शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
3
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
4
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
5
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
6
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
7
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
8
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
9
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
10
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
11
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
12
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
13
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
14
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
15
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
16
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
17
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
18
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
19
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
20
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!

वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या नाटयोत्सवाचे उदघाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 12:51 IST

वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या नाट्य महोत्सवामुळे कणकवलीचे सांस्कृतिक अंग पहायला मिळाले. बॅ. नाथ पै एकांकिका स्पर्धा त्याचबरोबर अन्य उपक्रम आयोजित करून आचरेकर प्रतिष्ठानने कणकवली ही सर्वच क्षेत्रात अग्रेसर असल्याचे सिद्ध केले आहे. येथे सुरू असलेल्या या नाट्य चळवळीमुळे राज्यात कणकवलीची सांस्कृतिक ओळख निर्माण झाली आहे, असे गौरवोद्गार प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांनी काढले.

ठळक मुद्देवसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या नाटयोत्सवाचे उदघाटननाट्य महोत्सवामुळे कणकवलीची सांस्कृतिक ओळख : वैशाली राजमाने 

कणकवली : वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या नाट्य महोत्सवामुळे कणकवलीचे सांस्कृतिक अंग पहायला मिळाले. बॅ. नाथ पै एकांकिका स्पर्धा त्याचबरोबर अन्य उपक्रम आयोजित करून आचरेकर प्रतिष्ठानने कणकवली ही सर्वच क्षेत्रात अग्रेसर असल्याचे सिद्ध केले आहे. येथे सुरू असलेल्या या नाट्य चळवळीमुळे राज्यात कणकवलीची सांस्कृतिक ओळख निर्माण झाली आहे, असे गौरवोद्गार प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांनी काढले.वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित मच्छिंद्र कांबळी स्मृती नाट्यमहोत्सवाचे उदघाटन येथील प्रतिष्ठानच्या रंगमंचावर गुरुवारी रात्री वैशाली राजमाने यांच्या हस्ते झाले.यावेळी त्या बोलत होत्या.यावेळी अविष्कार नाट्यसंस्था मुंबईचे दिग्दर्शक विश्‍वास सोहनी , आचरेकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष वामन पंडित,कार्याध्यक्ष ऍड. एन.आर.देसाई, कार्यवाह शरद सावंत,प्रा.अनिल फराकटे आदि उपस्थित होते.वैशाली राजमाने म्हणाल्या, या उदघाटन कार्यक्रमाला जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी उपस्थित राहणार होत्या. परंतु त्यांना काही कामानिमित्त बाहेर जावे लागले. त्यामुळे त्यांच्या सूचनेनुसार मी उपस्थित राहिले आहे. पण, याचा मला आनंद होत आहे. कारण कणकवलीत प्रतिष्ठानच्या माध्यमातून उत्तम सांस्कृतिक काम चालू आहे.

मच्छिंद्र कांबळी यांनी वस्त्रहरण नाटक लोकप्रिय केले. पाच हजारापेक्षा जास्त प्रयोग त्याचे झाले.अशा दिग्गज नाट्यकर्मींच्या स्मृतींही यावर्षीपासून या नाट्य उत्सवातून जपल्या जात आहेत. ही एक चांगली सांस्कृतिक घटना आहे.

सांस्कृतिक कार्यक्रमांचा वेगवेगळा स्तर असतो. काही कार्यक्रम 'मास ' साठी तर काही कार्यक्रम 'क्लास' साठी असतात. आचरेकर प्रतिष्ठानचे काम 'क्लास' साठी चालू आहे. दर्दी रसिकांसाठी सुरू असलेल्या या कार्याचे कौतुकच करायला हवे.विश्वास सोहनी म्हणाले, ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य फक्त नाटकासाठी वेचले. त्या अविष्कार संस्थेचे सर्वेसर्वा असणाऱ्या अरुण काकडे यांना हा नाट्य उत्सव समर्पित करण्यात आला आहे. यामुळे मन भरून येत आहे. गेली २८ वर्ष निष्ठेने वसंतराव आचरेकर प्रतिष्ठानने प्रायोगिक नाट्य उत्सव आयोजित करून या मातीतील ओल जपण्याचे काम केले आहे.

हा उत्सव चिरंतन राहील याबद्दल कोणतीही शंका बाळगण्याची गरज नाही.कारण चांगले काम हे दिंगतर टिकतच असते.मात्र रसिकानी त्याला साथ द्यायला हवी. वामन पंडित यांनी प्रास्तविक केले . प्रा. अनिल फराकटे यांनी सूत्रसंचालन केले. 

टॅग्स :NatakनाटकKankavliकणकवलीsindhudurgसिंधुदुर्ग