शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या नाटयोत्सवाचे उदघाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 12:51 IST

वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या नाट्य महोत्सवामुळे कणकवलीचे सांस्कृतिक अंग पहायला मिळाले. बॅ. नाथ पै एकांकिका स्पर्धा त्याचबरोबर अन्य उपक्रम आयोजित करून आचरेकर प्रतिष्ठानने कणकवली ही सर्वच क्षेत्रात अग्रेसर असल्याचे सिद्ध केले आहे. येथे सुरू असलेल्या या नाट्य चळवळीमुळे राज्यात कणकवलीची सांस्कृतिक ओळख निर्माण झाली आहे, असे गौरवोद्गार प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांनी काढले.

ठळक मुद्देवसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या नाटयोत्सवाचे उदघाटननाट्य महोत्सवामुळे कणकवलीची सांस्कृतिक ओळख : वैशाली राजमाने 

कणकवली : वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या नाट्य महोत्सवामुळे कणकवलीचे सांस्कृतिक अंग पहायला मिळाले. बॅ. नाथ पै एकांकिका स्पर्धा त्याचबरोबर अन्य उपक्रम आयोजित करून आचरेकर प्रतिष्ठानने कणकवली ही सर्वच क्षेत्रात अग्रेसर असल्याचे सिद्ध केले आहे. येथे सुरू असलेल्या या नाट्य चळवळीमुळे राज्यात कणकवलीची सांस्कृतिक ओळख निर्माण झाली आहे, असे गौरवोद्गार प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांनी काढले.वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित मच्छिंद्र कांबळी स्मृती नाट्यमहोत्सवाचे उदघाटन येथील प्रतिष्ठानच्या रंगमंचावर गुरुवारी रात्री वैशाली राजमाने यांच्या हस्ते झाले.यावेळी त्या बोलत होत्या.यावेळी अविष्कार नाट्यसंस्था मुंबईचे दिग्दर्शक विश्‍वास सोहनी , आचरेकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष वामन पंडित,कार्याध्यक्ष ऍड. एन.आर.देसाई, कार्यवाह शरद सावंत,प्रा.अनिल फराकटे आदि उपस्थित होते.वैशाली राजमाने म्हणाल्या, या उदघाटन कार्यक्रमाला जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी उपस्थित राहणार होत्या. परंतु त्यांना काही कामानिमित्त बाहेर जावे लागले. त्यामुळे त्यांच्या सूचनेनुसार मी उपस्थित राहिले आहे. पण, याचा मला आनंद होत आहे. कारण कणकवलीत प्रतिष्ठानच्या माध्यमातून उत्तम सांस्कृतिक काम चालू आहे.

मच्छिंद्र कांबळी यांनी वस्त्रहरण नाटक लोकप्रिय केले. पाच हजारापेक्षा जास्त प्रयोग त्याचे झाले.अशा दिग्गज नाट्यकर्मींच्या स्मृतींही यावर्षीपासून या नाट्य उत्सवातून जपल्या जात आहेत. ही एक चांगली सांस्कृतिक घटना आहे.

सांस्कृतिक कार्यक्रमांचा वेगवेगळा स्तर असतो. काही कार्यक्रम 'मास ' साठी तर काही कार्यक्रम 'क्लास' साठी असतात. आचरेकर प्रतिष्ठानचे काम 'क्लास' साठी चालू आहे. दर्दी रसिकांसाठी सुरू असलेल्या या कार्याचे कौतुकच करायला हवे.विश्वास सोहनी म्हणाले, ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य फक्त नाटकासाठी वेचले. त्या अविष्कार संस्थेचे सर्वेसर्वा असणाऱ्या अरुण काकडे यांना हा नाट्य उत्सव समर्पित करण्यात आला आहे. यामुळे मन भरून येत आहे. गेली २८ वर्ष निष्ठेने वसंतराव आचरेकर प्रतिष्ठानने प्रायोगिक नाट्य उत्सव आयोजित करून या मातीतील ओल जपण्याचे काम केले आहे.

हा उत्सव चिरंतन राहील याबद्दल कोणतीही शंका बाळगण्याची गरज नाही.कारण चांगले काम हे दिंगतर टिकतच असते.मात्र रसिकानी त्याला साथ द्यायला हवी. वामन पंडित यांनी प्रास्तविक केले . प्रा. अनिल फराकटे यांनी सूत्रसंचालन केले. 

टॅग्स :NatakनाटकKankavliकणकवलीsindhudurgसिंधुदुर्ग