सोडून गेले त्यामुळे एक दोन जागा गेल्या त्यामुळेच २२ पल्सचा नारा दोन जागानी  मागे पडला अन्यथा चमत्कार घडला असता असेही तानवडे म्हणाले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गBJPभाजपाgoaगोवाGoa Assembly Election 2022गोवा विधानसभा निवडणूक २०२२