शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
2
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
3
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
4
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
5
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
6
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
7
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
8
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
9
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
10
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
11
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
12
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
13
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
14
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
15
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
16
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
17
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
18
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
19
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान
20
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर

rain in sindhudurg: सिंधुदुर्ग जिल्ह्यात ऐन हिवाळ्यात अवकाळी पावसाची हजेरी

By सुधीर राणे | Published: November 28, 2022 6:48 PM

पावसामुळे आंबा, काजू बागायतदार चिंतेत

कणकवली: कणकवलीसह जिल्ह्यातील अन्य तालुक्यात काही ठिकाणी आज, सोमवारी सायंकाळच्या सुमारास ऐन हिवाळ्यात जोरदार अवकाळी पाऊस कोसळला. अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची एकच तारांबळ उडाली. या पावसामुळे आंबा, काजू बागायतदार चिंतेत आहेत. पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.गेली दोन दिवस थंडी गायब झाली आहे. तसेच वातावरणातील उष्णतेचे प्रमाण देखील वाढले होते. आज, सोमवारी सायंकाळी ५.३०च्या सुमारास कणकवलीत अचानक वाऱ्यासह पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते.फोंडाघाट येथे आज, आठवडा बाजार असतो. अचानक आलेल्या पावसाने बाजारातील विक्रेत्यांची तारांबळ उडाली. ग्राहकांनाही पावसापासून बचाव करण्यासाठी दुकानांचा आसरा घ्यावा लागला. महामार्गाच्या उड्डाणपूलावरून सर्व्हिस रस्त्यावर धबधब्या सारख्या पाण्याच्या धारा कोसळत होत्या. तर काही ठिकाणी सर्व्हिस रस्त्यावर पाणी साचले होते. त्यातून पादचाऱ्यांना व वाहनचालकांना वाट काढताना कसरत करावी लागत होती.अन्य तालुक्यातही अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे आंबा व काजू बागायतदारांचे नुकसान झाले आहे. प्रशासनाने या नुकसानीची पाहणी करून तत्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गRainपाऊस