शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

कणकवलीवासीयांच्या सेवेत लवकरच अद्ययावत अग्निशामक बंब, नगराध्यक्ष समीर नलावडे यांची माहिती

By सुधीर राणे | Updated: May 3, 2023 14:19 IST

कणकवली : कणकवली शहरवासीयांच्या सेवेत नगरपंचायतीचा ८९ लाख ९२ हजारांचा नवीन अद्ययावत अग्निशामक बंब लवकरच दाखल होणार आहे. त्यामुळे ...

कणकवली : कणकवली शहरवासीयांच्या सेवेत नगरपंचायतीचा ८९ लाख ९२ हजारांचा नवीन अद्ययावत अग्निशामक बंब लवकरच दाखल होणार आहे. त्यामुळे भविष्यात आगी सारख्या आपत्तीचे व्यवस्थापन चांगल्याप्रकारे करण्यासाठी अग्निशामक बंबाची मदत होईल अशी माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली.कणकवली नगरपंचायत कार्यालयातील नगराध्यक्ष दालनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी  उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, गटनेते संजय कामतेकर, नगरसेविका मेघा गांगण, विराज भोसले, महेश सावंत, किशोर राणे, अजय गांगण आदी उपस्थित होते.यावेळी नलावडे म्हणाले, कणकवली नगरपंचायतने गेल्या दोन महिन्यांपूर्वी जुना अग्निशामक बंब नादुरुस्त झाल्याने निर्लेखित केला आहे. त्यानंतर नगरपंचायतीने राज्य शासनाकडे नवीन अग्निशामक बंब खरेदीचा प्रस्ताव सादर केला होता. त्यामुळे नवीन अद्ययावत अशा अग्निशामक बंबासाठी ८९ लाख ९२ हजारांचा निधी उपलब्ध झाला आहे. येत्या दीड ते दोन महिन्यात अग्निशामक बंब आपल्याला उपलब्ध होणार आहे. १९ टन वजन वाहून नेण्याची क्षमता असलेला आणि  व १ हजार फोम व ६ हजार लिटर पाणी साठा करू शकणारा हा बंब आहे. इंजिन पॉवर १८० एचपी व शिडीची लांबी १०.५  मीटर आहे. बंबाच्या  केबिन मध्ये चालक आणि ४ कर्मचारी बसण्याची व्यवस्था आहे. या बंबाद्वारे २००० लिटर प्रती मिनीट  पाणी फवारणी करू शकतो. बंबात प्रथोमोपचार पेटीही उपलब्ध असणार असल्याचे नलावडे यांनी सांगितले.बंडू हर्णे म्हणाले, कणकवली शहरात २४ तास कार्यान्वित असलेले अग्निशामक केंद्र तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी भूसंपादन प्रस्ताव तयार केला आहे. भूसंपादन अधिकारी लवकरच संबंधित जमीन मालकांना मोबदल्याचे वाटप करणार आहेत. त्यासाठी नगरपंचायतने ४ कोटी ७० लाखांचा निधी दिला आहे. या केंद्राच्या ठिकाणी अग्निशामक दलाच्या गाड्या उभ्या राहतील. याठिकाणी कर्मचाऱ्यांची निवास व्यवस्था असेल. जेणेकरून आपत्ती झाल्यानंतर तातडीने अग्निशामक दलाची गाडी रवाना होईल. हा प्रकल्प लवकर पूर्ण होण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. भूसंपादन झाल्यावर शासनाकडून एक कोटींचा निधी तत्काळ नगरपंचायतीला मिळेल असे बंडू हर्णे यांनी सांगितले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गKankavliकणकवली