शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करण्याला फडणवीस,अजित पवारांचा विरोध होता"
2
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
3
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
4
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
5
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
6
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
7
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
8
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
9
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
10
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
11
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
12
'सिंघम 3' च्या सेटवरुन अजय देवगण-जॅकी श्रॉफचा फाईट सीन लीक, व्हिडीओ व्हायरल
13
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
14
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
15
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
16
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
17
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
18
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
19
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
20
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 

वेंगुर्ले किनारपट्टी काळ्या डागांनी व्यापली

By admin | Published: May 26, 2016 11:48 PM

तेलकट काळ्या गोळ्यांचा खच : पर्यटकांची पाठ, प्रशासनाचे दुर्लक्ष, स्थानिकांतून संताप--लोकमत विशेष

सावळाराम भराडकर ---वेंगुर्ले  सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निळाशार पाण्यापने व शुभ्र वाळूने बहरलेल्या समुद्र किनाऱ्यांची सर्वांनाच भुरळ पडली आहे. या आकर्षनाने पर्यटकांना वेड लावले असून वर्षभर पर्यटकांचा ओढा या किनारपट्टीवर कायम राहतो. त्यामुळे जिल्ह्यातील पर्यटनला या किनारपट्टींनी बळ मिळाले आहे. पण सद्या वेंगुर्ले-फळयेकोंडा, वायंगणी, कोंडूरांसह तालुक्यातील सर्वच समुद्र किनाऱ्यावरील वाळूवर काळ्या व तेलकाट गोळ्यांचा तवंग पसरला आहे. वाळूच्या पांढऱ्या शुभ्र किनाऱ्यावर आणि निळाशार पाण्यावर अशा काळ्याकुट्ट डागांनी किनारपट्टी अस्वच्छ झाली असून पर्यटकांना ती मारक ठरत आहे. परिणामी पर्यटनास आळा बसण्याचा धोका संभवतो आहे. तर दरवर्षी सागर किनारे स्वच्छ करण्याचे आराखडे आखणाऱ्या प्रशासनाने असे तवंग होण्याचे गुपित ओळखून संबंधितांवर कडक कारवाई करण्यास मात्र कायमच टाळाटाळ केली आहे. त्यामुळे अशा प्रकाराने वेंगुर्लेतील किनारपट्टीवरील पर्यटनास धोका संभवतो आहे. सिंधुदुर्ग जिल्हा हा तसा पहिल्यापासून पर्यटन जिल्हा म्हणून ओळखला जातो. पण शासनाने तो अधिकृत घोषित केल्यावर येथील पर्यटनास खऱ्याअर्थाने चालना मिळाली. जिल्ह्यातील नयनरम्य सागर किनारे, निळेशार स्वच्छ पाणी आणि त्याचबरोबर पांढऱ्या शुभ्र वाळूचा पसरलेला थर पर्यटकांना भुरळ घालत राज्यासह देशातील पर्यटकांना आपल्याकडे ओढण्यास कारणीभुत ठरला. सिंधुदूर्ग जिल्ह्याला लाभलेले किनारपट्टीचे वरदानाने वर्षभर पर्यटकांचा लोंढा जिल्हयात आकर्षीत झाला आहे. यामुळे स्थानिकांना व्यापार, व्यवसायासाठी संजीवनी ठरली आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या अर्थिक विकासाचा कणा म्हणून या किनारपट्टीकडे पाहिले जाते. शिवाय निसर्गरम्य ठिकाणे आणि मोजके पर्यटक यांमुळे जिल्ह्याच्या सर्वच किनाऱ्यांवर आता विदेशी पर्यटकही आपली हजेरी लावत आहेत. साहजिकच यामुुळे दिवसेंदिवस देशी-विदेशी पर्यटकांची संख्या वाढत आहे. तर वर्षातील मे व दिवाळी अशा दोन मुख्य सुट्यांमध्येही पर्यटकांचा ओढा मोठ्या संख्येने राहतो. सद्या मे महिन्यात शाळांना सुट्ट्या असल्याने कुटुंबासह मुंबईकरही पर्यटनासाठी मोठ्या संख्येने गावी आले आहेत. किनाऱ्यावरील पर्यटकांची संख्या वाढल्याने वेंगुर्लेतील सागरी किनारे पर्यटकांनी सजले आहेत. मात्र, योगायोगाने याच महिन्यात वेंगुर्लेतील बहुतांशी किनारपट्टीवर तेल तवंगाचे लहान-मोठे गोळे इतस्तत: पडलेले आहेत. शिवाय हे गोळे चिकटमय असून ते मेणाप्रमाणे मऊ आहेत. कडाकाच्या उन्हाने उन्हामुळे वितळून येथील शुभ्र वाळूवर पडल्याने किनारपट्टी काळीकुट्ट बनत आहे. तसेच पर्यटकांच्या किनारपट्टीवर चालताना ती पायाला चिकटत आहे. तेलकट गोळे एकदा पायाला किंवा चपलाला चिकटले तर बऱ्याच प्रयत्नांनी ती निघता निघत नाही. समुद्र किनाऱ्यावरील मुलांनाही ते अपायकारक ठरत आहे. वेंगुर्ले तालुक्याचा विचार करताना निसर्गाने मुक्त हस्ताने निसर्गरम्य अशा सागरी किनारपट्टीची मुक्त हस्ताने उधळण केली आहे. मात्र, मानवनिर्मित या तेलतवंगाचा फटका पर्यटनप्रेमींबरोबरच येथील स्थानिकांना बसत आहे. याची दखल घेऊन किनारे स्वच्छ करण्याचे आराखडे प्रशासकीय अधिकारी आखतात व ते कितपत कृतीत आणतात हा संशोधनाचाच विषय आहे. मात्र, हे कशाने घडते याची साधी शहानिशाही होत नाही. कारण अस्पष्ट : यंत्रणाही ठप्पचसागरी मार्गे मोठ्या प्रमाणात तेल इंधनची वाहतूक होत असते. बऱ्याचवेळा अशी वाहतूक होताना मोठ्या प्रमाणावर तेल गळती होते. तर काहीवेळा तेलाची वाहतूक होताना जहाजांना जलसमाधीही पण मिळते. कदाचित याहीमुळे असे तवंग निर्माण होऊ शकतात. तरे मे महिन्यात जिल्ह्यात समुद्रात मासेमारी करणे बंदीचे असते. अशावेळी सर्वच मच्छिमार आपल्या नौका, जहाज व तत्सम साधनांची समुद्रात साफसफाई करून आतील सर्वच घाण समुद्रात फेकतात. कदाचित यामुळेही असे तेल-तवंगांचे गोळे तयार होऊन ते समुद्राच्या लाटेने किनारपट्टीवर पसरत असतील. गोवा, केरळ, आंध्र तसेच सिंधुदुर्गातील मोठ्या प्रमाणात मासेमारी केली जाते. त्यामुळे साहजीकच मे महिन्याच्या याच काळात डागडुजी व देखभालीसाठी नौकांची इंजिनाबरोबरच इतरही वस्तूंची ‘आॅईल’ने साफसफाई केली. कदाचित याच प्रकारामुळे अतिरिक्त तेलामुळेच किनारपट्टीवर तेलाचे गोळेवजा तवंग जमा होऊन किनारपट्टी काळीकुट्ट बनत आहे. पण खरे काय हे पाहण्यास प्रशासन साधी तसदीही घेत नाही. परिणामी या तेल-तवंगाचा समुद्रातील जीवांना तर धोका आहेच पण त्याचबरोबर पर्यटकांना आणि पर्यटन व्यवसायालाही आहे.बहुतांशी किनारपट्टीवर प्रादुर्भावकोंडुरा, वायंगणी, वेंगुर्ले, रेडी, शिरोडा, वेळागर, फळयेफोंडा, केळूस, खवणे, कर्ली अशा सर्वच किनारपट्टीवर तेलवजा तवंग काळे गोळे जमा झाले असून, स्थानिक मच्छिमारांसाठी अपायकारक ठरत आहेत. त्यामुळे या विषयात प्रशासनाने लक्ष घालून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.प्रशासनाचे जाणिवपूर्व दुर्लक्षसमुद्र किनाऱ्यावरील देखरेख करणाऱ्या संबंधित कार्यालयाच्या ढिसाळ कारभारामुळेच अशा घटना वर्षानुवर्षे होत आहेत. तेलगोळे जमा होण्याचे प्रकार दरवर्षी होतात. शासन कृती कार्यक्रम हाती घेतात.मात्र, संबंधित कारवाईपासून वंचित राहतात. त्यामुळे असे प्रकार थांबत नाहीत. विदेशी पर्यटकाकडून निषेधसमुद्र किनाऱ्यावरील स्वच्छता हा शहराच्यादृष्टीने महत्वाचा भाग आहे. तसेच समुद्रातील जीवसंपत्तीसाठी फार महत्वाचा आहे.वेंगुर्ले किनारपट्टीवरील या प्रदुषणाने एका विदेशी पर्यटकाने शहरातील दिपगृहावरच वीस तास ठाण मांडून आगळा-वेगळा निषेध केला, तोही या स्वच्छतेसाठीच. प्रशासनाने याचे गांभीर्य वेळीच ओळखावे.