शहरं
Join us  
Trending Stories
1
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
4
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
5
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
6
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
7
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
8
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
9
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
10
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
11
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
12
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
13
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
14
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
15
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
16
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
17
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
18
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
19
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
20
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न

अवकाळी पावसाने १८७ शेतकऱ्यांचे १०१ हेक्टर क्षेत्र बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 17:44 IST

Farmer Collcator Sindhudurgnews- जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात झालेला अवकाळी पाऊस व गारांमुळे फळपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. जिल्हा अधीक्षक कृषी विभागामार्फत करण्यात आलेल्या पंचनाम्यात एकूण १८७ शेतकऱ्यांचे १०१ हेक्टर क्षेत्रावरील क्षेत्राचे १८ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी यांच्या स्वाक्षरीने हा अहवाल शासनास सादर करण्यात आला असल्याची माहिती कोरडवाहू क्षेत्र विकास अधिकारी अरुण नातू यांनी दिली.

ठळक मुद्देअवकाळी पावसाने १८७ शेतकऱ्यांचे १०१ हेक्टर क्षेत्र बाधित जानेवारी, फेब्रुवारीमध्ये झाला होता पाऊस, अहवाल शासनास सादर

सिंधुदुर्ग : जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात झालेला अवकाळी पाऊस व गारांमुळे फळपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. जिल्हा अधीक्षक कृषी विभागामार्फत करण्यात आलेल्या पंचनाम्यात एकूण १८७ शेतकऱ्यांचे १०१ हेक्टर क्षेत्रावरील क्षेत्राचे १८ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी यांच्या स्वाक्षरीने हा अहवाल शासनास सादर करण्यात आला असल्याची माहिती कोरडवाहू क्षेत्र विकास अधिकारी अरुण नातू यांनी दिली.गेल्या काही वर्षांपासून वातावरणात कमालीचे बदल जाणवू लागले आहेत. याचा परिमाण शेतकरी व बागायतदार यांना बसत आहे. हिवाळ्यातही पाऊस तसेच गारा पडून शेती व फळपिकांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. अनेक शेतकरी बाधित होत आहेत. जनावरांसोबतच निसर्गाचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. शासनाकडून मिळत असलेली मदतही तुटपुंज्या स्वरूपाची आहे.जानेवारी व फेब्रुवारी २०२१ मध्ये ऐन थंडीच्या दिवसात मुसळधार पाऊस व गारा पडल्या होत्या. जिरायती, बागायत व फळपिकाचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले होते. यामध्ये वैभववाडी तालुक्यातील ४ शेतकऱ्यांचे ७७ गुंठे, कणकवली तालुक्यात २ शेतकऱ्यांचे २ गुंठे, असे एकूण ६ हजारांचे नुकसान झाले होते. बागायत पिकांमध्ये केळीचे पाच गुंठ्यावरील नुकसान झाले होते.फळपिकांमध्ये आंबा, काजू या पिकांचे खूप नुकसान झाले आहे. यात सावंतवाडी ८ शेतकऱ्यांचे २१ गुंठ्याचे ४ हजार रुपये एवढे नुकसान झाले आहे. वैभववाडी तालुक्यात ५६ हेक्टर क्षेत्रातील १०३ शेतकऱ्यांचे १० लाख १२ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. कणकवली तालुक्यात ४४ हेक्टर क्षेत्राचे ७६ शेतकऱ्यांचे ८ लाख रुपये एवढे नुकसान झाले आहे; तर देवगड, कुडाळ, वेंगुर्ला व दोडामार्ग तालुक्यात फळपिकांचे नुकसान झाले नाही.नुकसान भरपाईकडे शेतकऱ्यांचे लक्षपाऊस झाल्यानंतर जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी यांनी पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार तात्काळ कृषी सहायक यांच्या माध्यमातून ३३ टक्क्यांवर नुकसान झालेल्या जिरायती, बागायती व फळपिकांचा अहवाल तयार करण्यात आला होता. या अहवालावर जिल्हाधिकारी यांची स्वाक्षरी झाल्यानंतर नुकसान भरपाई मिळावी, यासाठी हा अहवाल शासनास सादर करण्यात आला आहे. आता नुकसानभरपाईकडे बाधित शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीcollectorजिल्हाधिकारीsindhudurgसिंधुदुर्ग