शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

वैभव नाईक यांनी शेवटचे काही महिने आमदारकी एन्जॉय करावी, समीर नलावडे यांचा उपरोधिक टोला

By सुधीर राणे | Updated: June 12, 2024 15:55 IST

ते कोणाच्या संपर्कात होते ?

कणकवली: रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात नारायण राणे यांना कणकवली शहरात विनायक राऊत यांच्यापेक्षा १,७१७ चे मताधिक्य मिळाले. उद्धवसेनेचे नेते आमदार वैभव नाईक आणि संदेश पारकर यांना आम्ही आव्हान देवून देखील त्यांनी ते स्विकारले नाही. पारकर बंधू व नाईक यांनी राऊत यांना या निवडणुकीत पराजित करण्याचे काम केले. नाईक यांनी शेवटचे २-३ महिने आपली आमदारकी एन्जॉय करावी, असा उपरोधिक टोला समीर नलावडे व बंडू हर्णे यांनी लगावला. कणकवली शहर भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. नलावडे म्हणाले, लोकसभा निवडणुकीत नारायण राणे यांना चांगले मताधिक्य मिळाल्याने भाजपाचे नगरसेवक, कणकवलीतील सर्व पदाधिकाऱ्यांवर शहरातील जनतेने विश्वास दाखवला आहे. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आजपर्यंतच्या इतिहासात कणकवली शहरामध्ये १,७१७ असे मताधिक्य कोणत्याही निवडणूकीमध्ये कुठच्याच उमेदवाराला मिळालेले नाही. ते मताधिक्य राणेंवर तसेच नरेंद्र मोदी सरकारवर विश्वास ठेवून मिळाले आहे. कणकवली शहराच्या विकासाच्या बाबतीत नारायण राणे,  पालकमंत्री रविंद्र चव्हाण आणि आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून जो निधी आला व या अडीच वर्षात जो विकास झाला त्याची पोचपावती म्हणून हे मताधिक्य मिळाले आहे. त्यामुळे फक्त प्रसिद्धी माध्यमांसमोर आमच्यावर टीका करणाऱ्या विरोधकांची तोंडे बंद झाली आहेत असेही ते म्हणाले.यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा बॅंक संचालक विठ्ठल देसाई, माजी नगरसेवक संजय कामतेकर, किशोर राणे, मेघा गांगण, राजश्री धुमाळे आदी भाजप पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. ते कोणाच्या संपर्कात होते ?आमदार वैभव नाईक हे कोणाच्या संपर्कात होते? ते आम्हाला माहित नाही. मात्र, त्यांच्या विधानसभा मतदारसंघातही नारायण राणे यांना मताधिक्य मिळाले आहे. त्यामुळे वैभव नाईक यांनी  शेवटचे २-३ महिने आपली आमदारकी एन्जॉय करावी , असा उपरोधिक टोला समीर नलावडे व बंडू हर्णे यांनी यावेळी लगावला.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गKankavliकणकवलीVaibhav Naikवैभव नाईक Vinayak Rautविनायक राऊत Narayan Raneनारायण राणे