शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash :या अपघाताला जबाबदार कोण? बोइंग विमानातील त्रुटी की...?
2
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
3
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
4
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
5
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
6
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
7
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
8
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
9
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
10
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
11
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
12
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
13
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण
14
ग्रुप बुकिंग केल्यास एसटीने थेट पंढरपूरला जाता येणार, ‘आषाढी’साठी ५ हजार विशेष बसेस : सरनाईक
15
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
16
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
17
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
18
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
19
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
20
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 

अवकाळी पावसाने १८७ शेतकऱ्यांचे १०१ हेक्टर क्षेत्र बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 17:44 IST

Farmer Collcator Sindhudurgnews- जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात झालेला अवकाळी पाऊस व गारांमुळे फळपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. जिल्हा अधीक्षक कृषी विभागामार्फत करण्यात आलेल्या पंचनाम्यात एकूण १८७ शेतकऱ्यांचे १०१ हेक्टर क्षेत्रावरील क्षेत्राचे १८ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी यांच्या स्वाक्षरीने हा अहवाल शासनास सादर करण्यात आला असल्याची माहिती कोरडवाहू क्षेत्र विकास अधिकारी अरुण नातू यांनी दिली.

ठळक मुद्देअवकाळी पावसाने १८७ शेतकऱ्यांचे १०१ हेक्टर क्षेत्र बाधित जानेवारी, फेब्रुवारीमध्ये झाला होता पाऊस, अहवाल शासनास सादर

सिंधुदुर्ग : जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात झालेला अवकाळी पाऊस व गारांमुळे फळपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. जिल्हा अधीक्षक कृषी विभागामार्फत करण्यात आलेल्या पंचनाम्यात एकूण १८७ शेतकऱ्यांचे १०१ हेक्टर क्षेत्रावरील क्षेत्राचे १८ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी यांच्या स्वाक्षरीने हा अहवाल शासनास सादर करण्यात आला असल्याची माहिती कोरडवाहू क्षेत्र विकास अधिकारी अरुण नातू यांनी दिली.गेल्या काही वर्षांपासून वातावरणात कमालीचे बदल जाणवू लागले आहेत. याचा परिमाण शेतकरी व बागायतदार यांना बसत आहे. हिवाळ्यातही पाऊस तसेच गारा पडून शेती व फळपिकांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. अनेक शेतकरी बाधित होत आहेत. जनावरांसोबतच निसर्गाचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. शासनाकडून मिळत असलेली मदतही तुटपुंज्या स्वरूपाची आहे.जानेवारी व फेब्रुवारी २०२१ मध्ये ऐन थंडीच्या दिवसात मुसळधार पाऊस व गारा पडल्या होत्या. जिरायती, बागायत व फळपिकाचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले होते. यामध्ये वैभववाडी तालुक्यातील ४ शेतकऱ्यांचे ७७ गुंठे, कणकवली तालुक्यात २ शेतकऱ्यांचे २ गुंठे, असे एकूण ६ हजारांचे नुकसान झाले होते. बागायत पिकांमध्ये केळीचे पाच गुंठ्यावरील नुकसान झाले होते.फळपिकांमध्ये आंबा, काजू या पिकांचे खूप नुकसान झाले आहे. यात सावंतवाडी ८ शेतकऱ्यांचे २१ गुंठ्याचे ४ हजार रुपये एवढे नुकसान झाले आहे. वैभववाडी तालुक्यात ५६ हेक्टर क्षेत्रातील १०३ शेतकऱ्यांचे १० लाख १२ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. कणकवली तालुक्यात ४४ हेक्टर क्षेत्राचे ७६ शेतकऱ्यांचे ८ लाख रुपये एवढे नुकसान झाले आहे; तर देवगड, कुडाळ, वेंगुर्ला व दोडामार्ग तालुक्यात फळपिकांचे नुकसान झाले नाही.नुकसान भरपाईकडे शेतकऱ्यांचे लक्षपाऊस झाल्यानंतर जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी यांनी पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार तात्काळ कृषी सहायक यांच्या माध्यमातून ३३ टक्क्यांवर नुकसान झालेल्या जिरायती, बागायती व फळपिकांचा अहवाल तयार करण्यात आला होता. या अहवालावर जिल्हाधिकारी यांची स्वाक्षरी झाल्यानंतर नुकसान भरपाई मिळावी, यासाठी हा अहवाल शासनास सादर करण्यात आला आहे. आता नुकसानभरपाईकडे बाधित शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीcollectorजिल्हाधिकारीsindhudurgसिंधुदुर्ग