शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

अवकाळी पावसाने १८७ शेतकऱ्यांचे १०१ हेक्टर क्षेत्र बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 17:44 IST

Farmer Collcator Sindhudurgnews- जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात झालेला अवकाळी पाऊस व गारांमुळे फळपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. जिल्हा अधीक्षक कृषी विभागामार्फत करण्यात आलेल्या पंचनाम्यात एकूण १८७ शेतकऱ्यांचे १०१ हेक्टर क्षेत्रावरील क्षेत्राचे १८ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी यांच्या स्वाक्षरीने हा अहवाल शासनास सादर करण्यात आला असल्याची माहिती कोरडवाहू क्षेत्र विकास अधिकारी अरुण नातू यांनी दिली.

ठळक मुद्देअवकाळी पावसाने १८७ शेतकऱ्यांचे १०१ हेक्टर क्षेत्र बाधित जानेवारी, फेब्रुवारीमध्ये झाला होता पाऊस, अहवाल शासनास सादर

सिंधुदुर्ग : जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात झालेला अवकाळी पाऊस व गारांमुळे फळपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. जिल्हा अधीक्षक कृषी विभागामार्फत करण्यात आलेल्या पंचनाम्यात एकूण १८७ शेतकऱ्यांचे १०१ हेक्टर क्षेत्रावरील क्षेत्राचे १८ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी यांच्या स्वाक्षरीने हा अहवाल शासनास सादर करण्यात आला असल्याची माहिती कोरडवाहू क्षेत्र विकास अधिकारी अरुण नातू यांनी दिली.गेल्या काही वर्षांपासून वातावरणात कमालीचे बदल जाणवू लागले आहेत. याचा परिमाण शेतकरी व बागायतदार यांना बसत आहे. हिवाळ्यातही पाऊस तसेच गारा पडून शेती व फळपिकांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. अनेक शेतकरी बाधित होत आहेत. जनावरांसोबतच निसर्गाचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. शासनाकडून मिळत असलेली मदतही तुटपुंज्या स्वरूपाची आहे.जानेवारी व फेब्रुवारी २०२१ मध्ये ऐन थंडीच्या दिवसात मुसळधार पाऊस व गारा पडल्या होत्या. जिरायती, बागायत व फळपिकाचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले होते. यामध्ये वैभववाडी तालुक्यातील ४ शेतकऱ्यांचे ७७ गुंठे, कणकवली तालुक्यात २ शेतकऱ्यांचे २ गुंठे, असे एकूण ६ हजारांचे नुकसान झाले होते. बागायत पिकांमध्ये केळीचे पाच गुंठ्यावरील नुकसान झाले होते.फळपिकांमध्ये आंबा, काजू या पिकांचे खूप नुकसान झाले आहे. यात सावंतवाडी ८ शेतकऱ्यांचे २१ गुंठ्याचे ४ हजार रुपये एवढे नुकसान झाले आहे. वैभववाडी तालुक्यात ५६ हेक्टर क्षेत्रातील १०३ शेतकऱ्यांचे १० लाख १२ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. कणकवली तालुक्यात ४४ हेक्टर क्षेत्राचे ७६ शेतकऱ्यांचे ८ लाख रुपये एवढे नुकसान झाले आहे; तर देवगड, कुडाळ, वेंगुर्ला व दोडामार्ग तालुक्यात फळपिकांचे नुकसान झाले नाही.नुकसान भरपाईकडे शेतकऱ्यांचे लक्षपाऊस झाल्यानंतर जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी यांनी पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार तात्काळ कृषी सहायक यांच्या माध्यमातून ३३ टक्क्यांवर नुकसान झालेल्या जिरायती, बागायती व फळपिकांचा अहवाल तयार करण्यात आला होता. या अहवालावर जिल्हाधिकारी यांची स्वाक्षरी झाल्यानंतर नुकसान भरपाई मिळावी, यासाठी हा अहवाल शासनास सादर करण्यात आला आहे. आता नुकसानभरपाईकडे बाधित शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीcollectorजिल्हाधिकारीsindhudurgसिंधुदुर्ग