शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना सुनावले खडेबोल  
2
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
3
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
4
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
5
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
6
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
7
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
8
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
9
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
10
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
11
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
12
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
13
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
14
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
15
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
16
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
17
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video
18
Shravan 2025: शास्त्रानुसार, संसारी व्यक्तीने रुद्राक्षाची जपमाळ ओढावी, पण गळ्यात घालू नये!
19
रक्षाबंधन नेमके कधी आहे? शुभ मुहूर्त कोणता? पाहा, महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
20
नोकरीसाठी विदेशात जायचंय तर पत्नीला भारतात ठेवा, अटीविरुद्ध ‘तो’ सुप्रीम कोर्टात

..म्हणून मध्यावधी निवडणुका होणार का?, नारायण राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2022 15:58 IST

मातोश्रीच्या बाहेर कधीही न पडलेला माणूस मुख्यमंत्री झाल्याने राज्य १० वर्षे विकासाच्या दृष्टीने मागे गेले.

ओरोस : मध्यावधी निवडणुका घेण्यासाठी सक्षम कारण लागते. मात्र, सध्यस्थितीत तशी कोणतीही परिस्थिती राज्यात नाही. केवळ आपले मुख्यमंत्रिपद गेले म्हणून मध्यावधी निवडणुका घेतल्या जाव्यात, असे त्यांना वाटत असेल; पण तसे होत नसल्याची टीका करतानाच त्यांना घरात बसून बोलायला काय? त्यांनी घराच्या बाहेर येऊन बोलावं, असा घणाघात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केला.उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आपल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना राज्यात मध्यावधी निवडणुका कधीही लागू शकतात. त्यामुळे मध्यावधी निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचना केल्या आहेत. या प्रश्नावर बोलताना केंद्रीय मंत्री नारायण म्हणाले की, मध्यावधी निवडणुकीसाठी युद्ध किंवा नैसर्गिक आपत्ती यावी लागते. तशी परिस्थिती असल्यास मध्यावधी निवडणुका घेतल्या जातात.

मात्र कशामुळे मध्यावधी निवडणुका घेणार? काही कारण असलं पाहिजे ना. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी कारण सांगावे की, या कारणासाठी मध्यावधी निवडणूक होईल. त्यांचे मुख्यमंत्रिपद गेले म्हणून मध्यावधी निवडणुका घेतल्या जातात का? पण तसे नाही होत. त्यांना वाटत असेल आपलं मुख्यमंत्री पद घेतलं म्हणून मध्यावधी निवडणुका घ्याव्यात तर तसे होत नाही. त्यांना घरबसल्या बोलायला काय? त्यांनी घराच्या बाहेर येऊन बोलावं, असा घणाघातही नारायण राणेंनी यांनी यावेळी केला आहे.

१० वर्षे विकासाच्या दृष्टीने मागे गेलेमातोश्रीच्या बाहेर कधीही न पडलेला माणूस मुख्यमंत्री झाल्याने राज्य १० वर्षे विकासाच्या दृष्टीने मागे गेले. त्यांना नीट बोलता येत नाही अशा व्यक्तीच्या प्रश्नाला उत्तर द्यावे, असं मला वाटत नाही. कारण अभ्यासू किंवा वैचारिक पद्धतीने त्यांना बोलताना येत नसल्याची टीकाही राणे यांनी यावेळी केली आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गNarayan Raneनारायण राणे Uddhav Thackerayउद्धव ठाकरे