शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

गोव्यातील विजय सामान्य कार्यकर्त्यांचा अन् जनतेचा - भाजप प्रदेशाध्यक्ष तानवडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2022 19:15 IST

काही एक्झीट पोल मुळे मतदार चलबिचल झाले होते. पण जो विकास आम्ही मागील पाच वर्षात केला त्यामुळेच भाजपचे सरकार येणार याचा विश्वास होता असेही तानवडे यांनी सांगितले.

सावंतवाडी : गोव्यातील विजय हा सर्व सामान्य कार्यकर्त्यांचा आणि जनतेचा विजय आहे. गोव्यात भाजपचे सरकार येणार हे मी पूर्वीच सांगितले होते. सर्व वरिष्ठ नेत्यांनी आमच्यावर विश्वास दाखवला त्यामुळेच हे सर्व शक्य झाले असे मत गोव्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंदशेठ तानवडे यांनी व्यक्त केले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी गोव्यात येऊन चांगले काम केल्याचे ही त्यांनी यावेळी सांगितले.ते कोल्हापूर हून गोव्याकडे जात असताना काही काळ सावंतवाडीत थांबले असता पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्याचे भाजप पदाधिकारी पुखराज पुरोहित यांनी स्वागत केले.तानवडे म्हणाले, गोव्यात भाजप सरकार येणार हे निश्चित होते. गेली दोन वर्षे आम्ही ग्रामीण भागात काम करत होतो. सर्व पंचायत तसेच नगर पालिकेतील यश यामुळेच आम्हाला विजयाची खात्री होती. मात्र काही एक्झीट पोल मुळे मतदार चलबिचल झाले होते. पण जो विकास आम्ही मागील पाच वर्षात  केला त्यामुळेच भाजपचे सरकार येणार याचा विश्वास होता असेही तानवडे यांनी सांगितले.ग्रामीण भागात काम करत असतना जनतेने विश्वास दिला होता त्याच जोरावर भाजप चे सरकार पुन्हा येणार हे मी सांगितले होते. वरिष्ठ नेत्यांनी आम्हाला काम करण्याची मोकळीक दिली त्यामुळेच हे सर्व शक्य झाले गोव्यातील काही नेते सोडून गेले त्यामुळे एक दोन जागा गेल्या त्यामुळेच २२ पल्सचा नारा दोन जागानी  मागे पडला अन्यथा चमत्कार घडला असता असेही तानवडे म्हणाले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गBJPभाजपाgoaगोवाGoa Assembly Election 2022गोवा विधानसभा निवडणूक २०२२